शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

National Youth Day Special :चार हजार रोपांचा ‘जीव’ वाचवणारा ‘संरक्षक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 08:05 IST

गेल्या वर्षी चौदा हजार रोपे लावली. त्यातली आता मोठ्या कष्टाने चार हजार वाचली आहेत. त्यांना काय बी करून मी वाचविणार आहे. यंदा पाऊसच कमी पडल्याने लय हाल होत आहेत.

श्रीकिशन काळे 

पुणे : गेल्या वर्षी चौदा हजार रोपे लावली. त्यातली आता मोठ्या कष्टाने चार हजार वाचली आहेत. त्यांना काय बी करून मी वाचविणार आहे. यंदा पाऊसच कमी पडल्याने लय हाल होत आहेत. पण जेवढी रोपे जगवता येतील, तेवढी मी जगविण्याचा प्रयत्न करतोय, या भावना आहेत एका तरूण वन विभागातील गार्डच्या. ३१ वर्षीय वनरक्षक रोहन दत्तात्रेय इंगवळे असे त्याचे नाव असून, तो या रोपांनी जगावे म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. 

          पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डाळज येथील वन परिसरात तो काम करीत आहे. वन विभागातर्फे १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. त्यासाठी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोपे लावण्यात आली. परंतु, अनेक रोपे पाण्याविना जळून गेली आहेत. बरीच रोपे प्राण्यांमुळे मोडली आहेत. इंदापूर तालुक्यातील डाळज वन परिसरात गेल्या वर्षी सुमारे १४ हजार रोपे लावली. या रोपांना पाणी देण्याचे काम फॉरेस्ट गार्ड रोहन इंगवळे करीत आहेत. ते म्हणाले,‘‘सध्या पाण्याची खूप टंचाई आहे. आठवड्यातून तीन दिवस पाणी देण्यासाठी वेळ मिळतो. ’’ दरम्यान, परसवाडी वन विभागात गार्ड तानाजी रमेश पिचड आणि शिर्सफळ वन विभागात प्रतिक्षा सुभाष खोमणे देखील अशाच प्रकारची मेहनत घेत असल्याचे इंगवळे यांनी सांगितले. 

आठवड्यातून तीन दिवसच पाणी...

          उजनी धरणातून जी पाइपलाइन पुढे सोलापूरकडील गावांसाठी गेली आहे, त्या पाइपलाइनला वन परिसरात चार ठिकाणी व्हॉल्व लावले आहेत. त्या व्हॉल्वमधून झाडांना पाणी दिले जाते. परंतु, आठवड्यातून तीनच दिवस पाणी सोडले जाते. त्यामुळे तीनच दिवस झाडांना पाणी द्यावे लागते. एका रोपाला महिन्यातून एकदा किंवा दोनदा पाणी दिले तरी चालते. त्यामुळे तीन दिवसांत काही झाडांना पाणी दिल्यानंतर दुसºया आठवड्यात इतर झाडांना देतो. व्हॉल्वपासून दूर असणाºया झाडांना आता बाटली लावून पाणी देणार आहे. त्यासाठी बाटल्या जमा करीत असल्याचे इंगवळे यांनी सांगितले.  

पाणीच नसल्याने काहीच करू शकत नाही

     डाळजला पूर्वी टॅँकरने पाणी दिले जात होते. परंतु, ते बंद झाले आहे. त्यामुळे आता आम्हालाच पाण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. पाणी नसल्याने रोपे जळून जात आहेत. आता ४ हजारच्या जवळपास रोपे जीवंत आहेत. रोपे जळाली की वाईट वाटतं. पण पाणीच नसल्याने काहीच करू शकत नाही. 

- आर. डी. इंगवळे, फॉरेस्ट गार्ड, डाळज वन विभाग  

टॅग्स :environmentवातावरणdroughtदुष्काळ