शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कोरोनाच्या संकटाशी लढताना स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतीकारकांची मानसिकता अंगीकारण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 4:13 PM

जुलमी राजवटीतुन भारत देशाला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी अनेक यातना निमूटपणे सहन केल्या..

ठळक मुद्देहुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त राजगुरुनगर येथे अभिवादन कार्यक्रम

राजगुरुनगर: देशाच्या स्वातंत्र्य लढयात इंग्रजांशी कडवा संघर्ष करताना क्रांतिकारकांनी स्वत:वर अत्यंत कठोर नियम लादून घेतले होते. त्यांच्या योगदानातुन आणि बलिदानातुन देशाला स्वातंत्र्य मिळाले. सध्याच्या कोरोनाच्या जागतिक संकटाला सामोरे जाताना स्वातंत्रपूर्व काळातील क्रांतीकारकांची ही मानसिकता अंगीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा शिवसेनेचे उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य क्रांतिवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त राजगुरुनगर येथे सोमवारी (दि २४) अभिवादन कार्यक्रम झाला. राजगुरुनगर बस स्थानक आवारातील हुतात्मा राजगुरू,भगतसिंग व सुखदेव यांच्या स्मृती शिल्पाना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यावर आढळराव पाटील बोलत होते. अभिवादन कार्यक्रमात प्रांताधिकारी संजय तेली,तहसीलदार सुचित्रा आमले,खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील,सेनेच्या विजया शिंदे, मुकुंद आवटे,कोंडीभाऊ टाकळकर आदी उपस्थित होते. हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थान असलेल्या राजगुरू वाड्यावर अभिवादन कार्यक्रम झाला.खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश गुरव यांच्या हस्ते वाड्यावर ध्वजारोहण करण्यात आले.हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे सुशील मांजरे,संदीप वाळुंज,शैलेश रावळ,विठ्ठल पाचारणे,अमित टाकळकर यावेळी उपस्थित होते.

आढळराव पाटील म्हणाले, जुलमी राजवटीतुन भारत देशाला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी अनेक यातना निमूटपणे सहन केल्या. आजच्या संकट काळात या योगदानाचे स्मरण करा आणि स्वत:सह समाजाचे हित जोपासण्याचे ध्येय निश्चित करा असे आवाहन माजी खासदार तथा शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.

 

टॅग्स :Khedखेडcorona virusकोरोना वायरस बातम्याShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळराव