शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Monsoon Update 2024: देशात सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस! कृषी क्षेत्रासाठी चिंतेचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 09:36 IST

अनेक भागात पुरेसा पाऊसच झालेला नाही. जोपर्यंत पुरेसा पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नये, असा सल्लाही ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ देत आहेत...

पुणे : देशात मान्सूनचा या जून महिन्यातील सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस झाला आहे, त्यामुळे देशातील कृषी क्षेत्राची चिंता वाढविली आहे. कारण या पावसावर बळीराजा अवलंबून असतो. परंतु, आता पेरणी करायची की नाही, या द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरी अडकला आहे. अनेक भागात पुरेसा पाऊसच झालेला नाही. जोपर्यंत पुरेसा पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नये, असा सल्लाही ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ देत आहेत.

देशात १७ जूनपर्यंत सरासरी ७४.३ मिमी पाऊस होतो आणि यंदा आतापर्यंत ५९.४ मिमी पावसाची नोंद झाली. तर राज्यात सरासरी ९३.४ मिमी पाऊस होतो, आतापर्यंत ९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, महाराष्ट्रात मात्र अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.

हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात १ जूनपासून सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस झाला आहे. दक्षिणेकडील काही राज्ये वगळता जवळपास सर्वच प्रदेशांमध्ये पाऊस कमी झाला असून, अर्ध्या देशात अजून मॉन्सून पोचलेला नाही. तसेच तो म्हणावा तसा बरसलेला नाही. उत्तरेकडील राज्यांमध्ये तर उष्णतेच्या लाटा जाणवत आहेत. सध्या मान्सूनची प्रगती ठप्प झालेली आहे. तो कमकुवत झाला असून, त्यामध्ये ऊर्जा येण्यासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सामान्यतः, १ जूनच्या आसपास पाऊस दक्षिणेकडे सुरू होतो आणि ८ जुलैपर्यंत देशभर पसरतो. त्यामुळे भात, कापूस, सोयाबीन आणि ऊस यांसारख्या पिकांच्या लागवडीला आधार मिळतो. पण सध्या खूप कमी पाऊस झाल्याने पेरण्याच झालेल्या नाहीत. परिणामी बळीराजा चिंताग्रस्त झालेला आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये आणखी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे, शनिवार व रविवारपासून तापमानात घट होण्याची शक्यता आहे. भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये कमाल तापमान सध्या ४२ ते ४७.६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे, जे सामान्यपेक्षा ४-९ अंश सेल्सिअस जास्त आहे. त्यामुळे उत्तरेकडे उष्णतेचा फटका सहन करावा लागत आहे. त्यातच मॉन्सून रेंगाळलेला असल्याने त्याची चिंता लागून राहिली आहे.

उष्णतेची लाट कुठे ?

देशामध्ये उत्तरप्रदेश, बिहार, हिमालचल प्रदेशचा काही भाग, हरियाणा, दिल्ली, पंजाब, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, राजस्थान, झारखंड आणि मध्यप्रदेश या भागात १८ जून रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

१७ जूनपर्यंतचा सरासरी पाऊस

देशात सरासरी ७४.३ मिमी पाऊस होतो. आतापर्यंत झालेला पाऊस ५९.४ मिमी

महाराष्ट्र सरासरी ९३.४ मिमी पाऊस होतो, आतापर्यंत झालेला पाऊस ९९ मिमी

टॅग्स :monsoonमोसमी पाऊसPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र