शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

राष्ट्रीय पक्षी मोरांची पाण्यासाठी भटकंती, वन कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 17:48 IST

तीव्र उन्हाळ्याच्या दिवसांत मुक्या प्राण्यांसाठी बनवलेल्या पाणवठ्यात वन विभागाला पाणी टाकण्याचा विसर पडला असून, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने मोरांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाले असल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देरानडुक्कर, मोर, लांडोर आदी प्राणी हा परिसर सोडून पाण्यासाठी भटकंती या क्षेत्रातील सर्व पाणवठ्यांत वाट्यात पाणी साठवण लवकरात लवकर करण्यात येणार

दावडी : खरपुडी (खुर्द) (ता. खेड)  येथील वन विभाग क्षेत्रात मुक्या जिवांची पाण्यासाठी भटकंती सुरू असून, उन्हाळ्यामुळे वन विभागाने सुरू केलेले कृत्रिम पाणवठे तयार केले पण त्यात पाणी कुणी टाकायचे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रीय पक्षी मोर यांची पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे .      खरपुडी खुर्द येथे ६३ हेक्टर वनक्षेत्र आहे. हे क्षेत्र शिरोली वन विभागाच्या ताब्यात आहे. हा वन विभाग सदैव गजबजलेला असतो. या विभागात मोरांची संख्या वाढली आहे. सकाळ, संध्याकाळ येथे हे मोरांचे दर्शन घडत आहे. वन विभागाने कृत्रिम पद्धतीचे पाणवठे उभारले आहेत.  या तीव्र उन्हाळ्याच्या दिवसांत मुक्या प्राण्यांसाठी बनवलेल्या पाणवठ्यात वन विभागाला पाणी टाकण्याचा विसर पडला असून, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने मोरांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाले असल्याचे चित्र दिसत आहे. वन क्षेत्रातील अनेक प्राणी पाणवठ्याकडे पाणी पिण्यासाठी येतात मात्र तिथे पाणी नसल्यामुळे आल्या पावली परत जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे रानडुक्कर, मोर, लांडोर आदी प्राणी हा परिसर सोडून पाण्यासाठी भटकंती करीत आहे. काही मोरांचे कळप खरपुडी येथील शेतात फिरताना दिसत आहेत. परिणामी मोकाट कुत्र्यांचे या मोरांवर हल्ल्यांची घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन विभागाने कृत्रिम पद्धतीचे मोरांसाठी पाणी पिण्यासाठी पाणवठे तयार केले. मात्र, यामध्ये पाणी कोणी टाकायचे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वन विभागाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. वन विभागाने मागील वर्षी खंडोबा मंदिराच्या पाठीमागे चार कृत्रिम पद्धतीचे पाणवठे तयार केले. त्यामध्ये हे पाणी टाकण्याची तसदी वन कर्मचारी घेत नसल्याचे दिसून येत आहे. खंडोबा मंदिरातील पुजारी राजेश गाडे हे रोज मोरांना सकाळ संध्याकाळ अन्नधान्य व कृत्रिम पाणवठे पाण्याने भरतात मात्र, खंडोबा देवाच्या मंदिराकडे रोज दिवसभर भाविक दर्शनासाठी येत असल्यामुळे मोर तिकडे फिरकत नाहीत. त्यामुळे मोरांना पाणी पिण्यास व अन्नधान्य खाण्यास मिळत नाही. तसेच वन विभागाने अर्धा किलोमीटर अंतरावर दोन कृत्रिम पाणवठे तयार केले मात्र त्यामध्ये पाणीच नसल्यामुळे वन्यजीव धोक्यात आला असल्याचे खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष  काकासाहेब खाडे, राजेश गाडे व ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ......................................................याबाबत शिरोलीअंतर्गत वन विभागाशी संपर्क केला असता, हे कृत्रिम पाणवठे ड्रम कापून तयार केले आहेत, त्याचाच अजून खर्च मिळाला नाही. मात्र वन विभागाच्या या क्षेत्रातील सर्व पाणवठ्यांत वाट्यात पाणी साठवण लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे वनपाल सीमा सपकाळ यांनी सांगितले. ...................

              

 

 

टॅग्स :Khedखेडforestजंगलforest departmentवनविभागWaterपाणी