शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

आश्चर्य! बारामती तालुक्यातील 'या' ग्रामपंचायत निवडणुकीत तब्बल ७६ उमेदवारांनी मागे घेतले अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 19:43 IST

या ग्रामपंचायत निवडणुकीत खरे तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार होती...

बारामती : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी देखील विजयासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार याबद्दल उत्सुकता असतानाच पुणे जिल्ह्यातील व बारामती तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत मात्र आश्चर्यकारक घटना घडली आहे. 

बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील तब्बल एकाचवेळी ७६ जणांनी ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये येथील ग्रामपंचायत आणि साखर कारखाना निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळते.अलीकडेच भाजपच्या ताब्यात असणारा माळेगाव साखर कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून आणला आहे. त्यानंतर सर्वांचेच लक्ष ग्रामपंचायतीकडे होते. मात्र ही अपेक्षा फोल ठरली. 

त्यामागचं कारण म्हणजे माळेगाव येथे  अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ७६ जणांनी निवडणुकीचे अर्ज मागे घेतले. कारण आता माळेगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर  नगरपंचायतीमध्ये होणार असल्याने सर्व पक्षांनी एकत्र येत याबाबत निर्णय घेतला. 

ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शासनाने या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर होणार असल्याचे जाहीर केले. याबाबत नगरविकास सचिव संजय मोघे यांनी विनंतीपत्र पाठविले होते. मात्र सध्या होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये या निवडणुकीचा देखील समावेश होता. तसेच शासनाने या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर होणार असल्याने ३ महिने निवडणूक पुढे ढकलण्याची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. मात्र तांत्रिक दृष्ट्या, नियमानुसार आयोगाला निवडणूक रद्द करता आली नाही. अवघ्या दोन महिन्यांसाठी निवडणूक लढविणे, त्यासाठीचा खर्च कोणत्याच पक्षाला आणि उमेदवाराला परवडणारा नाही. या पार्श्वभूमीवर गावातील नेते मंडळींनी निर्णायक भूमिका घेतली. त्यानुसार १७ जागांसाठी दाखल करण्यात आलेल्या ७६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. 

सोमवारी (दि. ४) ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, माजी अध्यक्ष रंजन तावरे, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे, विक्रमसिंह जाधवराव, दिलीप तावरे, रणजित तावरे, जयदीप तावरे, प्रशांत मोरे, अशोक सस्ते आदी पदाधिकाºयांनी  शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांसाठी होणारी दमछाक टळली आहे.  सध्या  दोन्ही पक्षांनी राजकीय तलवारी म्यान केल्याचे चित्र आहे. मात्र नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात येथील निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याचे संकेत आहेत. ————

टॅग्स :BaramatiबारामतीElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस