शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Navale Bridge : नवले पुलाजवळ टँकरची तीन वाहनांना धडक; सात दिवसांत सात अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 13:45 IST

टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तीन वाहनांना पाठीमागून धडक

धायरी (पुणे) :  मुंबई - बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून आज शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तीन वाहनांना पाठीमागून धडक दिली. सुदैवाने ह्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी यातील दोन कारचे मात्र मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. एका टेम्पो ट्रॅव्हलरचे किरकोळ नुकसान झाले आहे .

अपघातानंतर टँकरचालक टँकरसह पळून जात असताना नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत. गेल्या रविवारपासून या परिसरात अपघातांची मालिका सुरू असून रविवारी त्याच परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात होऊन १३ प्रवासी जखमी झाले होते तर एका दुचाकीस्वाराला आपला प्राण गमवावा लागला होता. मंगळवारी दोन अपघात झाले होते. यात ५ वाहनांचे नुकसान झाले होते.

“राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने योजलेल्या उपायांमुळे गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत नवले पुलाजवळ यंदा अपघात कमी झाले आहे. मात्र, रविवारी झालेला अपघात भीषण होता. त्यामुळे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी आणखी प्रभावी उपाययोजना अमंलात आणण्यासाठी सेव्ह लाईफ या स्वयंसेवी संस्थेला काम देण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात त्यांचा अहवाल येईल. मात्र, त्यापूर्वी कात्रज बोगदा ते नवले पूल या सात किलोमीटरच्या परिसरात जड वाहनांसाठी उजव्या बाजुला स्वतंत्र लेन करण्यात येईल,” अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

नवले पुलाच्या अपघातानंतर पाटील यांनी सर्व संबंधितांची शुक्रवारी बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “नवले पुलावर रविवारी झालेला अपघात हा नऊ महिन्यांनंतरचा मोठा अपघात आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा अपघातांत मोठी घट झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने योजलेल्या उपाययोजनांमुळे हे प्रमाण घटले आहे. मात्र, यापुढे अपघात होऊ नयेत यासाठी आणखी उपाययोजना योजण्यात येतील. त्यासाठी सेव्ह लाईफ या स्वयंसेवी संस्थेला अभ्यास करण्याचे करण्याचे सांगितले आहे. त्यांचा अहवाल आठवडाभरात येईल. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

आजच्या बैठकीत त्यांनी कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या सात किलोमीटरच्या पट्ट्यात जड वाहनांसाठी उजव्या बाजूला स्वतंत्र लेन करावी. कारण काही अंतरानंतर डाव्या बाजूने शहरातील वाहतूक या महामार्गावर येते. त्यामुळे हा उपाय त्यांनी सुचविला आहे. तसेच बोगद्याच्या सुरुवातीला एक चेकपोस्ट तयार करण्याचे ठरले आहे. त्यात २४ तास पोलिसांची उपस्थिती राहील. तेथे चालकांना सुचना देण्यात येतील. या सात किलोमीटरच्या पट्ट्यात विविध भागांतील सुचना फलकही लावण्यात येतील. काही ठिकाणी चालकांना सुचना देण्यासाठी उद्घोषणा बुथ उभारण्यात येणार आहेत. वेगाला अडथळा आणण्यासाठी जास्त उंचीचे रम्बलर स्ट्रीप ठराविक अंतरात टाकण्यात येतील. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी स्कायवॉकही उभारण्यात येतील.”

अपघात कमी होण्याची आशा

नवले पुलावर जास्त उतार असल्याने अपघात होत आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तर हा उतार योग्य असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे. या दोघांमध्ये मतभेद आहेत. मात्र, नवले पूल पाडणे हा त्यावरचा उपाय नाही, असे स्पष्ट करत पाटील यांनी सेव्ह लाईफ संस्थेकडून आलेल्या उपायांमुळे अपघात कमी होतील अशी आशा व्यक्त केली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी