शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

मोदींनी सामान्य जनतेची फसवणूक केली- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 02:14 IST

राज्य आणि देश चालवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच योग्य आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

भोर : ना प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा झाले, ना दोन कोटी तरुणांना नोकऱ्या दिल्या, ना देशाबाहेरील काळा पैसा आणला ना अच्छे दिन आले. उलट देशावर ५४ लाख कोटींचे कर्ज केले. भाजपाने जाहीरनाम्यात दिलेल्या एकाही गोष्टीची पूर्तता केली नाही, तर मोदी आणि फडणवीस यांनी लोकांची फसवणूक केली आहे. यामुळे राज्य आणि देश चालवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच योग्य आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत बाठे यांच्या विशेष प्रयत्नाने किकवी, पाचलिंगे, मोरवाडी, राऊतवाडी, वागजवाडी येथील १ कोटी ५३ लाख रुपये विविध विकासकामांचे उद्घाटन खासदार सुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्य चंद्रकांत बाठे होते. यावेळी प्रदीप खंदारे, संतोष घोरपडे, भालचंद्र जगताप, रणजित शिवतरे, सुनीता बाठे, विद्या यादव, नितीन धारणे, बाळासाो दळवी, नारायण अहिरे, शिवाजी कोंडे, मनोज खोपडे, केतन चव्हाण उपस्थित होते.सुप्रिया सुळे म्हणाल्या, की मतदान हे यंत्रापेक्षा मतपत्रिकेवर घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीसह इतर १६ पक्षांनी केली आहे, तर मतदान यंत्रातील गैरप्रकाराची सीबीआयमार्फत चौकशीची मागणी केली होती. मात्र सीबीआयवर आमचा विश्वास कमी झाला आहे.गोपीनाथ मुंढे यांची हत्या मतदान यंत्रातील गैरप्रकारातून झाली, अशी बातमी परदेशातून आली आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टीची चौकशी आंतरराष्ट्रीय रॉ (रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग) या संस्थेमार्फत करावी, अशी मागणी सुळे यांनी केली.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस