शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
3
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
4
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
5
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
6
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
7
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
8
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
9
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
10
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
11
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
12
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
13
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
14
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
15
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
16
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
17
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
18
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
19
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
20
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

लोकसहभागातून व्यापक परिवर्तन : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 12:02 IST

‘नाम’चा वर्धापन दिन

पुणे : ‘सामाजिक संघटनांकडून होत असलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे समाजपरिवर्तन होत आहे. सरकारपेक्षा लोकसहभागातून अधिक परिणामकारक परिवर्तन घडू शकते. केंद्राने जलसंधारण कामांमध्ये या संघटनांना स्थान दिल्यास  सरकार आणि समाज एकत्र येऊन परिवर्तनाची गती अधिक वाढेल,’ असे प्रतिपादन  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘नाम फाउंडेशन’च्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शनिवारी ते बोलत होते. 

‘नाम’सह अन्य संघटनांनी केलेल्या कामांमुळे दुसरी इयत्ताही न शिकलेला शेतकरी  पाण्याचे इंजिनिअरिंग समजू लागला. जलसंधारणाची कामे पाहून त्या अहवालावर केंद्र सरकारने देशभरासाठी शासन निर्णय जारी केले, असेही  उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

राजकारणाचा स्तर घसरला : नाना पाटेकर

‘नाम फाउंडेशन’चे संस्थापक ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सध्याच्या राजकारणावर कडक ताशेरे ओढत राजकारणाचा स्तर घसरल्याची खंत व्यक्त केली.

सत्ताधारी व विरोधकांचे नाते दात व जिभेसारखे असून, त्यांनी गुण्यागोविंदाने राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

स्वामीनाथन  आयोग लागू करण्याची मागणी 

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंशत: लागू करण्यात आल्या आहेत. त्या पूर्णपणे लागू कराव्यात, अशी मागणी नाना पाटेकर यांनी केली. कर्जमाफी किंवा पैशांची गरज नसून शिफारशी पूर्ण लागू झाल्यावर शेतकऱ्यांचा मोठा सन्मान होईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNana Patekarनाना पाटेकरPuneपुणे