शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

Navale Bridge : नवले पुलाजवळ टँकरची तीन वाहनांना धडक; सात दिवसांत सात अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 13:45 IST

टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तीन वाहनांना पाठीमागून धडक

धायरी (पुणे) :  मुंबई - बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून आज शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तीन वाहनांना पाठीमागून धडक दिली. सुदैवाने ह्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी यातील दोन कारचे मात्र मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. एका टेम्पो ट्रॅव्हलरचे किरकोळ नुकसान झाले आहे .

अपघातानंतर टँकरचालक टँकरसह पळून जात असताना नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत. गेल्या रविवारपासून या परिसरात अपघातांची मालिका सुरू असून रविवारी त्याच परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात होऊन १३ प्रवासी जखमी झाले होते तर एका दुचाकीस्वाराला आपला प्राण गमवावा लागला होता. मंगळवारी दोन अपघात झाले होते. यात ५ वाहनांचे नुकसान झाले होते.

“राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने योजलेल्या उपायांमुळे गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत नवले पुलाजवळ यंदा अपघात कमी झाले आहे. मात्र, रविवारी झालेला अपघात भीषण होता. त्यामुळे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी आणखी प्रभावी उपाययोजना अमंलात आणण्यासाठी सेव्ह लाईफ या स्वयंसेवी संस्थेला काम देण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात त्यांचा अहवाल येईल. मात्र, त्यापूर्वी कात्रज बोगदा ते नवले पूल या सात किलोमीटरच्या परिसरात जड वाहनांसाठी उजव्या बाजुला स्वतंत्र लेन करण्यात येईल,” अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

नवले पुलाच्या अपघातानंतर पाटील यांनी सर्व संबंधितांची शुक्रवारी बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “नवले पुलावर रविवारी झालेला अपघात हा नऊ महिन्यांनंतरचा मोठा अपघात आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा अपघातांत मोठी घट झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने योजलेल्या उपाययोजनांमुळे हे प्रमाण घटले आहे. मात्र, यापुढे अपघात होऊ नयेत यासाठी आणखी उपाययोजना योजण्यात येतील. त्यासाठी सेव्ह लाईफ या स्वयंसेवी संस्थेला अभ्यास करण्याचे करण्याचे सांगितले आहे. त्यांचा अहवाल आठवडाभरात येईल. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

आजच्या बैठकीत त्यांनी कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या सात किलोमीटरच्या पट्ट्यात जड वाहनांसाठी उजव्या बाजूला स्वतंत्र लेन करावी. कारण काही अंतरानंतर डाव्या बाजूने शहरातील वाहतूक या महामार्गावर येते. त्यामुळे हा उपाय त्यांनी सुचविला आहे. तसेच बोगद्याच्या सुरुवातीला एक चेकपोस्ट तयार करण्याचे ठरले आहे. त्यात २४ तास पोलिसांची उपस्थिती राहील. तेथे चालकांना सुचना देण्यात येतील. या सात किलोमीटरच्या पट्ट्यात विविध भागांतील सुचना फलकही लावण्यात येतील. काही ठिकाणी चालकांना सुचना देण्यासाठी उद्घोषणा बुथ उभारण्यात येणार आहेत. वेगाला अडथळा आणण्यासाठी जास्त उंचीचे रम्बलर स्ट्रीप ठराविक अंतरात टाकण्यात येतील. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी स्कायवॉकही उभारण्यात येतील.”

अपघात कमी होण्याची आशा

नवले पुलावर जास्त उतार असल्याने अपघात होत आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तर हा उतार योग्य असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे. या दोघांमध्ये मतभेद आहेत. मात्र, नवले पूल पाडणे हा त्यावरचा उपाय नाही, असे स्पष्ट करत पाटील यांनी सेव्ह लाईफ संस्थेकडून आलेल्या उपायांमुळे अपघात कमी होतील अशी आशा व्यक्त केली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी