शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

माेदींनी पुण्यातील समाजवाद्यांबाबत सांगितलेला किस्सा बनावट ; समाजवाद्यांची माेदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 18:53 IST

माेदींनी समाजवाद्यांवर केलेल्या टीकेवर माेदींनी मुलाखतीत सांगितलेला किस्सा हा बनावट वाटत असून माेदींना समाजवादी चळवळीची टिंगल करायची हाेती अशी प्रतिक्रिया समाजवादी विचारवंतांनी लाेकमतकडे व्यक्त केली.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने मुलाखात घेतली. त्यात माेदींनी पुण्याचा एक किस्सा सांगत पुण्यातील समावाद्यांवर टीका केली हाेती. पुण्यातील समाजवादी लोक स्वत:ला साधं, गरीब आणि सरळमार्गी दाखविण्याचा प्रयत्न करत असल्याचं मोदींनी म्हटल हाेते. त्याला पुण्यातील समाजवादी विचारवंतांनी उत्तर दिले आहे. माेदींनी मुलाखतीत सांगितलेला किस्सा हा बनावट वाटत असून माेदींना समाजवादी चळवळीची टिंगल करायची हाेती अशी प्रतिक्रिया या विचारवंतांनी लाेकमतकडे व्यक्त केली. 

मी जे सांगत आहे ते कुणाचीही टिंगल किंवा टीका-टिपण्णी करण्याचा उद्देश नाही. पण, माझ्या जीवनात घडलेला हा प्रसंग असून खूप जुनी आठवण आहे ही. मी तेव्हा हाफ कुर्ता, पायजमा, पायात बूट, खांद्यावर पिशवी आणि चेहऱ्यावर दाढी अशा पोषाखात फिरत असे. एकदा मी पुण्यातील रेल्वे स्थानकावर उतरलो. हातात एक वर्तमानपत्र आणि खांद्यावर पिशवी अकडवून मी पुण्यातील आरएसएसच्या शाखेकडे निघालो होतो. मी चालतच निघालो होतो, तेव्हा एक रिक्षावाला माझ्यासोबत हळुहळू रिक्षा चालवत होता. मी 100 ते 200 मीटर पुढे चालत आलो, तरीही रिक्षावाला माझ्यासोबतच. त्यामुळे मी त्याला विचारला, भाई आपकी ऑटो मे कुछ प्रॉब्लम है क्या..? त्यावर तो म्हणाला तुम्ही रिक्षात नाही का बसणार ? मी उत्तरलो.. नाही मी तर चालत चाललो आहे. त्यांतर रिक्षावाल्यानं विचारलं, तुम्ही समजवादी आहात का ?. तर, मी म्हटलं नाही, मी अहमदाबादी आहे. पण, तुम्ही मला समाजवादी असं का विचारलं ?. त्यावर, रिक्षावाला म्हणाला पुण्यातील समाजवादी लोकं सर्वसामान्य लोकांसमोर रिक्षात बसत नाहीत. तर पुढे गेल्यानंतर गपचूप रिक्षात बसतात. असा किस्सा माेदी यांनी मुलाखतीत सांगितला हाेता. 

याबाबत लाेकमतने पुण्यातील समाजवादी विचारवंतांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ज्येष्ठ समाजवादी नेते डाॅ. कुमार सप्तर्षी म्हणाले, माेदींनी सांगितलेला किस्सा हा बनावट वाटताे. माेदींना समाजवादी चळवळीची टिंगल करायची हाेती. अक्षय कुमार यांनी माेदींची घेतलेली मुलाखत ही पाेरकट हाेती. माेदी हे मला संभ्रमित व्यक्ती वाटतात. माेदी हे पंतप्रधान या पदाला शाेभत नाहीत. माेदींनी मुलाखतीत पुण्यातील समाजवाद्यांबाबत सांगितलेला किस्सा हा खाेटा वाटताे. आधीच्या काळी काही तथाकथित पुणेकर हे थाेड्या पुढे जाऊन रिक्षा घेतल्यास पैसे कमी पडतील म्हणून स्टेशनपासून काही अंतर चालत जाऊन रिक्षा घेत असत. त्यात रिक्षाचे भाडे कमी लागावे असे त्यांना वाटत असे. असाच काहीसा किस्सा त्यांना प्रकाश जावडेकर किंवा गिरीश बापट यांनी सांगितला असेल. त्यात माेदींनी ताेडफाेड करुन समाजवाद्यांचा किस्सा म्हणून सांगितला आहे. प्रत्यक्षात त्याकाळी रिक्षा हे सर्वसामान्य पुणेकरांचे वाहन नव्हते. रिक्षा हे पांढरपेशी नागरिकांचे वाहन हाेते. त्यामुळे असा कुठला किस्सा घडला असेल असे वाटत नाही. तसेच यामुळे समाजवाद्यांचा किंवा पुणेकरांचा कुठला अपमान हाेताेय असे मला वाटत नाही.

सुभाष वारे म्हणाले, माेदींनी अक्षय कुमार यांना दिलेल्या मुलाखतीत पुण्याचा जाे किस्सा सांगितला ताे मला स्वरचित वाटताे. रिक्षावाला समाजवाद्यांबाबत असे काही बाेलेल असे वाटत नाही. आत्ताच्या लखनाै आणि पटणातील काही समाजवाद्यांबाबत एखादा रिक्षावाला असे म्हंटला असता तर गाेष्ट वेगळी हाेती. परंतु महाराष्ट्रातले समाजवादी हे साधे राहणारे तसेच समाजासाठी कष्ट करणारेच आहेत. महाराष्ट्रात अनेक थाेर समाजवादी हाेऊन गेले आहेत. एस. एम. जाेशी, नारासाहेब गाेरे, ग.प्र. प्रधानांच्या, डाॅ. बाबुसाहेब काळदाते यांची थाेर परंपरा असलेल्या समादवाद्यांबाबत एखादा रिक्षावाला असे काही बाेलेल असे वाटत नाही. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी जी प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत, त्यांचा माेदींनी एकदा अभ्यास करावा. ते ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात त्याच्याशी ते कुठे मेळ खातं यावर देखील त्यांनी कधीतरी भाष्य करावं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKumar Saptarshiकुमार सप्तर्षीAkshay Kumarअक्षय कुमारPuneपुणे