शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

Sharad Pawar: जनशक्तीने हुकूमशाही सरकारला नमवले: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 20:14 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचा धंदा परवडत नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची अवस्था बदलायची असेल तर अर्थकारण सुधारायला हवे...

पुणे: संसदेमध्ये कोणतीही चर्चा न करता सरकारने तीन कृषी कायदे पास करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याची भूमिका घेतली. या हुकूमशाही सरकारला जनशक्तीने शांततेच्या मार्गाने आंदोलन करून अन्यायकारक कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (sharad pawar) यांनी केले. ते सहकार महर्षी साहेबराव सातकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण आणि हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या विस्तारित नूतन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. 

खासदार शरद पवार यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचा धंदा परवडत नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची अवस्था बदलायची असेल तर अर्थकारण सुधारायला हवे असे सांगितले. सहकार क्षेत्रात साहेबराव सातकर यांच्या योगदानाची चर्चा केली. सहकार चळवळ पुढे न्यायची असेल तर  स्वच्छ व चोख तसेच उत्तम प्रशासकीय कारभार करण्याची गरज व्यक्त केली. साहेबराव बुट्टे पाटील यांच्या राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ही संस्था चांगले काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

उद्याच्या काळात कंपन्यांमध्ये रोजगार मिळवायचा असेल तर पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यवसायिक, तांत्रिक शिक्षणाची आवश्यकता असल्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ज्या भागात सामाजिक अशांतता आहे; तिथला विकास होत नसल्याचे सांगून गुन्हेगारीवर वचक बसवणार असल्याचे पवार म्हणाले. विधिमंडळात नुकताच मंजूर केलेल्या शक्ती कायद्याचे महत्त्व सांगून महिलांच्या सक्षमीकरणावर त्यांनी भर दिला. साहेबराव सातारकर यांचे सहकारातील योगदान कथन केले. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक वाटचालीचे पवार त्यांनी कौतुक केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil) होते. याप्रसंगी नामदार दत्तात्रय भरणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते, संस्थाध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील, हिरामण सातकर, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ व खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ या संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी बांधव आणि विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवारKhedखेड