शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बारामतीत शरद भोजन योजनेमुळे गरिबांच्या पोटाला चार घास ; 15 हजार 489 लाभार्थी कुटुंबाना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 15:39 IST

तालुका व शहरातील लाभार्थी कुटुंबाना दिलासा 

ठळक मुद्देशरद भोजन योजनेच्या चार टप्प्यात तालुक्यातील एकूण 15 हजार 489 लाभार्थी कुटुंबाचा समावेश

रविकिरण सासवडे बारामती: पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या  शरद भोजन योजनेचा सर्वसामान्य व गरीब कुटुंबाच्या पोटाला चार घास मिळू लागले आहेत.  या योजनेच्या चार टप्प्यात तालुक्यातील एकूण 15 हजार 489 लाभार्थी कुटुंबाचा समावेश आहे. तर जिल्हा परिषदेच्या सहकार्याने या योजने अंतर्गत बारामती शहरातील 1 हजार 800 कुटुंबाना नगरपालिका गहू व तांदूळ पुरवठा येत्या दोन दिवसात सुरू करणार आहे. संचारबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर झाला होता. यापार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने  शरद भोजन योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत कोणतेही कागदपत्रे नसतानाही गरजूंना अन्नधान्य दिलं जात आहे. या योजनेमुळे  परप्रांतीय मजुरांना देखील दिलासा मिळाला आहे.  या माध्यमातून दारिद्रयरेषेखालील आणि इतर व्यक्तींना रेशन पुरवण्याचं काम होत आहे. शरद भोजन योजनेच्या पहिल्या टप्प्यात बारामती तालुक्यातील 50 निराधार व्यक्तींना 50 रुपये थाळीप्रमाणे दोनवेळचे तयार जेवण अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून पुरवण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील जे 60 टक्के अपंग व ज्या अपंग व्यक्तींना जिल्हा परिषदेचा निर्वाहभत्ता मिळतो अशा  483 दिव्यांग नागरिकांना  अन्नधान्य देण्यात  आले. यामध्ये तांदूळ,  गहूपीठ,  डाळ व कांदे यांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये तालुक्यात ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाहीत अशा 1 हजार 10 कुटुंबाना 3 किलो गहू व दोन किलो तांदूळ वाटप करण्यात आले आहे. शरद भोजन योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात ज्यांच्याकडे कोणतीच कागदपत्रे, रेशनकार्ड, आधारकार्ड नाही, अशा नागरिकांना अन्नधान्य पुरविण्यात येत आहे.  ग्रामपंचायतीबरोबरच नगरपालिकेच्या हद्दीतही जिल्हा परिषद ही योजना राबवत आहे.

तिसऱ्या टप्प्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक व फूड कॅपोर्रेशन ऑफ इंडिया यांची मोठी मदत झाली आहे. बारामती तालुक्यात चौथ्या टप्प्यात कुरकुंभ एमआयडीसीतील कारगिल इंडिया कंपनीच्या मदतीने आशा स्वयंसेविका,  अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी,  दिव्यांग व्यक्ती,  अंत्योदय लाभार्थी यांना प्रत्येकी 1 लिटर याप्रमाणे खाद्यतेलाचे वाटप सध्या तालुक्यात सुरू आहे. 

बारामती तालुक्यातील योजनेची आकडेवारी...टप्पा           लाभार्थी          लाभार्थी प्रकार                                     वाटप वस्तू पहिला        50                   निराधार                                            तयार जेवण दुसरा          483              दिव्यांग व्यक्ती                                    तांदूळ, गहूपीठ,  डाळ, कांदे तिसरा       1, 010           शिधा प्रत्रिका नसणारे                             तांदूळ,  गहू चौथा         13, 946        अंगणवाडी-अशा सेविका,

                                  दिव्यांग, आरोग्य कर्मचारी, अंत्योदय        खाद्यतेल  1 लिटर प्रत्येकी 

यामध्ये बारामती शहरातील 1 हजार 800 कुटुंबाना तिसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या सहकार्याने धान्य वाटप करण्यात येणार आहे. 

जिल्हा परिषदेकडून नगरपालिकेला धान्य प्राप्त झाले आहे. दोन किलो तांदूळ व 3 किलो गहू याप्रमाणे त्याचे किट बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. दोन दिवसात हे किट लाभार्थी कुटुंबाला देण्यात येणार आहे. - योगेश कडूसकर, मुख्याधिकारी, बारामती नगरपालिका. 

तालुक्यात शरद भोजन योजना गरजू कुटुंबापर्यंत पोहचवण्यात पंचायत समिती प्रशासनाला यश आले आहे. सध्या चौथ्या टप्प्यातील खाद्यतेल वाटप सुरू आहे.- राहुल काळभोर ,गटविकास अधिकारी,  बारामती पंचायत समिती.    

टॅग्स :BaramatiबारामतीState Governmentराज्य सरकारfoodअन्नCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसzpजिल्हा परिषद