शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

सर्पसंवर्धनासाठी जनजागृतीची गरज

By admin | Updated: August 7, 2016 04:10 IST

‘साप’ म्हटले की, माणूस खुळ्या कल्पना आणि भीतीपोटी त्याला नष्ट करतो. सापांबद्दल अनेक गैरजमज आहेत. खरे तर सर्प हा मानवजातीचा, विशेषत: शेतकऱ्यांचा जवळचा

तळेगाव दाभाडे : ‘साप’ म्हटले की, माणूस खुळ्या कल्पना आणि भीतीपोटी त्याला नष्ट करतो. सापांबद्दल अनेक गैरजमज आहेत. खरे तर सर्प हा मानवजातीचा, विशेषत: शेतकऱ्यांचा जवळचा मित्र आहे. सापाची हत्या होता कामा नये, यासाठीच नागपंचमीसारख्या सणाला महत्त्व आहे. सर्प संवर्धनासाठी जनजागृतीची गरज आहे. सापाला मारू नये, असे आवाहन येथील सर्पमित्र किरण मोकाशी यांनी केले आहे. मोकाशी म्हणाले, सापाला मारू नये, हे जसे विज्ञान सांगते, तसेच पुराणातही सापाला देवता मानले आहे. त्याची पूजा करणे हा एक उपचार आहे. परंतु, सापाचा जीव वाचला पाहिजे. त्याची हत्या होता कामा नये. लोकशिक्षण व विज्ञानाच्या माध्यमातून सर्पाविषयीचे गैरसमज दूर केले गेले पाहिजेत. प्रबोधनातून शहरी व ग्रामीण भागात सापाला मारण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात लोकशिक्षणाची अधिक गरज आहे.सापाविषयी अधिक माहिती सांगताना ते म्हणाले, जगभरात सर्पाच्या ३१७१ जाती आहेत. त्यामध्ये २८० कमी अधिक विषारी साप पाहावयास मिळतात. भारतामध्ये २७०पेक्षा जास्त सापांच्या जाती आहेत. त्यातील अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ज्यामध्ये चापडा, उडता साप यांसारख्या जातींचा समावेश आहे. सापाविषयी असलेले गैरसमज व अंधश्रद्धेविषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘साप डूख धरतो. सापाला सुगंध आवडतो म्हणून तो केवड्याच्या बनात राहतो, असे अनेक गैरमसज अजूनही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आहेत. (वार्ताहर)साप पकडणे, बाळगणे आहे गुन्हासापांना संरक्षण देणारा वन्यजीवन संरक्षण कायदा १९७२ पासून अस्तित्वात आला. त्यानुसार साप पकडणे अथवा बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु, या कायद्याची कितपत अंमलबजावणी होते, हा संशोधनाचा विषय ठरेल. कारण, सापाच्या कातडीपासून चपलांचे पट्टे, पर्स इत्यादी वस्तू बनविल्या जातात. त्यामुळे सापांच्या कातडीची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. शासनाने सापापासून तयार होणाऱ्या वस्तूंवर निर्यातबंदी केली आहे. परंतु, कायद्याने सर्पहत्या थांबणार नाही. त्यासाठी लोकशिक्षणाची आवश्यकता आहे.