शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

खळ्खट्याकच्या इराद्याने मनसैनिक गेले आणि पुढे घडला हा प्रकार (व्हिडीओ)

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 21:56 IST

मनसेच्या १३व्या वर्धापनदिन कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधात लिहिणाऱ्यांना घरी जाऊन अद्दल घडवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते.

पुणे : मनसेच्या १३व्या वर्धापनदिन कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधात लिहिणाऱ्यांना घरी जाऊन अद्दल घडवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानुसार पुण्यातील कार्यकर्ते एका व्यक्तीच्या घरीदेखील गेले मात्र संबंधित व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समजल्यावर मात्र त्यांनी माघार घेतली.

याबाबत अधिक माहिती अशी की, हडपसर भागात राहणाऱ्या विभास जाधव या व्यक्तीच्या घरी बुधवारी मनसेचे कार्यकर्ते पोहोचले. जाधव याने राज ठाकरे यांच्याशी संबंधित बातमीवर केलेल्या आक्षेपार्ह्य कमेंटबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या कार्यकर्त्यांमध्ये मनसेचे पुणे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी होते. जाधव याच्या घरी गेल्यावर ते घरी नसल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी जाधव यांच्या नातेवाईकांशीही कार्यकर्त्यांचा वाद झाला. हा वाद इतका वाढला की पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

अखेर पोलिसांनी मध्यस्ती करत जाधव याला पोलीस स्टेशनला बोलावून घेतले. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार जाधव याने हा प्रकार यापूर्वीही केल्याचे समोर आले आहे. राजकीय व्यक्तींपासून ते पोलीस प्रशासनातील व्यक्तींवरही त्याने या प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला पोलिसांनी १४९ नुसार पुन्हा असा प्रकार न करण्याची सूचना देऊन सोडले. याबाबत वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक सुनील तांबे यांनी लोकमतला माहिती देताना सांगितले की, जाधव याच्याकडून ही पोस्ट डिलीट करून घेतली. तो विकृत मनोवृत्तीचा असून यापूर्वीही त्याने असाच प्रकार जवळचे नातेवाईक आणि इतर राजकीय व्यक्तींबाबत केला होता. त्याला ताकीद देऊन सोडण्यात आले असून पुन्हा अशी कृती घडल्यास कारवाई करण्यात येईल.

दुसरीकडे मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी म्हटले की, राज ठाकरे मनसैनिकांचे दैवत आहेत. टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे मात्र त्याला संविधानिक भाषेचा आधार असावा. त्यांच्यावरची अश्लील टीका आम्ही खपवून घेणार नाही. जाधव याने तर घरातील महिलांना पुढे करून प्रकरण चिथावण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही महिलांशी सन्मानाने आणि संयमाने बोलण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या महिला शहराध्यक्षा रुपाली ठोंबरे पाटील यांनी मात्र खरंच जाधव याचे मानसिक संतुलन बिघडले आहे का असा सवाल केला. जर संतुलन बिघडले असेल तर त्याच्या घरचे बाजू का घेत होते असा सवालही त्यांनी विचारला. हा अतिशय गंभीर प्रकार असून ही सोशल मीडियावर उदयाला येणारी विकृती असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारणSocial Mediaसोशल मीडियाHadapsarहडपसर