शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आठ दिवसांचे बाळ अनाथालयात देऊन आई निघून गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 13:17 IST

लग्नापूर्वीच दिवस गेल्याने दोघांच्या कुटूंबियांनी संमतीने त्यांचे लग्न लावून दिले...

ठळक मुद्देतरुण सज्ञान जोडप्याच्या वैवाहिक संसारातील दुराव्याचा फटका चिमुकल्या जिवाला : बाळाचा सांभाळ करण्यास पित्याचा पुढाकार

युगंधर ताजणे- 

पुणे :  व्यवसायाने दोघेही इंजिनिअर. कामाच्या ठिकाणी एकमेकांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्या तीन वर्षांच्या प्रेमात दोघांचा धर्म आड आला नाही. पुढे लग्नापूर्वीच दिवस गेल्याने दोघांच्या कुटूंबियांनी संमतीने त्यांचे लग्न लावून दिले. तिने बाळाला जन्म दिला. मात्र सातत्याने त्यांच्यात होणाऱ्या वादाने दोघांमधील संसार मोडळकीस आला. यासगळ्याचा फटका त्या आठ दिवसांच्या चिमुकल्याला सहन करावा लागत आहे. बाळाच्या आईने ते बाळ अनाथलयात देत असल्याचे संमतीपत्रक लिहून दिले.  अखेर पित्याने बाळचा सांभाळ करण्यास पुढाकार घेतला.   अरुण आणि सरिता (दोघांची नावे बदलली आहे) दोघेही उच्चशिक्षीत. व्यवसायाने इंजिनिअर. तो मुळचा राहणारा हरियाणाचा तर ती पुण्याची. मुंबईत एका कंपनीत काम करताना त्यांची ओळख झाली. ओळखीतून जवळीक वाढली. त्यांच्या या आंतरधर्मीय प्रेमाला दोघांच्या घरच्यांकडून कडाडून विरोध.  अरुण आणि सरिता यांच्यातील वाढत्या जवळकीतेने सरिताला दिवस गेले. ती गरोदर आहे असे कळताच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. घरच्यांना ही गोष्ट कळवली. त्यांनी संमतीने त्यांचे लग्न लावून दिले. मात्र सरिताने आई वडिलांचे सांगण्यानुसार, सासरच्या व्यक्तींकडून होणारा मानसिक व शारीरिक छळ आणि घरातून बाहेर काढण्याची तक्रार करुन त्यासंबंधीची नोटीस अरुणला पाठवली.  इतकेच नव्हे तर यापुढे जन्म दिलेल्या बाळाचा व अरुणचा स्वीकार करण्यास आपण तयार नसल्याचे तिने म्हटले.    बाळ अनाथलयात वाढु नये.  बाळाला त्याच्या पित्याची गरज असणे, एकूण संपूर्ण परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर बाळाला त्याच्या कुटूंबियांच्या ताब्यात देणे महत्वाचे आहे. असा विचार करुन आवश्यक ती तपासणी व खात्री करुन बालकल्याण समितीने बाळाचा ताबा पित्याकडे दिला. मुलाच्या आईवडिल तसेच इतर नातेवाईकांनी देखील त्या बाळाचा स्वीकार केला. सरिताने आपण बाळ अनाथलयाकडे सुपूर्द करत आहोत असे संमतीपत्रक लिहून देत ती घरच्यांसमवेत निघुन गेली.  ........* बालकल्याण समिती पुणे, 1 यांच्याकडे अरुण व सरिता यांचे प्रकरण आल्यानंतर त्यांनी दोघांचे समुपदेशन केले. समितीच्या अध्यक्ष डॉ.माधवी जाधवर-तांबडे, सदस्य सविता फटाळे, बिना हिरेकर आणि अँड.ममता नंदनवार यांनी त्या दोघांना व्यवस्थित मार्गदर्शन करुन भविष्यातील जबाबदारी तसेच लहान बाळाच्या संगोपनाची जाणीव करुन दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरिता कुठल्याही गोष्टी ऐकुन घेण्याच्या मानसिकतेत दिसत नव्हती. बाळाचे अनाथ म्हणून संगोपन नको याची तिला कल्पना दिल्यानंतर देखील तिने ऐकले नाही. बाळाच्या वडिलांक डून स्वत:करिता 30 लाख रुपये घेण्याची व ते न दिल्यास कोर्टात जाण्याची तयारी तिने दाखवली. त्यानुसार कौटूंबिक न्यायालयात दावा दाखल केला आहे. .........................* तुमच्या भांडणात बाळाचे हाल का? सज्ञान जोडप्यांनी आपल्या भविष्याबद्ल महत्वाचा निर्णय घेताना सुरुवातीला दोघांमध्ये संवाद साधावा. आजकाल तो दुरावताना दिसत आहे. मुलगी सज्ञान व आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यास तिने देखील आपआपसांतील वाद सामंजस्याने मिटविण्याची गरज आहे. यासगळयाचे गंभीर परिणाम मात्र मुलांना सहन करावे लागतात. या प्रकरणात त्या आठ दिवसांच्या बाळाची काय चूक ? असा प्रश्न पडतो.  वाद संपवून सुखात व आनंदाने संसार करण्याकरिता आईवडिल व घरातील ज्येष्ठांचा सल्ला जरुर घ्यावा. वडिलधा-या व्यक्तींनी देखील घरोबा कसा टिकेल यादृष्टीने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.  - अध्यक्ष व सदस्य (बालकल्याण समिती, पुणे ) 

टॅग्स :Puneपुणे