शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
5
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
8
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
9
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
10
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
11
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
12
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
14
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
15
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
16
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
17
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
18
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
19
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
20
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संतसाहित्यामध्ये निर्मितीचा गाभा : डॉ. तारा भवाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 13:08 IST

श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटी, आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने आळंदी येथे आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी संमेलनाध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देआळंदीत पसायदान विचार साहित्य संमेलनविज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी आपल्याला संतसाहित्याची ओढसंतांबाबत स्त्री-पुरुष असा भेद अध्यात्ममार्गात शिल्लक राहत नाही

पुणे : विज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी आपल्याला संतसाहित्याची ओढ लागते. कारण संतसाहित्यामध्ये निर्मितीचा गाभा आहे. संतसाहित्याचे मूल्यमापन खोलवर रुजले आहे. ते प्रवाही आहे. संतांनी आध्यात्मिक लोकशाही निर्माण करून सर्वसामान्यांना अध्यात्माची वाट मोकळी करून दिली, अशी भावना पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केली.     श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटी, आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने आळंदी येथे आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी संमेलनाध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी विद्यमान संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी नगराध्यक्ष बबन कुराडे पाटील, विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळा प्रमुख अ‍ॅड. विकास ढगे पाटील, विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी,  ह.भ.प. शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.  प्रा. वसंत आबाजी डहाके म्हणाले, ‘काळ बदलतो तशी काळानुसार स्थिती, पर्यावरण-वातावरण बदलते. आजच्या काळात सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय भ्रम आपल्यासमोर उभे केले जात आहेत. या भ्रमातून बाहेर काढण्याचे काम लेखक, कवी, विचारवंत आणि सर्जनशील कलाकारांना करायचे आहे. हे काम करताना आपल्या पाठीशी काळाचे चढ-उतार पचवून मनाची शांती ज्यांनी बिघडवू दिली नाही, असा श्री ज्ञानदेवरायांसारखा भक्कम वारसा आहे, हे कायम लक्षात ठेवावे. बाजारी, उपभोगवादी व असहिष्णू बनत चाललेल्या समाजाला सहजीवनाचे, सहअस्तित्वाचे मर्म समजून सांगण्याचे हे काम ज्ञानदेवासारखा कवीच करू शकतो.’ लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले,  ‘ज्ञानेश्वरांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ अशा विचारांनी विश्वात्मक देवाकडे जगाच्या कल्याणासाठी धर्म, जात, पंथ या मर्यादा ओलांडत पसायदान मागितले आहे. त्यामुळे ही एक सर्वश्रेष्ठ प्रार्थना आहे आणि ती प्रत्येक धर्माला आपली वाटू शकते. समाजाचा विध्वंस करणारी मनातली तामसीवृत्ती नष्ट होऊन मानव प्राण्यात बंधुभाव, प्रेम व स्नेह निर्माण व्हावा व त्याने आपल्या बुद्धी कुवतीप्रमाणे सत्कार्य करावे, हा पसायदानाचा विचार आणि वारकरी संप्रदायाचा पाया आहे.’ प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.झुगारल्याखेरीज अंतिममुक्तीचा मार्ग खुला होत नाही...भवाळकर म्हणाल्या, संतांबाबत स्त्री-पुरुष असा भेद अध्यात्ममार्गात शिल्लक राहत नाही. व्यावहारिक पातळीवर स्त्री-पुरुष हे द्वंद्व सतत प्रश्नचिन्हे निर्माण करते. झुगारल्याखेरीज अंतिममुक्तीचा मार्ग खुला होत नाही. ज्ञात-अज्ञात भयापासून मुक्ती मिळत नाही. विश्वातील द्वंद्व परमार्थक्षेत्रात मांडण्याची विशिष्ट परिभाषा आहे. स्त्री मोठ्या संतपदाला पोहोचू शकते याचे उत्तर म्हणजे संत बहिणाबाईंची चरित्रानुभवगाथा आहे. त्यांचा संघर्ष संत तुकोबारायांच्या संघर्षाशी खूप जवळचे नाते सांगतो. 

टॅग्स :Alandiआळंदीliteratureसाहित्यMilind Joshiमिलिंद जोशी