शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणात रानभाज्यांचा औषधी मेवा दुर्मिळ; आरोग्य ठेवतात निरोगी

By श्रद्धा पोटफोडे | Updated: August 1, 2022 16:52 IST

वनस्पतींचा ठेवा जतन करायला हवा

श्रीकिशन काळे   

पुणे : श्रावण महिन्यात सणवार खूप असल्याने पूजनासाठी तसेच खाण्यासाठी अनेक फुलांची, पानांची, वनस्पतींची गरज असते. रानमाळावरील रानभाज्या याच श्रावणात फुलतात. त्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत हाेते. केवळ श्रावणात फुलणाऱ्या या वनस्पतींचे गुणधर्म औषधी असल्याने त्यांची चव चाखायला हवी. पण त्या मिळणे दुर्मिळ झाल्या आहेत.  त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अन्यथा भावी पिढीला या रानभाज्यांचा मेवा चाखायला मिळणार नाही.

श्रावण महिन्यात धरित्री हिरवीगार होऊन जाते. नानाविध वनस्पती पर्णसंभार आणि फुलांनी नटलेली असतात. सृष्टीत नवचैतन्य निर्माण झालेले असते. सृजनाचा हा काळ असतो आणि म्हणून भरपूर वनस्पती फुललेल्या पहायला मिळतात. रानभाज्या या औषधी असतात, त्यामुळे आरोग्य चांगले राहते. म्हणून श्रावणात रानभाज्यांचे महोत्सव होतात. रानभाज्या खाऊन आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा.  आज (दि.१) पहिला श्रावण सोमवार आहे. शिवशंकराचा हा दिवस समजला जातो. शिवशंकराला प्रिय पत्री अर्क (रूई), कण्हेर, बिल्व, धोत्रा, शमीपुष्प, द्रोणपुष्प, नीलकमल. बेल, कवठ, निरगुडी या समान गुणधर्मी आहेत. बेल रक्तदाब, उदरविकारांवर गुणकारी आहे. धोत्रा हा श्वसनमार्गाच्या रोगांमध्ये रामबाण औषध आहे. कण्हेर सर्पदंशावर गुणकारी आहे.

एकवीस वनस्पती औषधी

गणपतीपूजनाला एकवीस प्रकारची पत्री लागते. या सर्व पत्री औषधी गुणधर्माच्या आहेत. यामध्ये मधुमालती, माका, बेल, दुर्वा, बोर, धोत्रा, तुळस, आघाडा, शमी, केवडा, डोरली, कण्हेर, रूई, अर्जुन, विष्णूक्रांत, डाळींब, देवदार, मरवा, पिंपळ, जाई, हादगा यांचा समावेश आहे.  

सणवारी खाल्ल्या जाणाऱ्या रानभाज्या

- श्रावण सोमवारी कौला/कैलाच्या पानांची भाजी करतात- श्रावण शुक्रवारी जिवतीच्या फुलांची भाजी- श्रावण शनिवारी राजगिरा, कुर्डू, कुळी, टाकळा आणि आम्लीच्या पानांची एकत्रित पंचभेळी भाजी करतात- ऋषीपंचमीला बऱ्याच रानभाज्यांची मिळून एक मिसळ भाजी करतात. भाज्या - देठी, देवभात, भारंगी, चाव्याचा बार/शेंडवेल, चिचार्डी, मेकी, पाथरी, कुर्डू, रानअळू.- गौरी आणतात त्या दिवशी केनी व कुर्डूच्या पानांची भाजी- बैल पोळ्याला चवळीच्या पानांचे बेसन घालून मुठे करतात.-वसुबारसेला गोवर्धन पूजा करताना सुरण, आळूकंद, करंदकंद आणि काशी कोहळा यांची भाजी

शेतकऱ्यांनी काही रानभाज्या लावाव्यात

रानभाज्या आपोआप येतात. पण काहींच्या कलमं, बिया, पानं घेऊन ती लावता येऊ शकतात. भारंगीचे काप घेऊन त्याची रोपं करायला हवीत. रानभाज्यांच्या बिया जपून ठेवता येतील. त्यापासून अभिवृध्दी करता येईल. शेतकऱ्यांनी बांधावर बिया टाकून वनस्पती वाढवल्या, तर त्यांना उत्पन्नाचे नवे साधन मिळेल.  

आता रानभाज्या शहरातही कमीच येतात

 ''श्रावणात अनेक औषधी वनस्पती फुलतात.  त्या मोकळ्या रानावर येतात. खेड्यात मिळतात. शहरात मोकळी रान नसल्याने इथे नाहीत. शहरात केना, घेाळ, वेलांचे प्रकार दिसतात. पण आता रानभाज्या शहरातही कमीच येतात. त्या मिळणं दुरापास्त झाले आहे. -डॉ. प्राची क्षीरसागर, वनस्पती संशोधक''

टाकळा वर्षातून दोनदाच खावा

या भाज्या सतत खायच्या नसतात. टाकळा वर्षातून दोनदाच खावा लागतो. कारण खूप खाल्ला तर त्याचे विपरीत परिणाम होतात. टाकळा हा खांदेदुखी कमी करतो आणि पचनशक्ती चांगली ठेवतो. तसेच या भाज्या कशा कराव्यात, त्याची प्रक्रिया माहिती हवी. त्यातील टॉक्सिन निघाले पाहिजे. काही भाज्या उखळून त्याचे पाणी टाकून द्यावे लागते, जेणेकरून त्यातील टॉक्सिन निघून जाते. काही भाज्यांत चिंच गुळ घालावे लागते. तर काही रात्री भिजून ठेवावे लागतात, असे डॉ. प्राची क्षीरसागर यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेShravan Specialश्रावण स्पेशलmedicineऔषधंSocialसामाजिक