शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
2
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
3
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
4
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
5
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
6
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
7
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
8
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
9
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
10
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
11
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का
12
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
13
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
14
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
16
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
17
Paytm, Gpay, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
18
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
19
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
20
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या

मोदींचे मौन गुन्ह्याची कबुली: आनंद शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 01:24 IST

‘मी टू’वर देशभर बोलले जात असताना मोदी मात्र मन की बात करत फिरत आहेत, त्यांनी आता जन की बात करावी, असे आवाहनही त्यांनी केली.

पुणे : राफेलसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी ना संसदेत काही बोलायला तयार आहेत ना जनतेत! त्यांचे हे मौन हीच त्यांनी राफेल विमान खरेदीत केलेल्या गुन्ह्याची कबुली आहे अशी टीका माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी केली. ‘मी टू’वर देशभर बोलले जात असताना मोदी मात्र मन की बात करत फिरत आहेत, त्यांनी आता जन की बात करावी, असे आवाहनही त्यांनी केली.

शर्मा सोमवारी काँग्रेस भवन येथे आले होते. पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शर्मा म्हणाले, ‘‘राफेल विमानांच्या खरेदीसंबंधात काँग्रेसने अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. शंकास्पद अशा अनेक गोष्टी या व्यवहारात झाल्या आहेत. त्या सर्वांचे निराकरण करणे हे मोदींचे कर्तव्य आहे. मात्र ते संसदेतही विरोधकांना सामोरे जाऊन काही बोलायला तयार नाहीत व देशवासीयांनाही जाहीरपणे काही सांगत नाहीत. अशा वेळी त्यांचे मौन हेच त्यांच्या गुन्ह्याची कबुली आहे असे समजण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. काँग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे व त्याने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना महत्त्व आहे.’’

पुढे ते म्हणाले, पेट्रोल, डिझेल इंधनाच्या वाढत्या किमतीविषयी शर्मा म्हणाले, काँग्रेसच्या काळातही दर वाढले होते. त्यावेळी हेच मोदी काँग्रेस देशाची फसवणूक करत आहे असे सांगत होते. काँग्रेसने निदान दरांवर नियंत्रण ठेवले होते, मात्र भाजपा सरकारला तेही जमत नाही. डॉलरचा दर नियंत्रणात ठेवू अशी मोदी यांची त्या वेळी भाषा होती, पण ते आता ती विसरले आहेत व दरवाढीचे समर्थन करत आहेत.

काँग्रेसभवन येथे या वेळी आमदार अनंत गाडगीळ, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, कांची अगरवाल, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, नीता राजपूत, संगीता तिवारी, सोनाली मारणे, विशाल मलके, भूषण रानभरे व पक्षाच्या विविध आघाड्यांचे प्रमुख, आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. शर्मा यांनी त्यांच्याशीही संवाद साधला व पक्षाच्या पुणे शहर व जिल्ह्यातील स्थितीविषयी चर्चा केली.

‘मी टू’ वर ‘जन की बात’ करादेशात मी टू चे वादळ घोंगावत आहे. अनेक महिला स्वत:वर झालेल्या अन्यायाविषयी लैगिंक शोषणाविषयी, पदाचा, अधिकारांचा गैरफायदा घेणाऱ्यांविषयी बोलत आहेत. त्यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर काही आरोप झाले आहेत.त्याविषयीही मोदी काही बोलत नाहीत. ते आरोप खोटे आहेत असे तरी त्यांनी सांगावे पण तेही ते सांगत नाहीत. मंत्रिमंडळाचे मोदी नेतृत्व करतात. त्यांनी बोललेच पाहिजे.आरोप निराधार असतील तर तसे स्पष्ट केले पाहिजे, मात्र त्यांनी नेहमीप्रमाणे मौन बाळगले आहे. ते बेटी बचाववर बोलतात, बेटीपढाव म्हणतात पण बेटी काही बोलत आहे त्याविषयी मात्र एक शब्दही काढत नाहीत. मन की बात सोडून त्यांनी आता जन की बात करणे गरजेचे आहे, असे शर्मा म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातcongressकाँग्रेसRafale Dealराफेल डील