शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
3
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
4
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
5
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
6
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
7
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
8
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
9
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
10
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
11
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
12
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
13
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
14
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
15
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!
16
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
17
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
18
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
19
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
20
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."

मोदींचे मौन गुन्ह्याची कबुली: आनंद शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 01:24 IST

‘मी टू’वर देशभर बोलले जात असताना मोदी मात्र मन की बात करत फिरत आहेत, त्यांनी आता जन की बात करावी, असे आवाहनही त्यांनी केली.

पुणे : राफेलसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी ना संसदेत काही बोलायला तयार आहेत ना जनतेत! त्यांचे हे मौन हीच त्यांनी राफेल विमान खरेदीत केलेल्या गुन्ह्याची कबुली आहे अशी टीका माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी केली. ‘मी टू’वर देशभर बोलले जात असताना मोदी मात्र मन की बात करत फिरत आहेत, त्यांनी आता जन की बात करावी, असे आवाहनही त्यांनी केली.

शर्मा सोमवारी काँग्रेस भवन येथे आले होते. पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शर्मा म्हणाले, ‘‘राफेल विमानांच्या खरेदीसंबंधात काँग्रेसने अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. शंकास्पद अशा अनेक गोष्टी या व्यवहारात झाल्या आहेत. त्या सर्वांचे निराकरण करणे हे मोदींचे कर्तव्य आहे. मात्र ते संसदेतही विरोधकांना सामोरे जाऊन काही बोलायला तयार नाहीत व देशवासीयांनाही जाहीरपणे काही सांगत नाहीत. अशा वेळी त्यांचे मौन हेच त्यांच्या गुन्ह्याची कबुली आहे असे समजण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. काँग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे व त्याने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना महत्त्व आहे.’’

पुढे ते म्हणाले, पेट्रोल, डिझेल इंधनाच्या वाढत्या किमतीविषयी शर्मा म्हणाले, काँग्रेसच्या काळातही दर वाढले होते. त्यावेळी हेच मोदी काँग्रेस देशाची फसवणूक करत आहे असे सांगत होते. काँग्रेसने निदान दरांवर नियंत्रण ठेवले होते, मात्र भाजपा सरकारला तेही जमत नाही. डॉलरचा दर नियंत्रणात ठेवू अशी मोदी यांची त्या वेळी भाषा होती, पण ते आता ती विसरले आहेत व दरवाढीचे समर्थन करत आहेत.

काँग्रेसभवन येथे या वेळी आमदार अनंत गाडगीळ, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, कांची अगरवाल, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, नीता राजपूत, संगीता तिवारी, सोनाली मारणे, विशाल मलके, भूषण रानभरे व पक्षाच्या विविध आघाड्यांचे प्रमुख, आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. शर्मा यांनी त्यांच्याशीही संवाद साधला व पक्षाच्या पुणे शहर व जिल्ह्यातील स्थितीविषयी चर्चा केली.

‘मी टू’ वर ‘जन की बात’ करादेशात मी टू चे वादळ घोंगावत आहे. अनेक महिला स्वत:वर झालेल्या अन्यायाविषयी लैगिंक शोषणाविषयी, पदाचा, अधिकारांचा गैरफायदा घेणाऱ्यांविषयी बोलत आहेत. त्यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर काही आरोप झाले आहेत.त्याविषयीही मोदी काही बोलत नाहीत. ते आरोप खोटे आहेत असे तरी त्यांनी सांगावे पण तेही ते सांगत नाहीत. मंत्रिमंडळाचे मोदी नेतृत्व करतात. त्यांनी बोललेच पाहिजे.आरोप निराधार असतील तर तसे स्पष्ट केले पाहिजे, मात्र त्यांनी नेहमीप्रमाणे मौन बाळगले आहे. ते बेटी बचाववर बोलतात, बेटीपढाव म्हणतात पण बेटी काही बोलत आहे त्याविषयी मात्र एक शब्दही काढत नाहीत. मन की बात सोडून त्यांनी आता जन की बात करणे गरजेचे आहे, असे शर्मा म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातcongressकाँग्रेसRafale Dealराफेल डील