शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

डिजिटल युगात एकलव्य शिक्षण पध्दती हवी: राम ताकवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 7:13 PM

डिजिटल युगात सर्जनशीलता आणि कल्पकतेच्या बळावर विद्यार्थ्यांना टिकून राहता येईल.

ठळक मुद्देतंत्रज्ञानाचा वापर ज्या माणसाकडून केला जातो त्याची बुध्दीमत्ता अधिक महत्त्वाची

पुणे: डिजिटल युगात एकलव्याची शिक्षण पध्दती आणावी लागणार आहे. तसेच स्वत:चे, समाजाचे आणि विद्यापीठाचे भवितव्य घडवणारे विद्यार्थी तयार करावे लागणार आहेत. डिजिटल युगात सर्जनशीलता आणि कल्पकतेच्या बळावर विद्यार्थ्यांना टिकून राहता येईल,असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.राम ताकवले यांनी व्यक्त केले.भारती विद्यापीठाच्या ५४व्या वर्धापनदिन समारंभात ताकवले बोलत होते.या प्रसंगी भारती विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,कार्याध्यक्ष आनंदराव पाटील,कार्यवाह डॉ.विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे, सरकार्यवाह डॉ. व.भा.म्हेत्रे, डॉ.एस.एम.सगरे आदी उपस्थित होते. डॉ.पतंगराव कदम यांच्या निधनामुळे विद्यापीठाचा वर्धापनदिन शोकाकुल वातावरणात आणि साधेपणाने संपन्न झाला. यावेळी प्रा.मिलिंद जोशी यांनी संपादित केलेल्या विचारभारतीच्या डॉ.पतंगराव कदम स्मृती विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.ताकवले म्हणाले,पतंगराव यांना स्वप्नपूर्तीचे वरदान लाभले होते. स्वप्न पाहायचे आणि ते सत्यात उतरविण्यासाठी जीवाचे रान करायचे हा त्यांचा स्वभाव होता, असे नमूद करून ताकवले म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील,बापूजी साळुंके यांनी ग्रामीण भागात शिक्षण संस्था काढल्या. पतंगराव कदम यांनी महानगरात शिक्षण संस्था काढून त्याच्या शाखा - उपशाखा ग्रामीण भागापर्यंत नेल्या. तंत्रज्ञान हे क्रांतीचे कारण असले तरी तंत्रज्ञानाचा वापर ज्या माणसाकडून केला जातो.त्याची बुध्दीमत्ता ही अधिक महत्त्वाची असते.विश्वजीत कदम म्हणाले,पतंगराव कदम यांनी शून्यातून आयुष्याची उभारणी केली. स्वत:ला शिक्षण घेताना आलेल्या अडचणी गरीब मुलांना येऊ नयेत यासाठी त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली.भविष्यात शिक्षण संस्थांसमोर अनेक आव्हाने उभी राहणार आहेत. शिक्षण संस्थांसमोर येणा-या आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहिले पाहिजे. तसेच त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी कटिबध्द राहणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र उत्तेकर व डॉ.ज्योती मंडलिक यांनी केले.तर डॉ.एम.एस.सगरे यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेPatangrao Kadamपतंगराव कदमRam Takwaleराम ताकवाले