शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

सर्पसंवर्धनासाठी जनजागृतीची गरज

By admin | Updated: August 7, 2016 04:10 IST

‘साप’ म्हटले की, माणूस खुळ्या कल्पना आणि भीतीपोटी त्याला नष्ट करतो. सापांबद्दल अनेक गैरजमज आहेत. खरे तर सर्प हा मानवजातीचा, विशेषत: शेतकऱ्यांचा जवळचा

तळेगाव दाभाडे : ‘साप’ म्हटले की, माणूस खुळ्या कल्पना आणि भीतीपोटी त्याला नष्ट करतो. सापांबद्दल अनेक गैरजमज आहेत. खरे तर सर्प हा मानवजातीचा, विशेषत: शेतकऱ्यांचा जवळचा मित्र आहे. सापाची हत्या होता कामा नये, यासाठीच नागपंचमीसारख्या सणाला महत्त्व आहे. सर्प संवर्धनासाठी जनजागृतीची गरज आहे. सापाला मारू नये, असे आवाहन येथील सर्पमित्र किरण मोकाशी यांनी केले आहे. मोकाशी म्हणाले, सापाला मारू नये, हे जसे विज्ञान सांगते, तसेच पुराणातही सापाला देवता मानले आहे. त्याची पूजा करणे हा एक उपचार आहे. परंतु, सापाचा जीव वाचला पाहिजे. त्याची हत्या होता कामा नये. लोकशिक्षण व विज्ञानाच्या माध्यमातून सर्पाविषयीचे गैरसमज दूर केले गेले पाहिजेत. प्रबोधनातून शहरी व ग्रामीण भागात सापाला मारण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात लोकशिक्षणाची अधिक गरज आहे.सापाविषयी अधिक माहिती सांगताना ते म्हणाले, जगभरात सर्पाच्या ३१७१ जाती आहेत. त्यामध्ये २८० कमी अधिक विषारी साप पाहावयास मिळतात. भारतामध्ये २७०पेक्षा जास्त सापांच्या जाती आहेत. त्यातील अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ज्यामध्ये चापडा, उडता साप यांसारख्या जातींचा समावेश आहे. सापाविषयी असलेले गैरसमज व अंधश्रद्धेविषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘साप डूख धरतो. सापाला सुगंध आवडतो म्हणून तो केवड्याच्या बनात राहतो, असे अनेक गैरमसज अजूनही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आहेत. (वार्ताहर)साप पकडणे, बाळगणे आहे गुन्हासापांना संरक्षण देणारा वन्यजीवन संरक्षण कायदा १९७२ पासून अस्तित्वात आला. त्यानुसार साप पकडणे अथवा बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु, या कायद्याची कितपत अंमलबजावणी होते, हा संशोधनाचा विषय ठरेल. कारण, सापाच्या कातडीपासून चपलांचे पट्टे, पर्स इत्यादी वस्तू बनविल्या जातात. त्यामुळे सापांच्या कातडीची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. शासनाने सापापासून तयार होणाऱ्या वस्तूंवर निर्यातबंदी केली आहे. परंतु, कायद्याने सर्पहत्या थांबणार नाही. त्यासाठी लोकशिक्षणाची आवश्यकता आहे.