शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

मेट्रोने आयटीला गती, आयटीयन्सने व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 01:44 IST

आयटीयन्सची भावना : पूरक रस्ते आणि वॉकिंग मार्गासह वेगात काम होण्याची अपेक्षा

पुणे : मेट्रोच्या उभारणीने शहरातील माहिती आणि तंत्रज्ञान उद्योगाला (आयटी) गती मिळेल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडूनदेखील मेट्रोचे काम लवकर व्हावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येत होती. मेट्रो मर्गासह पूरक रस्ते, पादचारी मार्गांचे जाळे अशी सुसज्ज व्यवस्था असल्यास आयटी उद्योगासाठी ते फायदेशीरच ठरेल, अशी भूमिका आयटी उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १८) मेट्रोच्या कामांचे उद्घाटन झाले. या पार्श्वभूमीवर, आयटी उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले मत मांडले. हिंजवडी इंडस्ट्री असोसिएशनच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य केदार परांजपे म्हणाले, ‘‘शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहनांसाठी रस्ते कायमच अपुरे पडणार आहेत. आयटी क्षेत्रात वेतन चांगले असल्याने अनेकांचा कल चारचाकी घेण्याकडे असतो. त्यामुळेदेखील वाहतूककोंडीत भरच पडते. मेट्रो झाल्यास वाहतूक अधिक वेगवान होईल. त्यामुळे वैयक्तिक वाहन वापरण्याची गरज फारशी राहणार नाही. मेट्रोच्या नियोजनानुसार शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्याचा फायदा पोहोचविण्याचा प्रयत्न असेल. म्हणजे मेट्रो स्थानकापर्यंत सहज जाता यावे यासाठी पूरक रस्ते, स्काय वॉक असेल. उलट सरकारने लवकरात लवकर हा प्रकल्प कसा मार्गी लागेल, हे पाहिले पाहिजे. हिंजवडी येथील उद्योजकांच्या संघटनेकडूनदेखील मेट्रो प्रकल्प व्हावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत होता.’’सॉफ्टवेअर एक्सपोर्टर असोसिएशनचे सचिव विद्याधर पुरंदरे म्हणाले, ‘‘बंगळुरूपाठोपाठ आयटी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील वाहतुकीची स्थिती फारशी चांगली नाही. प्रत्येक कर्मचाºयाला कार्यालयात येण्यासाठी सरासरी एक तास लागतो. मेट्रो सुरू झाल्यानंतर वाहतूक अधिक वेगवान होईल. त्यामुळे मेट्रोचा मार्ग हिंजवडी फेज-३ पर्यंत करावा, अशी मागणी येथील उद्योजकांनीच केली होती. आयटी उद्योजकांकडून मेट्रोचे स्वागतच करण्यात येत आहे. मेट्रोसाठी तयार करण्यात येणाºया पायाभूत सुविधांमुळे सार्वजनिक वाहतुकीत सुधारणा होईल.हिंजवडीतील वाहतूककोंडीची समस्या४हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाºया सॉफ्टवेअर इंजिनिअरना वाहतूककोंडीच्या समस्येने अनेक वर्षे ग्रासलेले आहे. काही महिन्यांपूर्वी पीएमआरडीएने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले, की शिवाजी चौक, हिंजवडी येथे दररोज १ लाख १५ हजार वाहनांची ये-जा होते. त्यातून सुमारे पाच लाख ११ हजार लोक प्रवास करतात. पुण्यात सार्वजनिक वाहतुकीचे प्रमाण १९ टक्के, तर हिंजवडी क्षेत्रामध्ये ते केवळ १० टक्के आहे. ९० टक्के खासगी वाहनांपैकी ५३ टक्के दुचाकी व ३६ टक्के चारचाकी आहेत. सकाळी १० ते ११ वाजता व सायंकाळी ७ ते रात्री ८ या धावपळीच्या वेळी वाकड चौकातून ताशी साडेदहा हजार गाड्या धावतात; त्यामुळे वाहतूककोंडी होऊन तरुण इंजिनिअरचा महत्त्वाचा वेळ नष्ट होतो. यामुळे २०१५मध्ये पीएमआरडीएच्या स्थापनेनंतर हिंजवडी आयटी पार्कची वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले. ‘कनेक्टिव्हिटी’च्या अभावामुळे नुकसान होऊ नये, असे प्रत्येकाला वाटते. वेळ वाचला तर कुटुंबाला वेळ देता येईल. शेतमालासह उत्पादनांना बाजारपेठ वेळेत मिळावी, असे वाटत असते. सर्वसामान्यांना मुलांना शाळेला सहज जाता यावे, वाहतूककोंडीत अडकू नये, असे वाटते. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारांचा पायाभूत सुविधांवर भर आहे. त्यामुळे ‘नेक्स्ट जनरेशन इन्फ्रास्ट्रक्चर’ आणि ट्रान्सपोर्ट सेक्टरच्या एकत्रीकरणावर भर दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रो