शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

National Youth Day : अक्षरांची ओळख करून देणारा आमीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 2:47 PM

वाचनाच्या माध्यमातून शिक्षण, मूल्ये आणि विवेकी विचाराच्या प्रसाराचे उद्दिष्ट समोर ठेवून आमीर शेख हा पंचवीशीतील उत्साही तरुण काम करीत आहे. आपल्या पुस्तकांच्या आणि चित्रपटांच्या वेडातून त्याने अक्षरमित्र नावाची एक चळवळ सुरू केली. 

पुणे : वाचनाच्या माध्यमातून शिक्षण, मूल्ये आणि विवेकी विचाराच्या प्रसाराचे उद्दिष्ट समोर ठेवून आमीर शेख हा पंचवीशीतील उत्साही तरुण काम करीत आहे. आपल्या पुस्तकांच्या आणि चित्रपटांच्या वेडातून त्याने अक्षरमित्र नावाची एक चळवळ सुरू केली. 

          लोकांना वाचनाची आवड असते, पण त्यांना नेमके काय वाचायचे हे उमजत नाही. तसेच आवडेचे साहित्य कोठून मिळवायचे हेही माहिती नसते. वाचक आणि पुस्तके यांच्यामधील दुवा होण्याचे काम अक्षरमित्र ही चळवळ करीत आहे. शालेय स्तरातील मुलांना उत्तम मूल्यबिंदू असणारी पुस्तके, नियतकालिकेपोचवणे आणि त्यांना पडणा-या प्रश्नांना उत्तरे देणे हे या चळवळीचे उद्देश. अक्षरमित्रचे काम चालू केले त्यावेळी अमीरचे वय अवघे १९ होते. त्यावेळी तो तो मेडिकलची सीटसोडून नगरमध्ये आला होता. काय करावे हे माहिती नव्हते पण काय करायचे नाही हे त्याने पक्के  केले होते. पुस्तकांच्या आवडीतून आणि सध्याच्या शैक्षणिक परिस्थितीकडे पाहून त्याला अक्षरमित्रची कल्पना सुचली होती. पार्टटाईम म्हणून काम सुरू केले तेव्हा चुका करण्याच्या हाच आपला हक्काचा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे जास्तीत जास्त चुका (प्रयोग) करा आणि शिका असा पवित्रा अक्षरमित्र सुरू करताना त्याने घेतला. त्यामुळे पार्टटाइम म्हणून सुरू केलेली गोष्ट फुलटाईम कधी झाली हे त्याला कळलेच नाही. आमीर ध्यास घेऊन कामाला लागला खरा. मात्र सुरुवातीला त्याला पुस्तके कोठून मिळवायची हेही ठाऊक नव्हते. पुण्यात प्रकाशन संस्था अधिक असल्याने नगरहून तो पुण्यात येऊ लागला. सुरुवातीला त्यातील गणित कळत नव्हते. प्रकाशकही फारसे दाद देईनात, तरीही त्याने चिकाटी सोडली नाही. तो शहरातील एका प्रकाशन संस्थेतून दुस-या प्रकाशन संस्थेकडे फिरत राहीला, नवीन माहिती मिळेल तिकडे धाव घेत असे. त्याच्यावर साधना साप्ताहिकाने सर्वांत पहिल्यांदा विश्वास टाकला.  

      हे सर्व सुरू असताना शिक्षणही चालू होतेच. असंघटितपणे काम करीत असताना तो एका अशा टप्प्यावर आलो होतो की आता अत्यंत संघटीत पद्धतीने मोठी सुरूवात करायची आहे. त्या काळात काही कोटी रुपयांची गुंतवणूक असलेली एक संधी चालून आली. तेव्हा त्याच्या मनात काय घटले याबाबत अमीरने सांगितले की, मी जे करायला चाललो आहे. त्याचसाठी ही सुरुवात केली होती ना? आणि मग लक्षात आले की, आपल्याला पुस्तक विक्रीमधील ब्रँड व्हायचे नाहीये. शिक्षणामध्ये मूलभूत संशोधन आणि काम व्हावे आणि नोकरीसाठी, पैशांसाठी शिक्षण यावरून मुल्यांसाठी, जगण्यासाठी शिक्षण असा प्रवास व्हावा. हाच कामाचा उद्देश होता.

               डॉ. अनिल सन्दोपालन, अरविंद गुप्ता, एकलव्य भोपाळसारख्या संस्था आमच्या आदर्श स्थानी होत्या. सध्या आहे तो प्रवास थांबवून एक नवा प्रवास सुरू झाला आहे. पुस्तक आणि सिनेमा यांना घेऊन काम करायचे आहे. त्यामुळे पून्हा नवीन अक्षरमित्र घेऊन येण्याचा मानस आहे. सध्या देशभर फिरतोय, लोकांमधे जाऊन राहून त्यांना समजून घेतोय, वाचतोय, जगभरातील सिनेमा सोबत आहेच. हेच आता माझं विद्यापीठ आहे. हीच शिकण्याची माझी पद्धत आहे. कुठे जाणार हे माहिती नाही ते मी ठरवतही नाही. मुक्कामापेक्षा मला प्रवास महत्त्वाचा वाटतोय, आणि त्या प्रवासाचा मी आनंद घेतोय.  

टॅग्स :cultureसांस्कृतिकsocial workerसमाजसेवक