शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

MPSC Exam| मुंबई ‘मॅट’ ने राज्यातील ३४४ विद्यार्थी ठरवले अपात्र; काय आहे नेमकं प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 11:36 IST

अभिजित कोळपे पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चुकीच्या कारभारामुळे राज्यातील ३४४ तसेच इतर चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना फटका ...

अभिजित कोळपे

पुणे :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चुकीच्या कारभारामुळे राज्यातील ३४४ तसेच इतर चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. मुंबई उच्च न्यायालय तसेच औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाने संयुक्त पूर्व परीक्षेतील एकूण ३४४ विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेसाठी मागील आठवड्यातच पात्र ठरवले होते. मात्र, मुंबई मॅटने हा निकाल फिरवत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बाजूने दिल्याने या सर्व विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. त्यामुळे या ३४४ विद्यार्थ्यांसह इतर चार ते पाच हजार विद्यार्थी उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत.

उच्च न्यायालयात सुरूवातीस ८६ विद्यार्थ्यांना संयुक्त पूर्व परीक्षेतील मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवले हाेते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय (१६१), औरंगाबाद (८८) आणि नागपूर खंडपीठाने ९ असे २५८ विद्यार्थ्यांना मागील आठवड्यात झालेल्या सुनावणीत पात्र ठरवले होते. त्यामुळे एकूण ३४४ विद्यार्थी मुख्य परीक्षेला पात्र ठरवले होते.

संयुक्त पूर्व परीक्षेतील निकाल जाहीर करताना आयोगाने उत्तर सूची जाहीर करताना काही प्रश्नांची उत्तरे चुकीची जाहीर केली. याविरोधात विद्यार्थ्यांनी प्रथम तक्रार दाखल केली. त्यानंतर आयोगाने सुधारित दुसरी उत्तर सूची जाहीर केली. मात्र ही उत्तर सूचीही चुकीची जाहीर केल्याच्या तक्रार आल्या. त्यामुळे पुन्हा तिसरी उत्तरसूची आयोगाने जाहीर केली. मात्र, यामध्ये तर आधीच्या दोन उत्तरसूचीत बरोबर असलेले प्रश्नांची उत्तरे चुकीची तर चुकीच्या उत्तरांना बरोबर असल्याचे जाहीर केले.

मात्र, या सर्व प्रकारामुळे यादीतून बाहेर गेलेले जवळपास १ हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा यादीत समावेश झाला. तर ज्यांचा समावेश होता असे जवळपास ५०० हून अधिक विद्यार्थी यादीतून बाहेर फेकले गेले. याविरोधात विद्यार्थ्यांनी थेट उच्च न्यायालय तसेच औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. तेथे एकूण ३४४ विद्यार्थ्यांना पात्र ठरवले होते.

आयोगाने पुढाकार घेत चौथी खात्रीलायक उत्तरसूची जाहीर करून यावर तोडगा काढायला हवा. न्यायालयीन प्रक्रियेत दाद मागण्यासाठी सर्वच विद्यार्थी आर्थिक अडचणी अभावी जाऊ शकत नाही. अन्यथा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. राज्यातील चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी चौथी खात्रीलायक उत्तरसूची जाहीर करून विद्यार्थ्यांना कोर्टकचेरीपासून मुक्त करावे.

- एक विद्यार्थी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMPSC examएमपीएससी परीक्षाexamपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्र