शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

माेदींनी पुण्यातील समाजवाद्यांबाबत सांगितलेला किस्सा बनावट ; समाजवाद्यांची माेदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 18:53 IST

माेदींनी समाजवाद्यांवर केलेल्या टीकेवर माेदींनी मुलाखतीत सांगितलेला किस्सा हा बनावट वाटत असून माेदींना समाजवादी चळवळीची टिंगल करायची हाेती अशी प्रतिक्रिया समाजवादी विचारवंतांनी लाेकमतकडे व्यक्त केली.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने मुलाखात घेतली. त्यात माेदींनी पुण्याचा एक किस्सा सांगत पुण्यातील समावाद्यांवर टीका केली हाेती. पुण्यातील समाजवादी लोक स्वत:ला साधं, गरीब आणि सरळमार्गी दाखविण्याचा प्रयत्न करत असल्याचं मोदींनी म्हटल हाेते. त्याला पुण्यातील समाजवादी विचारवंतांनी उत्तर दिले आहे. माेदींनी मुलाखतीत सांगितलेला किस्सा हा बनावट वाटत असून माेदींना समाजवादी चळवळीची टिंगल करायची हाेती अशी प्रतिक्रिया या विचारवंतांनी लाेकमतकडे व्यक्त केली. 

मी जे सांगत आहे ते कुणाचीही टिंगल किंवा टीका-टिपण्णी करण्याचा उद्देश नाही. पण, माझ्या जीवनात घडलेला हा प्रसंग असून खूप जुनी आठवण आहे ही. मी तेव्हा हाफ कुर्ता, पायजमा, पायात बूट, खांद्यावर पिशवी आणि चेहऱ्यावर दाढी अशा पोषाखात फिरत असे. एकदा मी पुण्यातील रेल्वे स्थानकावर उतरलो. हातात एक वर्तमानपत्र आणि खांद्यावर पिशवी अकडवून मी पुण्यातील आरएसएसच्या शाखेकडे निघालो होतो. मी चालतच निघालो होतो, तेव्हा एक रिक्षावाला माझ्यासोबत हळुहळू रिक्षा चालवत होता. मी 100 ते 200 मीटर पुढे चालत आलो, तरीही रिक्षावाला माझ्यासोबतच. त्यामुळे मी त्याला विचारला, भाई आपकी ऑटो मे कुछ प्रॉब्लम है क्या..? त्यावर तो म्हणाला तुम्ही रिक्षात नाही का बसणार ? मी उत्तरलो.. नाही मी तर चालत चाललो आहे. त्यांतर रिक्षावाल्यानं विचारलं, तुम्ही समजवादी आहात का ?. तर, मी म्हटलं नाही, मी अहमदाबादी आहे. पण, तुम्ही मला समाजवादी असं का विचारलं ?. त्यावर, रिक्षावाला म्हणाला पुण्यातील समाजवादी लोकं सर्वसामान्य लोकांसमोर रिक्षात बसत नाहीत. तर पुढे गेल्यानंतर गपचूप रिक्षात बसतात. असा किस्सा माेदी यांनी मुलाखतीत सांगितला हाेता. 

याबाबत लाेकमतने पुण्यातील समाजवादी विचारवंतांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ज्येष्ठ समाजवादी नेते डाॅ. कुमार सप्तर्षी म्हणाले, माेदींनी सांगितलेला किस्सा हा बनावट वाटताे. माेदींना समाजवादी चळवळीची टिंगल करायची हाेती. अक्षय कुमार यांनी माेदींची घेतलेली मुलाखत ही पाेरकट हाेती. माेदी हे मला संभ्रमित व्यक्ती वाटतात. माेदी हे पंतप्रधान या पदाला शाेभत नाहीत. माेदींनी मुलाखतीत पुण्यातील समाजवाद्यांबाबत सांगितलेला किस्सा हा खाेटा वाटताे. आधीच्या काळी काही तथाकथित पुणेकर हे थाेड्या पुढे जाऊन रिक्षा घेतल्यास पैसे कमी पडतील म्हणून स्टेशनपासून काही अंतर चालत जाऊन रिक्षा घेत असत. त्यात रिक्षाचे भाडे कमी लागावे असे त्यांना वाटत असे. असाच काहीसा किस्सा त्यांना प्रकाश जावडेकर किंवा गिरीश बापट यांनी सांगितला असेल. त्यात माेदींनी ताेडफाेड करुन समाजवाद्यांचा किस्सा म्हणून सांगितला आहे. प्रत्यक्षात त्याकाळी रिक्षा हे सर्वसामान्य पुणेकरांचे वाहन नव्हते. रिक्षा हे पांढरपेशी नागरिकांचे वाहन हाेते. त्यामुळे असा कुठला किस्सा घडला असेल असे वाटत नाही. तसेच यामुळे समाजवाद्यांचा किंवा पुणेकरांचा कुठला अपमान हाेताेय असे मला वाटत नाही.

सुभाष वारे म्हणाले, माेदींनी अक्षय कुमार यांना दिलेल्या मुलाखतीत पुण्याचा जाे किस्सा सांगितला ताे मला स्वरचित वाटताे. रिक्षावाला समाजवाद्यांबाबत असे काही बाेलेल असे वाटत नाही. आत्ताच्या लखनाै आणि पटणातील काही समाजवाद्यांबाबत एखादा रिक्षावाला असे म्हंटला असता तर गाेष्ट वेगळी हाेती. परंतु महाराष्ट्रातले समाजवादी हे साधे राहणारे तसेच समाजासाठी कष्ट करणारेच आहेत. महाराष्ट्रात अनेक थाेर समाजवादी हाेऊन गेले आहेत. एस. एम. जाेशी, नारासाहेब गाेरे, ग.प्र. प्रधानांच्या, डाॅ. बाबुसाहेब काळदाते यांची थाेर परंपरा असलेल्या समादवाद्यांबाबत एखादा रिक्षावाला असे काही बाेलेल असे वाटत नाही. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी जी प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत, त्यांचा माेदींनी एकदा अभ्यास करावा. ते ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात त्याच्याशी ते कुठे मेळ खातं यावर देखील त्यांनी कधीतरी भाष्य करावं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKumar Saptarshiकुमार सप्तर्षीAkshay Kumarअक्षय कुमारPuneपुणे