शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

Video: राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही; जवळच्या नातेवाइकांचीच भरणेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 12:58 IST

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे लोकांना सांगायचे, आम्ही सत्तेवर आलो तर वीजबिल माफ करू. मात्र सध्या या राज्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांकडे बिलकुल लक्ष नाही,

बारामती : सत्तेत सहभागी होण्याआधी हेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे लोकांना सांगायचे, आम्ही सत्तेवर आलो तर वीजबिल माफ करू. मात्र सध्या या राज्यमंत्र्यांचे  शेतकऱ्यांकडे बिलकुल लक्ष नाही,  अशा शब्दात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे जवळचे नातेवाईक बाबा महाराज खरतोडे यांनी भरणे यांच्यावर सडकून टिका केली. कळस येथे महावितरण व राज्यसरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयासमोर गुरुवारी ( दि.25) आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते.

 खरतोडे पुढे म्हणाले, ''कळस गावातील अडीअडचणी घेऊन आम्ही वारंवार राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे गेलो. या राज्यमंत्र्यांना लोकांचे काही देणेघेणे नाही. लोक मरतात का जगतात याचे त्यांना काही नाही. लोकांकडे लक्ष देण्यास राज्यमंत्र्यांना वेळ नाही. मात्र मस्त चालले आहे. वीज कनेक्शन जोडावे यासाठी आम्ही महावितरणचे अधिकारी सुळ यांना भेटलो. त्यांना निवेदन दिले. मात्र ते म्हणतात वरून आदेश आला आहे, आम्ही काही करू शकत नाही. वरून आदेश म्हणजे काही स्वर्गातून आला नाही.''

''हे राज्य शेतकऱ्यांसाठी आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य होय. मात्र हे राज्य लोकशाही पद्धतीने चालत नाही. हे हुकूमशाही पद्धतीने चालणारे शासन आहे. मागील पंचवार्षिक ला यांचे राज्य होते. तेव्हा हेच राज्यमंत्री म्हणायचे आमचं सरकार निवडून द्या. आम्ही विजबिल पूर्णपणे माफ करू. मात्र या सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले? उसाचे पीक 18 महिन्यांची असते. द्राक्षाचे पीक बारा महिन्याचे डाळिंबाचे पीक देखील बारा महिन्याचे असते. राज्य सरकारने अध्यादेश काढला की दर तीन महिन्यांनी वीज बिलासाठी शेतकऱ्यांचे  कृषी पंप बंद करून लूट करायची आणि शासनाची तिजोरी भरायची,  असा आरोप राज्यमंत्री भरणे यांचे नातेवाईक खरतोडे यांनी केला.'' 

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेFarmerशेतकरीGovernmentसरकारmahavitaranमहावितरण