शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

MPSC Exam| संयुक्त पूर्व परीक्षेतील आणखी १७० मुलांना संधी; इतरांना मुख्य परीक्षेसाठी संधी मिळणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 16:23 IST

आयोगाच्या चुकीच्या कारभारामुळे राज्यातील जवळपास चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे...

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) चुकीच्या कारभारामुळे राज्यातील जवळपास चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. याविरोधात उच्च न्यायालयात गेलेल्या ८६ विद्यार्थ्यांना संयुक्त पूर्व परीक्षेतील मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवले. त्यामुळे इतर चार ते पाच  हजार विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद  आणि नागपूर खंडपीठात गुरूवारी सुनावणी सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आणखी १६१ विद्यार्थ्यांना तर नागपूर खंडपीठाने ९ विद्यार्थ्यांना पात्र केले आहे. तर औरंगाबाद खंडपीठाचा निकाल येण्यास अद्याप वेळ आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अन्याया विरोधात युवासेना तसेच राज्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी आवाज उठवत मुंबई उच्च न्यायालय तसेच औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे. 

... तर समान न्यायाच्या तत्वाचे उल्लंघन होऊ शकते८६ मुलांना विशेष न्याय देऊन संविधानातील समान न्यायाच्या तत्वाचे उल्लंघन होऊ शकते याची जाणीव असायला हवीच. त्यामुळे या ८६ उमेदवारांच्या याचिकेला प्रातिनिधिक स्वरूपाचे समजून आयोगाने सर्वांना न्याय देऊन संविधानाच्या समान संधी व न्यायाच्या तत्वाचे पालन करून या तरुणांना त्यांचे स्वप्न साकार करण्याची संधी द्यावी, अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव तसेच आयोगाच्या सचिवांकडे युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी केली आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चुकीच्या कामाचा फटका राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना बसला  आहे. आयोगाने चौथी उत्तरतालिका जाहीर करावी. त्यामुळे पूर्ण निकाल बदलणार आहे.  अन्यथा पात्र असूनही हजारोंना याचा फटका बसणा आहे. याचा आयोगाने विचार करावा.- हनुमंत हिरवे, पात्र विद्यार्थी

संयुक्त पूर्व परीक्षेतील विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा असेल तर आयोगाने चौथी उत्तरतालिका जाहीर करावी. कारण आधीच्या तीन उत्तरतालिकेत बरोबर प्रश्नाला चुकीचे आणि चुकीच्या  प्रश्नांना बरोबर असा घोळ घातला आहे. त्यामुळे चौथी बरोबर उत्तरतालिका जाहीर करावी. त्यामधून पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे. - सौरभ कोरडे, पात्रतेच्या प्रतिक्षेतील विद्यार्थी

आज मुबंई, औरंगाबाद, नागपूर खंडपीठात याचिकेवर सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत मुंबई आणि नागपूरमधून एकूण १७० आणखी विद्यार्थ्यांना न्यायालयाने पात्र ठरवले आहे. संयुक्त परीक्षेती या विद्यार्थ्यांची २९ आणि ३० जानेवारी रोजी मुख्य परीक्षा होणार आहे. मात्र, दोन दिवसांत कोणत्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास होणार नाही. त्यामुळे आयोगाने परीक्षेची तारीख पुढे ढकलावी. तसेच चौथी उत्तरतालिका जाहीर करावी. तरच यातून हजारो विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे. - तुकाराम हिरवे, पात्रतेच्या प्रतिक्षेतील विद्यार्थी

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाexamपरीक्षाEducationशिक्षण