शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
3
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
4
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
5
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
6
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
7
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
8
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
9
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
10
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
11
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
12
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
13
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
14
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
15
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
16
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
17
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

सर्पसंवर्धनासाठी जनजागृतीची गरज

By admin | Updated: August 7, 2016 04:10 IST

‘साप’ म्हटले की, माणूस खुळ्या कल्पना आणि भीतीपोटी त्याला नष्ट करतो. सापांबद्दल अनेक गैरजमज आहेत. खरे तर सर्प हा मानवजातीचा, विशेषत: शेतकऱ्यांचा जवळचा

तळेगाव दाभाडे : ‘साप’ म्हटले की, माणूस खुळ्या कल्पना आणि भीतीपोटी त्याला नष्ट करतो. सापांबद्दल अनेक गैरजमज आहेत. खरे तर सर्प हा मानवजातीचा, विशेषत: शेतकऱ्यांचा जवळचा मित्र आहे. सापाची हत्या होता कामा नये, यासाठीच नागपंचमीसारख्या सणाला महत्त्व आहे. सर्प संवर्धनासाठी जनजागृतीची गरज आहे. सापाला मारू नये, असे आवाहन येथील सर्पमित्र किरण मोकाशी यांनी केले आहे. मोकाशी म्हणाले, सापाला मारू नये, हे जसे विज्ञान सांगते, तसेच पुराणातही सापाला देवता मानले आहे. त्याची पूजा करणे हा एक उपचार आहे. परंतु, सापाचा जीव वाचला पाहिजे. त्याची हत्या होता कामा नये. लोकशिक्षण व विज्ञानाच्या माध्यमातून सर्पाविषयीचे गैरसमज दूर केले गेले पाहिजेत. प्रबोधनातून शहरी व ग्रामीण भागात सापाला मारण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात लोकशिक्षणाची अधिक गरज आहे.सापाविषयी अधिक माहिती सांगताना ते म्हणाले, जगभरात सर्पाच्या ३१७१ जाती आहेत. त्यामध्ये २८० कमी अधिक विषारी साप पाहावयास मिळतात. भारतामध्ये २७०पेक्षा जास्त सापांच्या जाती आहेत. त्यातील अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ज्यामध्ये चापडा, उडता साप यांसारख्या जातींचा समावेश आहे. सापाविषयी असलेले गैरसमज व अंधश्रद्धेविषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘साप डूख धरतो. सापाला सुगंध आवडतो म्हणून तो केवड्याच्या बनात राहतो, असे अनेक गैरमसज अजूनही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आहेत. (वार्ताहर)साप पकडणे, बाळगणे आहे गुन्हासापांना संरक्षण देणारा वन्यजीवन संरक्षण कायदा १९७२ पासून अस्तित्वात आला. त्यानुसार साप पकडणे अथवा बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु, या कायद्याची कितपत अंमलबजावणी होते, हा संशोधनाचा विषय ठरेल. कारण, सापाच्या कातडीपासून चपलांचे पट्टे, पर्स इत्यादी वस्तू बनविल्या जातात. त्यामुळे सापांच्या कातडीची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. शासनाने सापापासून तयार होणाऱ्या वस्तूंवर निर्यातबंदी केली आहे. परंतु, कायद्याने सर्पहत्या थांबणार नाही. त्यासाठी लोकशिक्षणाची आवश्यकता आहे.