शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मोदींनी सामान्य जनतेची फसवणूक केली- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 02:14 IST

राज्य आणि देश चालवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच योग्य आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

भोर : ना प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा झाले, ना दोन कोटी तरुणांना नोकऱ्या दिल्या, ना देशाबाहेरील काळा पैसा आणला ना अच्छे दिन आले. उलट देशावर ५४ लाख कोटींचे कर्ज केले. भाजपाने जाहीरनाम्यात दिलेल्या एकाही गोष्टीची पूर्तता केली नाही, तर मोदी आणि फडणवीस यांनी लोकांची फसवणूक केली आहे. यामुळे राज्य आणि देश चालवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच योग्य आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत बाठे यांच्या विशेष प्रयत्नाने किकवी, पाचलिंगे, मोरवाडी, राऊतवाडी, वागजवाडी येथील १ कोटी ५३ लाख रुपये विविध विकासकामांचे उद्घाटन खासदार सुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्य चंद्रकांत बाठे होते. यावेळी प्रदीप खंदारे, संतोष घोरपडे, भालचंद्र जगताप, रणजित शिवतरे, सुनीता बाठे, विद्या यादव, नितीन धारणे, बाळासाो दळवी, नारायण अहिरे, शिवाजी कोंडे, मनोज खोपडे, केतन चव्हाण उपस्थित होते.सुप्रिया सुळे म्हणाल्या, की मतदान हे यंत्रापेक्षा मतपत्रिकेवर घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीसह इतर १६ पक्षांनी केली आहे, तर मतदान यंत्रातील गैरप्रकाराची सीबीआयमार्फत चौकशीची मागणी केली होती. मात्र सीबीआयवर आमचा विश्वास कमी झाला आहे.गोपीनाथ मुंढे यांची हत्या मतदान यंत्रातील गैरप्रकारातून झाली, अशी बातमी परदेशातून आली आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टीची चौकशी आंतरराष्ट्रीय रॉ (रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग) या संस्थेमार्फत करावी, अशी मागणी सुळे यांनी केली.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस