शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

Navatri special : 'त्यांच्या' चेहऱ्यावर हसू आले की आम्हालाही आपोआपच समाधान वाटते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 21:15 IST

नवरात्र निमित्त विविध क्षेत्रातील महिलांशी संवाद साधून त्यांच्या कार्याला सलाम करण्यात येत अाहे. समाजात रूग्ण आणि दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या महिलांशी ‘लोकमत ती चा कट्टा’ वर संवाद साधण्यात आला.

पुणे : नवरात्र म्हणजे देवीचा नऊ रात्रीचा जागर. या नवरात्र उत्सवात देवीची चेहऱ्यावर विविध रूप आणि नवरसाचे दर्शन भाविकांना घडते, त्याच रूपातल प्रेमळ, संवेदनशील आणि सेवाभावी वृत्तीने समाजासाठी काम करणारे  ‘ती’ चे एक अभिनव रूप. कुटुंबाची दोरी हातात सक्षमपणे सांभाळत  सामाजिक बांधिलकीच्या नात्याने समाजात झोकून देऊन ‘ती’ काम करीत आहे....ना पैशाची ना कुणाच्याकौतुकाची अपेक्षा...अत्यंत निरपेक्ष मनाने  ‘ती’ समाजाप्रती असलेले उतरदायित्व पार पाडत आहे. अशाच समाजात रूग्ण आणि दिव्यांग मुलांसाठी काम करणा-या महिलांशी  ‘लोकमत ती चा कट्टा’ वर संवाद साधण्यात आला. 'त्यांच्या’ चेह-यावर हसू आले की आम्हालाही आपोआपच समाधान आणि आनंद वाटतो...समाजानेही थोडी सेवाभावी वृत्ती जोपासण्याची गरज असल्याची भावनासामाजिक क्षेत्रात काम करणा-या महिला आणि परिचारिकांकडून व्यक्त करण्यात आली.

विशेष मुलाच्या अाई असलेल्या सरिता बसरुर म्हणाल्या, ज्यावेळी गर्भवती होते, तेव्हा डॉक्टरांकडे रेग्युलर चेकअप करायला जायचे.पण कधी शंका आली नाही किंवा डॉक्टरांनी देखील सांगितले नाही की तुमचे मूल हे विशेष मुल असणार आहे. तोपर्यंत अशी काही मुलं असतात याची देखील आम्हाला फारशी माहिती नव्हती. मुलगी सात महिन्यांची झाल्यानंतर डोळ्यात विशिष्ट हालचाल जाणवायची. सर्दी, ताप झाल्यावर आम्ही तिला दुस-या डॉक्टरकडे नेले. त्यांनी मुलीला डाऊन सिंड्रोम आहे असे सांगितल्यावर आम्हाला शॉकच बसला. जेनेटिक प्रॉब्लेममुळे हे होऊ शकते. मुलीची प्रगती संथ होईल असे मनात गृहीत धरले होते. तरीही तिला नॉर्मल शाळेत पाठविले.मात्र शाळेने मुलगी विशेष आहे तिला इथे विनाकारण त्रास होईल तेव्हा विशेष शाळेमध्येच टाका असा सल्ला शाळेने दिला. आपल्याला असे मूल झाले याचा थोडासा त्रास झाला मात्र तिच्यावरच लक्ष्य केंद्रित केले आणि तिने देखील आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिलाकुटुंबामध्ये दिव्यांग मुले आहेत मात्र त्याची फारशी वाच्यता केली जायची नाही. अनेक पालक मुलांना घरातच डांबून ठेवायचे. या मुलांबाबत समाजात विशेष जनजागृती नव्हती. मात्र हळूहळू सामाजिक जाणीवा अधिक प्रगल्भ होत गेल्या. या मुलांशी कसे वागायचे याचे अभ्यासक्रम निर्मिती झाले. प्रशिक्षण दिले जाऊ लागले. त्यामुळे सेवावृत्तीमधून काम करणारे तयार झाले. या मुलांसह साठ वर्षापर्यंतच्या व्यक्तींसाठी काम करताना संयम ही गोष्ट शिकले. स्वत:च्या मुलांकडून अनेकदा अपेक्षा ठेवल्या जायच्या. पण आता स्वत:च्या मुलांबददलची भावनिकता अधिक वाढली आहे असे सावली संस्थेच्या समाजसेविका अलका पारखी, यांना वाटते. 

तर शिक्षिका असणाऱ्या काजल खंदारे म्हणाल्या, मी डीएड करताना वेगळ काम करायचे म्हणून या मुलांच्या प्रश्नांकडे वळले. या अशा मुलांसह व्यक्तींचे भावविश्व जाणून घेणे आवश्यक असते. अनेकदा मुले किंवा व्यक्ती हायपर होतात. त्यांच्या मनासारखे झाले नाहीतर ते चिडचिड आणि आदळआपट करायला सुरूवात करतात. अशा वेळी त्यांना शांत करण्यासाठी त्यांना काय आवडते हे आम्हाला माहिती असावे लागते. कारण या मुलांना मारून उपयोग नसतो. त्यांना मायेच्या स्पर्शाची गरज असते. त्यांचे निरीक्षण करून मार्ग काढणे. या मुलांशी इतके भावनिक बंध निर्माण झाले आहेत की ते सुटटीसाठी घरी गेले की आम्हाला करमतच नाही. त्यांच्याकडून आम्हाला निर्विवाद प्रेम मिळते. त्यांना शिकविताना आम्हालाही शिकवावे लागते.

टॅग्स :PuneपुणेNavratriनवरात्रीWomenमहिला