शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

इथेनॉलच्या अधिक उत्पादनामुळे साखरेचे बाजार वाढतील; साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 15:14 IST

यंदाच्या वर्षी 150 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होऊ शकेल. 62 रुपये प्रति लिटर प्रमाणे दहा हजार कोटी रुपयांचे इथेनॉल तयार होईल

बारामती : उसाचे क्षेत्र वाढले असताना पुढील काळामध्ये साखर कमी व इथेनॉलचे उत्पादन जास्त घेतले तरच साखरेचे बाजार वाढतील. तसेच या इथेनॉलला देखील योग्य भाव मिळेल. यंदाच्या वर्षी 150 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होऊ शकेल. 62 रुपये प्रति लिटर प्रमाणे दहा हजार कोटी रुपयांचे इथेनॉल तयार होईल, अशी माहिती राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

सहकारी साखर कारखानदारी समोरील प्रश्न व आव्हाने नेमके काय आहेत. याचा मागोवा घेण्यासाठी आयुक्त शेखर गायकवाड सध्या दौर्‍यावर आहेत. यादरम्यान त्यांनी गुरुवारी (दि. 3) इंदापूर येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व संचालक मंडळाशी गायकवाड यांनी चर्चा केली.  

ते पुढे म्हणाले, सहकारी साखर कारखानदारी सुरु झाल्यापासून सर्वात जास्त ऊसाचे क्षेत्र यंदाच्या वर्षी आहे. राज्यामध्ये साधारणपणे एक लाख हेक्टर उसाच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. हा फार मोठा बदल आहे. दर 21 दिवसांनी सहकारी साखर कारखान्यांना इथेनॉल चे पैसे मिळत आहेत. त्यामुळे मागील वर्षी 40 कारखान्यांनी या एफ आर पीची रक्कम शेतकऱ्यांना दिली होती तर यंदाच्या वर्षी सत्तर कारखान्यांनी एफ आर पी ची रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. परिणामी सहकारी साखर कारखान्यांना येणाऱ्या आर्थिक अडचणी जर आम्ही सोडवू शकलो तर शंभर टक्के एफआरपी देणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढेल. त्याच्या वर्षी माझ्या अंदाजानुसार 95 टक्के कारखान्यांनी एफ आर पी ची रक्कम दिली असेल. आणि हे सर्वात मोठे यश असणार आहे, असेही यावेळी गायकवाड म्हणाले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा व संचालक मंडळ उपस्थित होते.

ऊस बिलातून वीज बिलाची वसुली नाही

यावेळी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलातून वीज बिलाची वसुली शासनाने करू नये. असा निर्णय आपण घेऊ नये, अशी मागणी केली. यावर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अशी वसुली होणार नसल्याचा खुलासा यावेळी केला. 

टॅग्स :BaramatiबारामतीSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र