शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

हिरव्या पुण्याची महापालिका ‘वाट’ लावतीये; पुणेकरांनीच आता हातात छडी घ्यावी - वंदना चव्हाण

By श्रीकिशन काळे | Updated: April 9, 2023 13:28 IST

पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी पुणेकरांनी एकत्र आलेचं पाहिजे

पुणे : ‘‘हिरव्या पुण्याची पुणे महापालिका ‘वाट’ लावत आहे. वेताळ टेकडीवरील प्रस्तावित रस्त्यामुळे खूप मोठे नुकसान होणार आहे. महापालिकेत केवळ प्रशासक असल्याने त्यांचेच राज चालत आहे. म्हणून मनमानी प्रमाणे निर्णय घेतले जात असून, त्यांना विरोध करणारे लोकप्रतिनिधी तिथे नाहीत. आता कोणत्याही माजी नगरसेवकाला महापालिकेत विचारले जात नाही. त्यामुळे पुणेकरांनीच आता हातात छडी घेऊन महापालिकेला जाब विचारला पाहिजे,’’ असे खासदार वंदना चव्हाण यांनी आवाहन केले.

वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या वतीने आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. त्या पर्यावरणाविषयी अधिक संवेदनशील असल्याने त्यांना समितीच्या वतीने आयोजित केलेल्या टेकडी बचाव कार्यक्रमात बोलवण्यात आले होते. त्या वेळी चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

चव्हाण म्हणाल्या, गेल्या काही वर्षांपासून पुण्याची अक्षरश: धुळधाण होत आहे. वाहनांची संख्या वाढतेय, पण पर्यावरण मात्र बिघडतेय. मुठा नदीची देखील वाईट अवस्था केली आहे. नदी पात्रात आता जाऊन पाहिल्यानंतर प्रचंड वेदना होतात. तिथे राडारोडा, सिमेंटचे मोठे पोल पडलेले आहेत. बंडगार्डनला जे काम सुरू आहे. त्यामुळे पुणेकरांना भविष्यात पुराचा फटका बसणार आहे. तरी देखील तो प्रकल्प रेटला जात आहे.’’

वेताळ टेकडी बचावसाठी नागरिक एकत्र येत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. पुणे हे टेकड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु, आता त्यावरही अतिक्रमण होत आहे. आताचा प्रस्ताव टेकडीला संपवणार आहे. भविष्यात पुण्याचे हवामान प्रचंड बदललेले असेल. त्यामुळे आताच पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी पुणेकरांनी एकत्र आले पाहिजे,’’ असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेVandana Chavanवंदना चव्हाणSocialसामाजिकPoliticsराजकारणenvironmentपर्यावरणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका