शहरं
Join us  
Trending Stories
1
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
2
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
3
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
4
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
5
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
6
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
7
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
8
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
9
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
10
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
11
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
12
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
13
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
14
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
15
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
16
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
17
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
19
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
20
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?

सिमेंटीकरणाने मुठा नदीकाठच्या पाणथळ जागा नष्ट; संवर्धन करणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 20:04 IST

पर्यावणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या पाणथळ किंवा जलमयभूमी जपणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देसंवर्धन करायला हवे ; जीवसृष्टी, पक्ष्यांसाठी येथे परिसंस्था

पुणे : नदीकाठी पाणथळ जागा असेल, तर तिचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पण मुठा नदीच्या काठी सिमेंटने बांध घातला आहे. परिणामी पाणथळ जागा तयार होऊ शकत नाही. भविष्यात तर नदी सुधार योजनेतंर्गत अजून सिमेंटीकरण होईल. त्यामुळे अशी जागा नदीकाठी शोधूनही सापडणार नाही आणि पाणथळ जागेतील परिसंस्थाच नष्ट होणार आहेत.

पर्यावणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या पाणथळ किंवा जलमयभूमी (Wasteland) जपणे आवश्यक आहे. खरं तर या जागा निरूपयोगी समजल्या जातात. पण त्या पर्यावरणासाठी खूप उपयोगी आहेत.  मानवनिर्मित पाणथळ जागा जायकवाडी जलाशय, उजनी जलाशय येथे आहेत.  म्हणून येथे थंडीत खूप पक्षी खाद्याच्या शोधात येतात. परिसंस्थेतील हा एक घटक आहे. अनेक ठिकाणी या जागा बिनकामाच्या (माणसासाठी) म्हणून बुजवल्या गेल्या आहेत. नदीकाठ तर हमखास बुजवतात. सिमेंटीकरण करून काठ सुंदर करण्याच्या नादात या पाणथळ जागा नष्ट होत आहेत.===============जीवितनदीने तयार केली अशी जागा  पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे, त्यांचे संवर्धन व्हावे म्हणून पाणथळींबद्दल जाणीव जागृतीसाठी २ फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा होतो. जीवितनदीने विठ्ठलवाडी येथे अशी जागा तयार केली आहे. तिथे अनेक पक्षी येत आहेत. तशा जागा इतर ठिकाणी व्हायला हव्यात, असे प्रिया फुलंब्रीकर यांनी सांगितले.

==========================पाणथळ जागाचे उपयोग :* अन्न तयार होते व होतो साठा* अन्न साखळी निरोगी ठेवते* मासे व जलचर प्राण्यांचा अधिवास* पाणपक्ष्यांचं आश्रयस्थान*भूजलसाठा नियंत्रित होतो* गाळ धरून ठेवण्याची क्षमता=================जगातील ४०% सजीव हे पाणथळ प्रदेशावर जगतात. नदी, सरोवरे यांलगतचा दलदली प्रदेश हा परळ (Persicaria glabra), कमळ, हळदी-कुंकू, अझोला, पाणकणीस, पाणलवंग, हायड्रीला तसेच वाळुंज, कदंब, अर्जुन, जांभुळ, करंज अशा अनेक प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती व गवतांनी भरलेला असतो. त्या वनस्पतींवर जगणारे जलचर, प्राणी, पक्षी व कीटक हे तिथे नित्यनेमाने भेट देत असतात किंवा तिथेच वस्ती करून राहत असतात. तसेच हे दलदलीचे प्रदेश फ्लेमिंगो, स्पूनबील, आयबीस, चित्रबलाक अशा काही स्थलांतरित पक्ष्यांचे उत्तम आश्रयस्थान ठरतात. प्रदूषित पाणी गाळण्याचे कार्य याच वनस्पतींमार्फत होते. अशाप्रकारे जलप्रदूषण रोखण्यास व पर्यावरण शुद्ध करण्यास या पाणथळींचा हातभार लागतो.  -  प्रिया फुलंब्रीकर, जीवितनदी च्या संस्थापक सदस्य  व ग्रीन बर्ड्स अभियानाच्या संस्थापक  

टॅग्स :Puneपुणेriverनदीenvironmentपर्यावरण