शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पशुसंवर्धन पदभरतींच्या नुसत्याच घोषणा; तब्बल ५० हजार विद्यार्थी तयारीत, परीक्षा कधी घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 10:39 IST

परीक्षेबाबत मात्र पशुसंवर्धन विभाग अन् मंत्रालयाची टोलवाटोलवी

अभिजित कोळपे

पुणे : राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाने २०१७ साली १३८ पदांची, तर २०१९ साली ७२९ या सरळसेवा गट-‘क’ संवर्गातील विविध पदांची भरती जाहीर केली आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात दोन परीक्षांची केवळ जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्याबाबत परीक्षा कधी घेणार, कशी घेणार याबाबत काहीही माहिती दिली जात नाही. राज्यभरातून जवळपास ५० हजारांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी पशुसंवर्धन आयुक्तालय आणि मंत्रालयात वारंवार चौकशी केली. मात्र, ठोस उत्तर न देता केवळ एकमेकांवर टोलवाटोलवी सुरू आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे. राज्य सरकार याची दखल घेणार आहे की नाही, असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत.

पशुसंवर्धन विभागाच्या ८६७ पदांसाठी राज्यातील ४८ हजार २५८ विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जापोटी विभागाला ९५ लाख ९७ हजार ८०० रूपयांचा महसुल मिळाला आहे. मात्र, या परीक्षा नक्की कधी घेणार याबाबत काहीही कल्पना दिली जात नाही. तसेच परीक्षा कधी घेणार, कशी घेणार याबाबत उत्तर देण्यास बंधनकारक नाही, अशी उत्तरे विद्यार्थ्यांना दिली जात आहेत. पशुसंवर्धन आयुक्तालय आणि मंत्रालयातील सचिवालय यांच्या टोलवाटोलवीत आता राज्य सरकारने लक्ष घालून याबाबत लवकर निर्णय जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

जाहिरात कोणी काढली... त्यांनाच परीक्षेबाबत विचारा?

एमपीएससी समन्वय समितीचे महेश घरबुडे यांनी सांगितले, की याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहे. माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. मात्र, त्यावर मंत्रालयातील सचिवालय म्हणते जाहिरात कोणी काढली. त्यांनाच परीक्षा कधी घेणार याबाबत विचारा, तर पशुसंवर्धन आयुक्तालय म्हणतेय मंत्रालयातून पदभरतीला मान्यता मिळत नाही. गेल्या पाच वर्षांपासून टोलवाटोलवी सुरू आहे. तर या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड निराशेचे वातावरण आहे. परीक्षार्थी मुलांचे वय वाढत चालले आहे. त्याचा विचार करून याबाबत गांभीर्याने संबंधित यंत्रणा केव्हा पाऊले उचलणार आहे, असा प्रश्न धुळे येथील योगेश जाधव या परीक्षार्थीने केला आहे.

''राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत आहे. कोविडमुळे प्रभावित झालेले वाणिज्यिक क्षेत्र आणि त्या अनुषंगाने नोकऱ्यांवर ओढवलेली संक्रांत यामुळे बेरोजगार हवालदिल झाला आहे. एक सरकारी नोकरी म्हणजे संपूर्ण कुटुंबाच्या सर्वांगीण प्रगतीची शाश्वतता असते. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत बेरोजगारांना आधार द्यावा असे लातूरचा परीक्षार्थी किशोर काळे म्हणाला आहे.''   

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षणStudentविद्यार्थीGovernmentसरकार