शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींनी मन की बातसोबत मणिपूरची देखील बात करा! पुण्यात मणिपुरी नागरिकांचे आंदोलन

By रोशन मोरे | Updated: June 28, 2023 15:00 IST

आम्ही भारताचे नागरिक नाही का? ''आमच्याकडे दुर्लक्ष करू नका, मौल्यवान जीव आणि घरे वाचवा”

पुणे: मणिपूरमध्ये पन्नास दिवसांहून अधिक काळ हिंसाचार सुरू आहे. शैक्षणिक संस्था बंद आहेत. जवळपास दोन महिने इंटरनेट बंद आहे. जीवनावश्यक वस्तू आणि आपत्कालीन वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. सरकारचा हेतू काय? शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा. सरकार गप्प का? आम्ही भारताचे नागरिक नाही का? मणिपूर हे छोटे राज्य आहे पण अनेक आंतरराष्ट्रीय खेळ, कला आणि संस्कृतीत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आमच्याकडे दुर्लक्ष करू नका, मौल्यवान जीव आणि घरे वाचवा” पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात करतात. त्यांनी मन की बात सोबत मणिपुरचीही बात करावी, अशी भावना जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणाऱ्या मणिपुरी आंदोलकांनी व्यक्त केली.

सोमवारी (दि.२६) मणिपूरमधील नार्को दहशतवादी आणि बेकायदेशीर स्थलांतरितांच्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालय मैतेई नुपी लुप, या संघटनेच्या वतीने या आंदोलनाचे करण्यात आले होते. हिंचाराता बळी पडलेल्यांना आंदोलनकांनी एक मिनिट मौन पाळून तसेच प्रार्थना करून श्रद्धांजली अर्पण केली.

आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या वक्तांनी सांगितले की, मणिपुरमधील हिंसाचाराला पन्नास दिवसांहून अधिक दिवस झाले तरी पंतप्रधान मौन बाळगून आहेत आणि त्यांनी शांतता किंवा सलोखा प्रस्थापित करण्यासाठी कोणतेही आवाहन केलेले नाही. १०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि ६० हजार लोक विस्थापित झाले आहेत. ते पुनर्वसन केंद्रांमध्ये आश्रय घेत आहेत, तर दररोज जोरदार गोळीबाराच्या बातम्या येत आहेत. मणिपूरच्या अनेक भागात अनेक सुरक्षा दले, जमाव जमवणे आणि चकमकी या युद्धासारख्या परिस्थितीत लोक जगत आहेत.

शांततेसाठी आवाहन

मणिपूरमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ आणि मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची मागणी आंदोलकांनी केली. 

टॅग्स :PuneपुणेagitationआंदोलनPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीSocialसामाजिक