शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

'नवले पुलावरील अपघातांची मालिका कधी थांबणार?'; शिवसेनेकडून जनआक्रोश आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 16:49 IST

सातत्याने होत असलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन   

धायरी :  मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अपघात होत असून यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. परंतु या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आतापर्यंत कोणत्याच ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या बेजबाबदार प्राधिकरणाचा निषेध करण्यासाठी वारजे येथील राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयावर शिवसेनेकडून जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी प्राधिकरणाकडून तात्काळ उपाययोजना न केल्यास अधिकाऱ्यांना काळे फासून मनुष्यवधचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाईल, असा इशारा शिवसेना नेते निलेश गिरमे यांनी दिला आहे.

मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी एका अपघातात तीन निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या महामार्गावर असलेल्या तीव्र उतारामुळे हा अपघात झाला. या उतारामुळे गेल्या काही वर्षात सातत्याने या महामार्गावर अपघात होत आहेत. परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. अधिकारी फक्त आश्वासने देत आहेत, बैठक घेत आहेत, अहवाल मागवलं आहेत परंतु अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे या बेजबाबदार प्राधिकरणाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.

प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी प्रतीकात्मक तिरडी आणि पोतराज यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन केले. यावेळी विजय कणसे, नीलेश पोळ, वैभव थोपटे, लोकेश राठोड, आदित्य वाघमारे, शुभम देशभ्रतार, गौरव देशभ्रतार, सार्थक जाधव, आकाश चव्हाण आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Puneपुणेkhadakwasala-acखडकवासलाAccidentअपघातShiv Senaशिवसेना