शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ३७ कुटुंबांचे स्थलांतर; पोलीस, महसुल प्रशासनाकडून मदतकार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 21:32 IST

रहिवाशांची शाळा, मंदिरे तसेच नातेवाईकडे निवासीची व्यवस्था

पुणे : मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागात दरड कोसळून २०० जणांचा मृत्यु झाल्यानंतर पुणे आणि रायगड जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील ३७ कुटुंबातील १५३ जणांचे स्थलांतर पुणे ग्रामीण पोलीस आणि महसुल विभागाने केले. रहिवाशांची शाळा, मंदिरे तसेच नातेवाईकडे निवासीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना भोजन आणि अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. 

वेल्हे तालुक्यातील कर्नवडी गााव महाड तालुक्याच्या हद्दीवर आहे. सह्याद्रीचा कडा उतरुन कर्नवडीत जाता येते. वेल्हे तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तीन दिवसांपूर्वी घरांना तडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

वेल्हे तालुक्यातून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात जाण्यासाठी दुर्गम  भागातून जाणार्‍या शिवकालीन वाटा आहे. कडे-कपारीतून पायपीट करून महाड तालुक्यात उतरता येते. त्यानंतर रविवारी (२५ जुलै) मध्यरात्री दीडच्या सुमारास कडा कोसळून मोठा आवाज झाला होता. 

वेल्हे पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार, तहसीलदार शिवाजी शिंदे, केळद गावचे सरपंच रमेश शिंदे यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांना स्थलांतराबाबतची विनंती केली. मात्र, ग्रामस्थ स्थलांतरित होत नव्हते. पवार, शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, पंचायत समिती सभापती दिनकर धरपाळे, नाना राऊत यांनी पुन्हा कर्नवडी, केळद, निगडे खुर्द भागातील ग्रामस्थांची भेट घेऊन संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली. त्यानंतर ३७ कुटुंबांतील १५३ जणांचे स्थलांतर करण्यात आले. जेसीबी यंत्राच्या साहाय्याने  कर्णवडी ते रानवडी रस्त्याची डागडुजी करण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसfloodपूरMigrationस्थलांतरण