शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Monsoon Update | पावसाळा सुरू होऊन झाला महिना; पण बाराच दिवस पडला पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 11:49 IST

मृग नक्षत्र समाप्तीनंतरही खरीप हंगामातील पेरणीची कामे प्रतीक्षेत....

-भानुदास पऱ्हाड

शेलपिंपळगाव : पावसाळी हंगाम सुरू होऊन तब्बल एक महिना होत आला आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. जिल्ह्यात १ जून ते २७ जूनपर्यंत ४३.३ टक्के पावसाची नोंद झाली असून आजपर्यंत सरासरी फक्त १२ दिवसच अडीच एमएमपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. परिणामी अनेक तालुक्यात मृग नक्षत्र समाप्तीनंतरही खरीप हंगामातील पेरणीची कामे प्रतीक्षेत आहेत.

चालू वर्षी वरुणराजाचे अर्थातच मान्सूनचे दहा दिवस अगोदर आगमन होणार असा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र मान्सूनच्या प्रवासाला अनुकूल वातावरण न लाभल्याने पावसात खंड पडला आहे. सद्यस्थितीतही मान्सूनची प्रतीक्षा करावी लागत आहे. मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल घडून आल्याने जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा शिडकावा होत आहे. त्यामुळे मान्सूनचे वेध सर्वांना लागले आहेत.

जिल्ह्यात हवेली तालुक्यात ३१.६ टक्के पाऊस झाला असून अवघे पाचच दिवस अडीच एमएमपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मुळशी तालुक्यात १२.८ टक्के पाऊस झाला असून पाचच दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. भोर तालुक्यात २८.७ टक्के पाऊस झाला असून आठ दिवस अडीच एमएमपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मावळ तालुक्यात २१.७ टक्के पाऊस झाला असून सात दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. वेल्हा तालुक्यात २२.९ टक्के पाऊस झाला असून सात दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जुन्नर तालुक्यात १०७.६ टक्के पावसाची नोंद झाली असून अकरा दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

खेड तालुक्यात ५१.५ टक्के पावसाची नोंद असून आठ दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. आंबेगाव तालुक्यात ७७.१० टक्के पावसाची नोंद असून दहा दिवस अडीच एमएमपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. शिरूर तालुक्यात ८५.६ टक्के पावसाची नोंद असून फक्त सहा दिवसच अडीच एमएमपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. बारामती तालुक्यात ११८.३ टक्के पाऊस झाला असून आठ दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. इंदापूर तालुक्यात ८७.४ टक्के पावसाची नोंद असून आठच दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दौंड तालुक्यात ९१.५ टक्के पावसाची नोंद असून अकरा दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर पुरंदर तालुक्यात ५३.३ टक्के पावसाची नोंद असून अवघे सहा दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस बरसला आहे.

एकंदरीतच संपूर्ण जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात सरासरी १२ दिवसच अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. सध्या खरीप हंगामातील आर्द्रा नक्षत्र सुरू आहे. खरीप हंगामात शेतकरी बाजरी, भुईमूग, मूग, सोयाबीन, कडधान्ये आदी पिकांची पेरणी करत असतो. मात्र दमदार पावसाअभावी अनेक भागात पेरणीची कामे खोळंबली आहेत.

सध्या हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. काही पिकांच्या पेरणीचा कालावधी समाप्त होऊ लागला आहे. त्यामुळे जमिनीला चांगली ओल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. अन्यथा दुबार पेरणीची परिस्थिती उद्भवू शकते. पावसाळा सुरू होऊन तीस दिवसांपेक्षा जास्त काळ पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांनी सूर्यफूल, तूर, बाजरी व मका पिकांची पेरणी करावी.

- प्रमोद सावंत, कृषी अधिकारी, पुणे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊसmonsoon 2018मान्सून 2018