शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

माेदी बाेलतात वेगळंच अन् करतात वेगळंच : शत्रुघ्न सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 8:47 PM

सीएए कायद्यावरुन खासदार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी माेदींंवर जाेरदार टीका केली.

पुणे : आपले पंतप्रधान विश्वसार्हता गमावून बसले आहेत. त्यांच्या भाषणांमध्ये ताेचताेचपणा आहे. माेदी बाेलतात वेगळंच अन् करतात वेगळंच असे म्हणत खासदार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी माेदींवर टीका केली. 

माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वामध्ये गांधी शांती यात्रेचे आयाेजन करण्यात आले आहे. ही यात्री आज पुण्यातील गांधीभवन येथे आली. त्यावेळी आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये शत्रुघ्न सिन्हा बाेलत हाेते. यावेळी यशवंत सिन्हा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार आशिष देशमुख, गांधीभवनचे प्रमुख डाॅ. कुमार सप्तर्षी उपस्थित हाेते. 

सिन्हा म्हणाले, मी या गांधी शांती यात्रेसाेबत आहे. आज देशाला शांततेची गरज आहे. देशातील तरुण आज आक्राेशीत आहेत. तरुणांनी जी चळवळ सुरु केली आहे, अशी चळवळ अनेक दशकांनंतर पाहायला मिळाली. ही चळवळ पाहून जे. पींच्या चळवळीची आठवण झाली. देशातील सध्याच्या वातावारणाबाबत सर्वाेच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शरद बाेबडे यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. आपल्या प्रधानमंत्र्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. माेदी बाेलतात वेगळंच आणि करतात वेगळंच. देशात डिटेंशन कॅम्प नाहीत असे माेदी म्हणाले हाेते, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी असे कॅम्प बांधल्याचे समाेर आले आहे. 

सीएए कायदा मागे घेतल्याशिवाय आंदाेलन थांबवणार नाही : यशवंत सिन्हा

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आज देशात प्रक्षाेभक वातावरण आहे. आपले संविधान धाेक्यात आले आहे. देशाचे विभाजन करण्याचे काम सरकार करत आहे. सरकारचे हे कारस्थान ओळखून विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत. संसदेत बहुमत मिळाल्यानंतर आता सरकारचा छुपा अजेंडा समाेर येत आहे. याची माेठी किंमत देशाला माेजावी लागणार आहे. जेएनयुतील हल्ल्याबाबत बाेलताना ते म्हणाले, सरकारने गुंड पाठवून जेएनयु विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चाेपून काढले. विद्यार्थ्यांचे आंदाेलन चिरडून टाकण्याचे काम सरकार करत आहे. 

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाNarendra Modiनरेंद्र मोदीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक