शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

‘मराठी आॅलिम्पियाड’ला इंग्रजी शाळांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 07:03 IST

एकीकडे खासगी इंग्रजी शाळांचे पेव फुटल्यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत. इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थी मातृभाषेपासून दूर जात आहेत.

नम्रता फडणीसपुणे : एकीकडे खासगी इंग्रजी शाळांचे पेव फुटल्यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत. इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थी मातृभाषेपासून दूर जात आहेत. हे असेच घडत राहिले तर एक दिवस मराठी भाषा लुप्त होईल की काय अशा नानाविविध शंका उपस्थित केल्या जात असताना ‘मराठी भाषा आॅलिम्पियाड’च्या अभिनव प्रयोगाने मात्र हा गैरसमज पूर्णत: खोडून काढला असून, मराठी भाषाप्रेमींना एक आशेचा किरण दाखवला आहे.विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागावी यासाठी गेल्या तीन वर्षांपासून भाषा संस्थेनेसुरू केलेल्या ‘मराठी भाषा आॅलिम्पियाड’ स्पर्धेला इंग्रजी-मराठी माध्यमांच्या शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, यंदाच्या वर्षी सातारा, सांगली, पुणे आणि मुंबईमधून जवळपास १९00 विद्यार्थी या आॅलिम्पियाड’च्या परीक्षेला बसले असल्याची माहिती मिळाली आहे.मराठी भाषेमध्ये कसदार लिहिती-वाचती पिढी निर्माण व्हावी यासाठी भाषा संस्थेतर्फे २0१५मध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा आॅलिम्पियाड ही अभिनव स्पर्धा घेण्यास सुरुवात झाली.पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या होती केवळ ५00. तीन वर्र्षांंमध्ये ही संख्या १९00वर पोहोचली. ही नक्कीच मराठी भाषेसाठी शुभवार्ता म्हणावी लागेल. या अभिनव प्रयोगाविषयी भाषा संस्थेच्या अध्यक्षा स्वाती राजे यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला.त्या म्हणाल्या, भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी आत्मीयता निर्माण व्हावी हा या स्पर्धेमागचा उद्देश आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या मनात भाषेच्या गोडीचे बीज रुजावे या दृष्टीने या स्पर्धेची आखणी करण्यात आली आहे.या स्पर्धेतून मुलांची भाषिक बुद्धिमत्ता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. चौथी आणि सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात येत असून, ज्यामध्ये ज्ञान, आकलन, उपयोजना आणि कौशल्य या चार घटकांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांच्या भाषिक आकलनाबरोबरच भाषण, संवाद आणि नवनिर्मिती क्षमता या निकषांवर आधारित प्रश्नांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश आहे. शब्दांशी खेळत भाषेचे सहजसोप्या पद्धतीने आकलन करून देणे हा या स्पर्धेचा गाभा आहे. या स्पर्धेला पालकांसह, शाळा आणि विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे पेपर पाहिल्यानंतर मुलांना मराठीमध्ये साधी वाक्येही व्यवस्थित लिहिता येत नसल्याचे दिसून आले आहे, जे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळेच शाळेमधील मराठी अभ्यासक्रमावर आधारित साचेबद्ध परीक्षेचे स्वरूप न ठेवता मुलांना भाषेबरोबर खेळता आले पाहिजे अशी स्पर्धेची बांधणी करण्यात आली आहे. या स्पर्धेमधून मुलांचा भाषिक विकास होण्यास नक्कीच मदत होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Schoolशाळा