शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Sharad Pawar: जनशक्तीने हुकूमशाही सरकारला नमवले: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 20:14 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचा धंदा परवडत नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची अवस्था बदलायची असेल तर अर्थकारण सुधारायला हवे...

पुणे: संसदेमध्ये कोणतीही चर्चा न करता सरकारने तीन कृषी कायदे पास करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याची भूमिका घेतली. या हुकूमशाही सरकारला जनशक्तीने शांततेच्या मार्गाने आंदोलन करून अन्यायकारक कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (sharad pawar) यांनी केले. ते सहकार महर्षी साहेबराव सातकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण आणि हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या विस्तारित नूतन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. 

खासदार शरद पवार यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचा धंदा परवडत नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची अवस्था बदलायची असेल तर अर्थकारण सुधारायला हवे असे सांगितले. सहकार क्षेत्रात साहेबराव सातकर यांच्या योगदानाची चर्चा केली. सहकार चळवळ पुढे न्यायची असेल तर  स्वच्छ व चोख तसेच उत्तम प्रशासकीय कारभार करण्याची गरज व्यक्त केली. साहेबराव बुट्टे पाटील यांच्या राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ही संस्था चांगले काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

उद्याच्या काळात कंपन्यांमध्ये रोजगार मिळवायचा असेल तर पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यवसायिक, तांत्रिक शिक्षणाची आवश्यकता असल्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ज्या भागात सामाजिक अशांतता आहे; तिथला विकास होत नसल्याचे सांगून गुन्हेगारीवर वचक बसवणार असल्याचे पवार म्हणाले. विधिमंडळात नुकताच मंजूर केलेल्या शक्ती कायद्याचे महत्त्व सांगून महिलांच्या सक्षमीकरणावर त्यांनी भर दिला. साहेबराव सातारकर यांचे सहकारातील योगदान कथन केले. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक वाटचालीचे पवार त्यांनी कौतुक केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil) होते. याप्रसंगी नामदार दत्तात्रय भरणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते, संस्थाध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील, हिरामण सातकर, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ व खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ या संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी बांधव आणि विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवारKhedखेड