शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

Video: राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही; जवळच्या नातेवाइकांचीच भरणेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 12:58 IST

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे लोकांना सांगायचे, आम्ही सत्तेवर आलो तर वीजबिल माफ करू. मात्र सध्या या राज्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांकडे बिलकुल लक्ष नाही,

बारामती : सत्तेत सहभागी होण्याआधी हेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे लोकांना सांगायचे, आम्ही सत्तेवर आलो तर वीजबिल माफ करू. मात्र सध्या या राज्यमंत्र्यांचे  शेतकऱ्यांकडे बिलकुल लक्ष नाही,  अशा शब्दात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे जवळचे नातेवाईक बाबा महाराज खरतोडे यांनी भरणे यांच्यावर सडकून टिका केली. कळस येथे महावितरण व राज्यसरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयासमोर गुरुवारी ( दि.25) आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते.

 खरतोडे पुढे म्हणाले, ''कळस गावातील अडीअडचणी घेऊन आम्ही वारंवार राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे गेलो. या राज्यमंत्र्यांना लोकांचे काही देणेघेणे नाही. लोक मरतात का जगतात याचे त्यांना काही नाही. लोकांकडे लक्ष देण्यास राज्यमंत्र्यांना वेळ नाही. मात्र मस्त चालले आहे. वीज कनेक्शन जोडावे यासाठी आम्ही महावितरणचे अधिकारी सुळ यांना भेटलो. त्यांना निवेदन दिले. मात्र ते म्हणतात वरून आदेश आला आहे, आम्ही काही करू शकत नाही. वरून आदेश म्हणजे काही स्वर्गातून आला नाही.''

''हे राज्य शेतकऱ्यांसाठी आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य होय. मात्र हे राज्य लोकशाही पद्धतीने चालत नाही. हे हुकूमशाही पद्धतीने चालणारे शासन आहे. मागील पंचवार्षिक ला यांचे राज्य होते. तेव्हा हेच राज्यमंत्री म्हणायचे आमचं सरकार निवडून द्या. आम्ही विजबिल पूर्णपणे माफ करू. मात्र या सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले? उसाचे पीक 18 महिन्यांची असते. द्राक्षाचे पीक बारा महिन्याचे डाळिंबाचे पीक देखील बारा महिन्याचे असते. राज्य सरकारने अध्यादेश काढला की दर तीन महिन्यांनी वीज बिलासाठी शेतकऱ्यांचे  कृषी पंप बंद करून लूट करायची आणि शासनाची तिजोरी भरायची,  असा आरोप राज्यमंत्री भरणे यांचे नातेवाईक खरतोडे यांनी केला.'' 

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेFarmerशेतकरीGovernmentसरकारmahavitaranमहावितरण