शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मेट्रोने आयटीला गती, आयटीयन्सने व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 01:44 IST

आयटीयन्सची भावना : पूरक रस्ते आणि वॉकिंग मार्गासह वेगात काम होण्याची अपेक्षा

पुणे : मेट्रोच्या उभारणीने शहरातील माहिती आणि तंत्रज्ञान उद्योगाला (आयटी) गती मिळेल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडूनदेखील मेट्रोचे काम लवकर व्हावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येत होती. मेट्रो मर्गासह पूरक रस्ते, पादचारी मार्गांचे जाळे अशी सुसज्ज व्यवस्था असल्यास आयटी उद्योगासाठी ते फायदेशीरच ठरेल, अशी भूमिका आयटी उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १८) मेट्रोच्या कामांचे उद्घाटन झाले. या पार्श्वभूमीवर, आयटी उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले मत मांडले. हिंजवडी इंडस्ट्री असोसिएशनच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य केदार परांजपे म्हणाले, ‘‘शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहनांसाठी रस्ते कायमच अपुरे पडणार आहेत. आयटी क्षेत्रात वेतन चांगले असल्याने अनेकांचा कल चारचाकी घेण्याकडे असतो. त्यामुळेदेखील वाहतूककोंडीत भरच पडते. मेट्रो झाल्यास वाहतूक अधिक वेगवान होईल. त्यामुळे वैयक्तिक वाहन वापरण्याची गरज फारशी राहणार नाही. मेट्रोच्या नियोजनानुसार शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्याचा फायदा पोहोचविण्याचा प्रयत्न असेल. म्हणजे मेट्रो स्थानकापर्यंत सहज जाता यावे यासाठी पूरक रस्ते, स्काय वॉक असेल. उलट सरकारने लवकरात लवकर हा प्रकल्प कसा मार्गी लागेल, हे पाहिले पाहिजे. हिंजवडी येथील उद्योजकांच्या संघटनेकडूनदेखील मेट्रो प्रकल्प व्हावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत होता.’’सॉफ्टवेअर एक्सपोर्टर असोसिएशनचे सचिव विद्याधर पुरंदरे म्हणाले, ‘‘बंगळुरूपाठोपाठ आयटी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील वाहतुकीची स्थिती फारशी चांगली नाही. प्रत्येक कर्मचाºयाला कार्यालयात येण्यासाठी सरासरी एक तास लागतो. मेट्रो सुरू झाल्यानंतर वाहतूक अधिक वेगवान होईल. त्यामुळे मेट्रोचा मार्ग हिंजवडी फेज-३ पर्यंत करावा, अशी मागणी येथील उद्योजकांनीच केली होती. आयटी उद्योजकांकडून मेट्रोचे स्वागतच करण्यात येत आहे. मेट्रोसाठी तयार करण्यात येणाºया पायाभूत सुविधांमुळे सार्वजनिक वाहतुकीत सुधारणा होईल.हिंजवडीतील वाहतूककोंडीची समस्या४हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाºया सॉफ्टवेअर इंजिनिअरना वाहतूककोंडीच्या समस्येने अनेक वर्षे ग्रासलेले आहे. काही महिन्यांपूर्वी पीएमआरडीएने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले, की शिवाजी चौक, हिंजवडी येथे दररोज १ लाख १५ हजार वाहनांची ये-जा होते. त्यातून सुमारे पाच लाख ११ हजार लोक प्रवास करतात. पुण्यात सार्वजनिक वाहतुकीचे प्रमाण १९ टक्के, तर हिंजवडी क्षेत्रामध्ये ते केवळ १० टक्के आहे. ९० टक्के खासगी वाहनांपैकी ५३ टक्के दुचाकी व ३६ टक्के चारचाकी आहेत. सकाळी १० ते ११ वाजता व सायंकाळी ७ ते रात्री ८ या धावपळीच्या वेळी वाकड चौकातून ताशी साडेदहा हजार गाड्या धावतात; त्यामुळे वाहतूककोंडी होऊन तरुण इंजिनिअरचा महत्त्वाचा वेळ नष्ट होतो. यामुळे २०१५मध्ये पीएमआरडीएच्या स्थापनेनंतर हिंजवडी आयटी पार्कची वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले. ‘कनेक्टिव्हिटी’च्या अभावामुळे नुकसान होऊ नये, असे प्रत्येकाला वाटते. वेळ वाचला तर कुटुंबाला वेळ देता येईल. शेतमालासह उत्पादनांना बाजारपेठ वेळेत मिळावी, असे वाटत असते. सर्वसामान्यांना मुलांना शाळेला सहज जाता यावे, वाहतूककोंडीत अडकू नये, असे वाटते. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारांचा पायाभूत सुविधांवर भर आहे. त्यामुळे ‘नेक्स्ट जनरेशन इन्फ्रास्ट्रक्चर’ आणि ट्रान्सपोर्ट सेक्टरच्या एकत्रीकरणावर भर दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रो