शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पशुसंवर्धन पदभरतींच्या नुसत्याच घोषणा; तब्बल ५० हजार विद्यार्थी तयारीत, परीक्षा कधी घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 10:39 IST

परीक्षेबाबत मात्र पशुसंवर्धन विभाग अन् मंत्रालयाची टोलवाटोलवी

अभिजित कोळपे

पुणे : राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाने २०१७ साली १३८ पदांची, तर २०१९ साली ७२९ या सरळसेवा गट-‘क’ संवर्गातील विविध पदांची भरती जाहीर केली आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात दोन परीक्षांची केवळ जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्याबाबत परीक्षा कधी घेणार, कशी घेणार याबाबत काहीही माहिती दिली जात नाही. राज्यभरातून जवळपास ५० हजारांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी पशुसंवर्धन आयुक्तालय आणि मंत्रालयात वारंवार चौकशी केली. मात्र, ठोस उत्तर न देता केवळ एकमेकांवर टोलवाटोलवी सुरू आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे. राज्य सरकार याची दखल घेणार आहे की नाही, असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत.

पशुसंवर्धन विभागाच्या ८६७ पदांसाठी राज्यातील ४८ हजार २५८ विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जापोटी विभागाला ९५ लाख ९७ हजार ८०० रूपयांचा महसुल मिळाला आहे. मात्र, या परीक्षा नक्की कधी घेणार याबाबत काहीही कल्पना दिली जात नाही. तसेच परीक्षा कधी घेणार, कशी घेणार याबाबत उत्तर देण्यास बंधनकारक नाही, अशी उत्तरे विद्यार्थ्यांना दिली जात आहेत. पशुसंवर्धन आयुक्तालय आणि मंत्रालयातील सचिवालय यांच्या टोलवाटोलवीत आता राज्य सरकारने लक्ष घालून याबाबत लवकर निर्णय जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

जाहिरात कोणी काढली... त्यांनाच परीक्षेबाबत विचारा?

एमपीएससी समन्वय समितीचे महेश घरबुडे यांनी सांगितले, की याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहे. माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. मात्र, त्यावर मंत्रालयातील सचिवालय म्हणते जाहिरात कोणी काढली. त्यांनाच परीक्षा कधी घेणार याबाबत विचारा, तर पशुसंवर्धन आयुक्तालय म्हणतेय मंत्रालयातून पदभरतीला मान्यता मिळत नाही. गेल्या पाच वर्षांपासून टोलवाटोलवी सुरू आहे. तर या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड निराशेचे वातावरण आहे. परीक्षार्थी मुलांचे वय वाढत चालले आहे. त्याचा विचार करून याबाबत गांभीर्याने संबंधित यंत्रणा केव्हा पाऊले उचलणार आहे, असा प्रश्न धुळे येथील योगेश जाधव या परीक्षार्थीने केला आहे.

''राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत आहे. कोविडमुळे प्रभावित झालेले वाणिज्यिक क्षेत्र आणि त्या अनुषंगाने नोकऱ्यांवर ओढवलेली संक्रांत यामुळे बेरोजगार हवालदिल झाला आहे. एक सरकारी नोकरी म्हणजे संपूर्ण कुटुंबाच्या सर्वांगीण प्रगतीची शाश्वतता असते. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत बेरोजगारांना आधार द्यावा असे लातूरचा परीक्षार्थी किशोर काळे म्हणाला आहे.''   

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षणStudentविद्यार्थीGovernmentसरकार