शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

'फाळणी वेदना स्मृती दिन' पाळण्याऐवजी मोदींनी 'महापश्चाताप दिन' पाळावा : काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 21:06 IST

फाळणीपेक्षा टाळेबंदीत जास्त हाल

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑगस्ट हा 'फाळणी वेदना स्मृती दिन' म्हणून पाळला जाणार असल्याची घोषणा केली. आता काँग्रेसनेनरेंद्र मोदींच्या याच घोषणेवर जोरदार टीका केली आहे. यात 'फाळणी वेदना दिन' पाळण्याऐवजी पंतप्रधान मोदी यांनी देशभर टाळेबंदी जाहीर केली तो दिवस 'महापश्चाताप दिन' म्हणून पाळावा अशा शब्दात काँग्रेसने निशाणा साधला आहे. 

भारत -पाकिस्तान फाळणीची घटना वेदनादायी होती. तिरस्कार व हिंसाचारामुळे आमच्या लाखो बहिणी आणि भावांना विस्थापित व्हावे लागले होते.ही वेदना कधीही विसरता येणार नाही. या घटनेत अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले होते असे मोदी यांनी ट्विटमध्ये विशद करत १४ ऑगस्ट हा दिवस 'फाळणी वेदना स्मृती दिन' म्हणून पाळला जाणार असल्याचे जाहीर केले होते. याच घोषणेवर काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी टीकास्र सोडले आहे. 

तिवारी म्हणाले, फाळणी ही तत्कालीन अपरिहार्य घटना होती. त्यात दोन्ही बाजूंचे दीड कोटी लोक बाधीत झाले. त्या जखमांवरची खपली सतत काढत राहणे हा भाजपाचा नेहमीचा उद्योग आहे.

आताही मोदी यांनी तेच केले असे स्पष्ट करताना तिवारी म्हणाले, स्वतंत्र भारतात मोदी़नी पंतप्रधान म्हणून तुघलकी आवेशात एका रात्रीत कोणालाही कसलीही पूर्व कल्पना न देता जी टाळेबंदी केली त्यात आपल्याच देशातले साडे आठ कोटी स्थलांतरीत बाधीत झाले. पायी घरी निघाले, त्यात त्यांचे खाण्याचे राहण्याचे हाल झाले. काहींना म्रुत्यूही आला. त्यामुळे मोदी व त्यांच्या भाजपाने स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला नकाराश्रू ढाळण्याऐवजी तुघलकी टाळेबंदी जाहीर केली. तो २४ मार्च हा दिवस 'महापश्चाताप दिन' म्हणून यापुढे दरवर्षी पाळावा.

काय म्हणाले होते मोदी.... फाळणीमध्ये विस्थापित व्हावे लागलेल्या आणि प्राण गमवाव्या लागलेल्या आमच्या लाखो बंधू भगिनींच्या बलिदानाला लक्षात ठेवण्यासाठी १४ ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जाणार असल्याचे जाहीर केलं. १४ ऑगस्ट हा दिवस आम्हाला भेदभाव, वैमनस्य आणि वाईट भावनांच्या विषाला संपविण्यासाठी केवळ प्रेरितच करणार नाही,तर यामुळे एकता ,सामाजिक सद्भावने आणि मानवी संवेदनांना आणखी मजबूत करणार आहे मोदी म्हणाले होते.

 

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा