शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

राष्ट्रीय पक्षी मोरांची पाण्यासाठी भटकंती, वन कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 17:48 IST

तीव्र उन्हाळ्याच्या दिवसांत मुक्या प्राण्यांसाठी बनवलेल्या पाणवठ्यात वन विभागाला पाणी टाकण्याचा विसर पडला असून, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने मोरांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाले असल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देरानडुक्कर, मोर, लांडोर आदी प्राणी हा परिसर सोडून पाण्यासाठी भटकंती या क्षेत्रातील सर्व पाणवठ्यांत वाट्यात पाणी साठवण लवकरात लवकर करण्यात येणार

दावडी : खरपुडी (खुर्द) (ता. खेड)  येथील वन विभाग क्षेत्रात मुक्या जिवांची पाण्यासाठी भटकंती सुरू असून, उन्हाळ्यामुळे वन विभागाने सुरू केलेले कृत्रिम पाणवठे तयार केले पण त्यात पाणी कुणी टाकायचे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रीय पक्षी मोर यांची पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे .      खरपुडी खुर्द येथे ६३ हेक्टर वनक्षेत्र आहे. हे क्षेत्र शिरोली वन विभागाच्या ताब्यात आहे. हा वन विभाग सदैव गजबजलेला असतो. या विभागात मोरांची संख्या वाढली आहे. सकाळ, संध्याकाळ येथे हे मोरांचे दर्शन घडत आहे. वन विभागाने कृत्रिम पद्धतीचे पाणवठे उभारले आहेत.  या तीव्र उन्हाळ्याच्या दिवसांत मुक्या प्राण्यांसाठी बनवलेल्या पाणवठ्यात वन विभागाला पाणी टाकण्याचा विसर पडला असून, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने मोरांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाले असल्याचे चित्र दिसत आहे. वन क्षेत्रातील अनेक प्राणी पाणवठ्याकडे पाणी पिण्यासाठी येतात मात्र तिथे पाणी नसल्यामुळे आल्या पावली परत जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे रानडुक्कर, मोर, लांडोर आदी प्राणी हा परिसर सोडून पाण्यासाठी भटकंती करीत आहे. काही मोरांचे कळप खरपुडी येथील शेतात फिरताना दिसत आहेत. परिणामी मोकाट कुत्र्यांचे या मोरांवर हल्ल्यांची घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन विभागाने कृत्रिम पद्धतीचे मोरांसाठी पाणी पिण्यासाठी पाणवठे तयार केले. मात्र, यामध्ये पाणी कोणी टाकायचे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वन विभागाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. वन विभागाने मागील वर्षी खंडोबा मंदिराच्या पाठीमागे चार कृत्रिम पद्धतीचे पाणवठे तयार केले. त्यामध्ये हे पाणी टाकण्याची तसदी वन कर्मचारी घेत नसल्याचे दिसून येत आहे. खंडोबा मंदिरातील पुजारी राजेश गाडे हे रोज मोरांना सकाळ संध्याकाळ अन्नधान्य व कृत्रिम पाणवठे पाण्याने भरतात मात्र, खंडोबा देवाच्या मंदिराकडे रोज दिवसभर भाविक दर्शनासाठी येत असल्यामुळे मोर तिकडे फिरकत नाहीत. त्यामुळे मोरांना पाणी पिण्यास व अन्नधान्य खाण्यास मिळत नाही. तसेच वन विभागाने अर्धा किलोमीटर अंतरावर दोन कृत्रिम पाणवठे तयार केले मात्र त्यामध्ये पाणीच नसल्यामुळे वन्यजीव धोक्यात आला असल्याचे खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष  काकासाहेब खाडे, राजेश गाडे व ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ......................................................याबाबत शिरोलीअंतर्गत वन विभागाशी संपर्क केला असता, हे कृत्रिम पाणवठे ड्रम कापून तयार केले आहेत, त्याचाच अजून खर्च मिळाला नाही. मात्र वन विभागाच्या या क्षेत्रातील सर्व पाणवठ्यांत वाट्यात पाणी साठवण लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे वनपाल सीमा सपकाळ यांनी सांगितले. ...................

              

 

 

टॅग्स :Khedखेडforestजंगलforest departmentवनविभागWaterपाणी