शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

एनआरसी, कॅब विरोधात विद्यापीठात मशाल मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 20:27 IST

विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात बसून अभ्यास करणे अपेक्षित असताना त्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ या सरकारने आणली

ठळक मुद्देदिल्ली येथील जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध

पुणे: एनआरसी, कॅब आणि पीपल्स रजिस्ट्रेशन देशभरात लागू करून धर्मानुसार नागरिकत्व ठरविण्याचा केंद्र शासनाचा डाव आहे. केंद्र शासनाच्या या संविधान विरोधी धोरणाच्या विरोधात आणि दिल्ली येथील जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शेकडो विद्यार्थ्यांनी ‘मशाल मोर्चा’ काढला. तसेच संविधान विरोधी विधेयकांच्या विरोधात देशातील प्रत्येक नागरिकाने उभे राहिले पाहिजे, असे आवाहन यावेळी केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह पुणे शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या ‘मशाल मार्च’मध्ये सहभाग घेतला. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळील संविधान स्तंभापासून पर्यावरण विभागाजवळील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्याविरोधात घोषणा दिल्या.मोर्चाच्या सुरूवातील विद्यार्थ्यांनी व खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोगत व्यक्त केले.केंद्र शासन एनआरसी,नागरीकत्व सुधारणा विधेयक आणि पीपल्स रजिस्टरच्या निमित्ताने धर्मावरून भेदभाव आणि ध्रुविकरण करत असून हे संविधान विरोधी आहे. ‘पीपल्स रजिस्टर’ हे रजिस्टर तयार करून जातीय आणि धार्मिक समुहाचे विभागवार तपशील जाहीर करण्याचा केंद्र शासनाचा डाव आहे. देशातील नागरिकांची नोंदणी मतदार यादी, रेशनकार्ड,पॅनकार्ड,जन्मनोंदणी ,आधारकार्ड या माध्यमातून होते. तसेच ठराविक कालावधीनंतर देशाची जनगणना होते. त्यामुळे एनआरसीची गरज नाही,अशी भूमिका यावेळी विद्यार्थ्यांनी मांडली.भारताचे नागरिकत्व हे धर्माच्या आधारावर नाही तर धर्मनिरपेक्ष आहे,असे संविधान सांगते. एनआरसीच्या निमित्ताने भीती ,दमन आणि ध्रुविकरणाच्या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचा प्रत्येक भारतीयाने विरोध केला पाहिजे,असे आवाहनही विद्यार्थ्यांनी केले. तसेच विविध गीतांमधून केंद्राच्या विधेयांकाचा विरोध केला.त्यास आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला.तसेच जामिया विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला करणा-यांना शिक्षण झाली पाहिजे,अशी मागणी यावेळी केली.--------------केंद्र शासनाच्या एनआरसी,कॅप आणि पीपल्स रजिस्टेशन या संविधान विरोधी विधेयकांना संसदेमध्येच मी विरोध केला.एक नागरिक म्हणून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी आले आहे. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात बसून अभ्यास करणे अपेक्षित असताना त्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ या सरकारने आणली.यातच केंद्र शासनाचे अपयश दिसून येते.तसेच जामिया विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची उच्च स्तरिय चौकशी झाली पाहिजे.- सुप्रिया सुळे, खासदार,

टॅग्स :PuneपुणेMorchaमोर्चाSupriya Suleसुप्रिया सुळेAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी