शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बालचित्रवाणीचे पुनरुज्जीवन गरजेचे; बंद पडल्याने झाले मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 14:07 IST

केंद्रीय अर्थसंकल्पात शालेय शिक्षणाकडे लक्ष देण्यात आले

-राहुल शिंदे

पुणे: केंद्रीय अर्थसंकल्पात शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन शंभर चॅनल्स सुरू करण्याची घोषणा केली असून या चॅनल्ससाठी आता इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरुपातील अभ्याससाहित्य तयार करावे लागणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने बालचित्रवाणीचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे असून यामुळे उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करणे शक्य होईल, असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात शालेय शिक्षणाकडे लक्ष देण्यात आले असून देशात आता आधुनिक आंगणवाड्या सुरू केल्या जाणार आहेत.तसेच कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण घेण्यास मोठ्या अडचणी आल्या. त्यामुळे चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा विचार पुढे आला. त्यानुसार आता महाराष्ट्रात बारा चॅनल्स सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, जाणकार व अभ्यासू मनुष्यबळाची आवश्यकता आहे. बालचित्रवाणीकडे सर्वकाही उपलब्ध होते. मात्र,राज्य शासनाच्या दूर्लक्षामुळे बालचित्रवाणीला टाळे लावण्याची वेळ आली. परंतु, कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यामुळे बालचित्रवाणीचे पुनरुज्जीवन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पात ठोस तरतुद केलेली नाही. मात्र,शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चॅनल्स सुरू केले जाणार आहेत. ही स्वागतार्ह बाब आहे. बालचित्रवाणी बंद झाली नसती तर महाराष्ट्राला चॅनलवर दाखविण्यासाठी आवश्यक असणारे व्हिडिओ तयार करणे सहज शक्य झाले असते. आता सर्वकाही नव्याने सुरू करावे लागणार आहे. मात्र, या चॅनेल्सवर दर्जेदार व्हिडिओ दाखवावे लागतील. त्याशिवाय विद्यार्थी हे चॅनल्स पाहणार नाही.- डॉ.वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ

केंद्र शासनाकडून मिळणा-या निधीवर बालचित्रवाणी ही संस्था सुरू होती. केंद्राकडून मिळणारा निधी बंद झाल्यानंतर राज्य शासनाच्या दूर्लक्षामुळे बालचित्रवाणी बंद झाली. राज्यात प्रादेशिक भाषेतील 12 चॅनल्स सुरू होणार असल्याने बालचित्रवाणीचे पुनरुज्जीवन होणे गरजेचे आहे. बालचित्रवाणीकडे असणा-या जुन्या साहित्याचा वापर या चॅनल्ससाठी करता येऊ शकतो.- एन.के.जरग, माजी शिक्षण संचालक

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र