शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

नरेंद्र मोदींची गॅरंटी जनतेसाठी नसून ती फक्त भाजपा आणि स्वत:साठीच- शशी थरूर

By राजू इनामदार | Updated: May 6, 2024 20:11 IST

इंडिया फ्रंटमधील सर्व नेते एकत्र बसून पंतप्रधानपदाचा निर्णय घेतील, आम्ही आतापासूनच त्यासाठी का बोलणी करू? असा प्रश्न थरूर यांनी केला...

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी गॅरंटी, गॅरंटी असे सांगत आहेत, मात्र त्यांची ही गॅरंटी जनतेच्या हितासाठी नाही, ती त्यांच्या स्वत:साठी व पक्षासाठी आहे अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केली. इंडिया फ्रंटमधील सर्व नेते एकत्र बसून पंतप्रधानपदाचा निर्णय घेतील, आम्ही आतापासूनच त्यासाठी का बोलणी करू? असा प्रश्न थरूर यांनी केला.

महाविकास आघाडीचे पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ थरूर यांनी सोमवारी काँग्रेसभवनमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. उमेदवार धंगेकर, माजी मंत्री अनिल देशमुख, काँग्रेसचे माजी आमदार उल्हास पवार, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, युवक काँग्रेसचे केंद्रीय पदाधिकारी आशिष दुआ व अन्य स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी देशातील काही धनिक व्यक्तींसाठी म्हणून काम करत आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी त्यांच्याकडे काहीही नाही. मागील १० वर्षांत त्यांनी देशाच्या समस्या वाढवल्या आहेत अशी टीका करून थरूर म्हणाले, ‘देशात त्यांच्याविरोधात वातावरण तापत चालले आहे. याचे कारण सामान्य जनतेसाठी ते काहीही करायला नाही. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कुठेही मुस्लिम शब्दाचा साधा उल्लेखसुद्धा नाही. जाहीरनाम्यात नसलेल्या गोष्टी ते जनतेला सांगत आहेत. हा दिशाभूल करण्याचाच प्रकार आहे.

काँग्रेसचे राज्यातील विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांना मारण्यात आलेली गोळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका अधिकाऱ्याची होती असा आरोप केला. त्यावर बोलताना थरूर म्हणाले, हा आरोप गंभीर आहे. करकरे यांच्या कुटुंबाबरोबर चांगला परिचय होता. वड्डेटीवार असे बोलले असतील तर त्याची चौकशी व्हायला हवी.

इंडिया फ्रंटने पंतप्रधानपदासाठीचा उमेदवार जाहीर केलेला नाही याकडे लक्ष वेधले असता थरूर यांनी आम्ही असे कशासाठी करू असा प्रतिप्रश्न केला. लोकशाही वाचवण्यासाठी म्हणून आम्ही काही समान उद्देशांनी एकत्र आलो आहोत. निवडणूक लढवत आहोत. देशात आम्हाला चांगले वातावरण आहे. निवडून आल्यानंतर सर्व पक्षाचे नेते एकत्र बसतील, बैठक घेतील, त्यामध्ये पंतप्रधान कोण याची चर्चा होईल व एकमताने नाव ठरेल. तिवारी यांनी प्रास्ताविक केले.

केरळ राज्याचे तब्बल दीड लाख रहिवासी पुण्यात आलेत. त्यांचा मेळावा थरूर यांनी घेतला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत आले. धंगेकर यांचा माझा शब्द या जाहीरनाम्याचे त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. धंगेकर यांनी निरोगी, आनंदी, सुरक्षित पाण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड