शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
3
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
4
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
5
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
6
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
7
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
9
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
10
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
11
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
12
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
13
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
14
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
15
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
16
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
17
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
18
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
19
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
20
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले

नरेंद्र मोदींची गॅरंटी जनतेसाठी नसून ती फक्त भाजपा आणि स्वत:साठीच- शशी थरूर

By राजू इनामदार | Updated: May 6, 2024 20:11 IST

इंडिया फ्रंटमधील सर्व नेते एकत्र बसून पंतप्रधानपदाचा निर्णय घेतील, आम्ही आतापासूनच त्यासाठी का बोलणी करू? असा प्रश्न थरूर यांनी केला...

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी गॅरंटी, गॅरंटी असे सांगत आहेत, मात्र त्यांची ही गॅरंटी जनतेच्या हितासाठी नाही, ती त्यांच्या स्वत:साठी व पक्षासाठी आहे अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केली. इंडिया फ्रंटमधील सर्व नेते एकत्र बसून पंतप्रधानपदाचा निर्णय घेतील, आम्ही आतापासूनच त्यासाठी का बोलणी करू? असा प्रश्न थरूर यांनी केला.

महाविकास आघाडीचे पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ थरूर यांनी सोमवारी काँग्रेसभवनमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. उमेदवार धंगेकर, माजी मंत्री अनिल देशमुख, काँग्रेसचे माजी आमदार उल्हास पवार, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, युवक काँग्रेसचे केंद्रीय पदाधिकारी आशिष दुआ व अन्य स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी देशातील काही धनिक व्यक्तींसाठी म्हणून काम करत आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी त्यांच्याकडे काहीही नाही. मागील १० वर्षांत त्यांनी देशाच्या समस्या वाढवल्या आहेत अशी टीका करून थरूर म्हणाले, ‘देशात त्यांच्याविरोधात वातावरण तापत चालले आहे. याचे कारण सामान्य जनतेसाठी ते काहीही करायला नाही. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कुठेही मुस्लिम शब्दाचा साधा उल्लेखसुद्धा नाही. जाहीरनाम्यात नसलेल्या गोष्टी ते जनतेला सांगत आहेत. हा दिशाभूल करण्याचाच प्रकार आहे.

काँग्रेसचे राज्यातील विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांना मारण्यात आलेली गोळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका अधिकाऱ्याची होती असा आरोप केला. त्यावर बोलताना थरूर म्हणाले, हा आरोप गंभीर आहे. करकरे यांच्या कुटुंबाबरोबर चांगला परिचय होता. वड्डेटीवार असे बोलले असतील तर त्याची चौकशी व्हायला हवी.

इंडिया फ्रंटने पंतप्रधानपदासाठीचा उमेदवार जाहीर केलेला नाही याकडे लक्ष वेधले असता थरूर यांनी आम्ही असे कशासाठी करू असा प्रतिप्रश्न केला. लोकशाही वाचवण्यासाठी म्हणून आम्ही काही समान उद्देशांनी एकत्र आलो आहोत. निवडणूक लढवत आहोत. देशात आम्हाला चांगले वातावरण आहे. निवडून आल्यानंतर सर्व पक्षाचे नेते एकत्र बसतील, बैठक घेतील, त्यामध्ये पंतप्रधान कोण याची चर्चा होईल व एकमताने नाव ठरेल. तिवारी यांनी प्रास्ताविक केले.

केरळ राज्याचे तब्बल दीड लाख रहिवासी पुण्यात आलेत. त्यांचा मेळावा थरूर यांनी घेतला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत आले. धंगेकर यांचा माझा शब्द या जाहीरनाम्याचे त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. धंगेकर यांनी निरोगी, आनंदी, सुरक्षित पाण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड