शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
3
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
5
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
6
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
7
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
8
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
9
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
10
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
11
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
12
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
13
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
14
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
16
लोकसंख्यावाढीसाठी गर्भनिरोधकं केली महाग!
17
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
18
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
19
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
20
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
Daily Top 2Weekly Top 5

मोदी हे विकासाच्या दिशेने चाललेले घोडेस्वार; राहुल गांधींमध्ये त्यांना अडवण्याची ताकद नाही - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 20:10 IST

काँग्रेस साठ ते सत्तर वर्षे सत्तेत राहूनही गरिबी हटवण्यात त्यांना यश आले नाही

बारामती : इंदीरा गांधी यांनी त्यांच्या काळात गरीबी हटावचा नारा दिला. मात्र, ६० ते ७० वर्ष सत्तेत राहुन त्यांना ते जमले नाही. गरिबी हटविण्यात त्यांना यश आले नाही. भ्रष्टाचार करत काॅंग्रेस पुढे जात राहिली, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काॅंग्रेसवर टीका केली.

बारामती येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आठवले बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री आठवले पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाच्या दिशेने चाललेले मोठे घोडेस्वार आहेत. मोदी यांचा घोडा अडविण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांच्याकडुन होत आहे. मात्र, राहुन गांधी यांच्यात तेवढी ताकत नाही. तसा प्रयत्न झाल्यास त्यांना तुडवत मोदींचा घोडा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, असा टोला आठवले यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले,आम्ही गरीब आहोत, पण आम्ही इमानदार आहोत. ज्यांच्याशी नाते जोडतो, त्यांना आम्ही धोका देत नाही. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मान राखुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी एकनिष्ठ राहुन आम्ही महाराष्ट्रात राजकारण केल्याचे आठवले म्हणाले. उध्दव ठाकरे यांचा थयथयाट चाललेला आहे. संजय राऊत आज उलटसुलट भाषा वापरतात. महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे, असे ते म्हणतात. मात्र, आम्ही कोणाचा पक्ष फोडलेला नाही. एकनाथ शिंदे त्यांचे आमदार घेऊन आमच्याकडे आले. उध्दव ठाकरे आम्हाला सोडुन काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसबरोबर गेले, ती गध्दारी नव्हती का, तुम्ही असे करणे अपेक्षित नव्हते, असा सवाल यावेळी आठवले यांनी केला. अगोदर ठाकरे यांनी गध्दारी केली. भाजपच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसल्याचे आठवले म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती...भीमशक्तीची भुमिका मांडली. त्याला आम्ही पाठींबा दिला. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. ठाकरे आमच्यासोबत असते तर धनुष्यबाण कोणी हिरावुन घेवु शकले नसते. त्यांच्या ५४ आमदारांपैकी पैकी ४० आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. बहुमत त्यांच्याकडे असल्याने चिन्ह त्यांना मिळाले, हा कायदा असल्याचे आठवले म्हणाले. अजित पवार देखील ४२ आमदार घेऊन आले. कोणाला भीती दाखविण्याची आवश्यकता नव्हती. पवार यांच्या मनात भाजपसमवेत जायचे होते, असे देखील आठवले यांनी सांगितले.

भाषणात आठवलेंच्या कविता 

१)बरीच वर्ष मी होतो माननीय शरद पवार साहेबांचा साथी.. पण  आता मी आहे अजितदादांचा साथी...त्यामुळे सुनेत्रा पवार यांना निवडुन आणण्यासाठी आलेलो आहे बारामती...नरेंद्र मोदींनी वाढविली विकासाची गती...म्हणुन बारामतीत विजयी होणार महायुती.

२)लढाइ आहे पवार विरुध्द पवारआमच्या वहिनीच होणार आहे लोकसभेवर संवार.

३) हम तो नही करते बात बडी बडीलेकीन चुनकर आनेवाली है सुनेत्रा पवार की घडी.

टॅग्स :Puneपुणेbaramati-pcबारामतीbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Sunetra Pawarसुनेत्रा पवारRamdas Athawaleरामदास आठवले