शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे यांचे सत्याच्या बाबतीत पारडे सध्यातरी जड; त्यांचे अण्णा हजारे झालेले नाहीत - कुमार सप्तर्षी

By श्रीकिशन काळे | Updated: December 24, 2023 17:56 IST

मराठा ही मूळात जात नसून हा एक संघ आहे, त्यांच्यात देखील चातुर्वण्य व्यवस्था आहे

पुणे: मराठे त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. संधीची कवाडे नाकारलेल्या मराठ्यांमधील मनोज जरांगे हे नेतृत्व असून, ते अनघड नेतृत्व आहे. जे जे अनघड असते, ते सत्य असते. मनोज जरांगे यांचे सत्याच्या बाबतीत पारडे सध्यातरी जड आहे. अण्णा हजारे आधी असेच अनघड होते, पण ते जेव्हा राजकीय व्यक्तींच्या संपर्कात आले, तेव्हा काय झाले हे आपल्याला माहितच आहे. मनोज जरांगे यांचा अण्णा हजारे झालेले नाहीत. असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे आयोजित २३ व्या साहित्यिक कलावंत संमेलनात 'आरक्षण आणि महाराष्ट्राचे भवितव्य' ? या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. कुमार सप्तर्षी बोलत होते. या परिसंवादात सारंग दर्शने, डॉ. बाळासाहेब सराटे आणि प्रा. अविनाश कोल्हे सहभागी झाले होते.

डॉ. सप्तर्षी म्हणाले की, मनोज जरांगे यांची विखे पाटील, उदयनराजे भोसले आदी भोसले घराण्यातील प्रतिनिधी या प्रगत मराठ्यांशी तुलना करून चालणार नाही. प्रगत मराठ्यांनी त्यांच्यातीलच वंचित आणि गरीब मराठ्यांना स्वीकारले नाही. मराठा ही मूळात जात नसून हा एक संघ आहे. त्यांच्यात देखील चातुर्वण्य व्यवस्था आहे. उच्चवर्णीय मराठ्यांनी फडणवीसांचे नेतृत्व स्वीकारले आहे. मराठ्यांमधील उतरंडीच्या क्रमानुसार खालच्या श्रेणीतील मराठ्यांना काळानुरूप राजकीय शहाणपण आले असून ते त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. 

प्रा. अविनाश कोल्हे म्हणाले की, ९० सालापासून जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्याने सर्वच परिमाणे बदलली. सरकारने अनेक क्षेत्रातून माघार घेत खाजगीकरण केले. त्यामुळे सरकारी नोकऱ्या कमी झाल्या. सध्याची आरक्षणाकरीता सुरू असलेली भांडणे पाहून मनात असा विचार येतो की, समोर असे काय आहे की ज्यासाठी ही भांडणे सुरू आहेत.

सारंग दर्शने म्हणाले की, ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेत प्रगतीचे टप्पे गाठले त्यांनी प्रामाणिकपणे त्यांच्या पुढच्या पिढीचे आरक्षण नाकारले का, हा आत्मचिंतनाचा विषय आहे. प्रगती होऊनही आरक्षणाचे लाभ घेत राहणे, हे कोणत्या तत्वात बसते. आज मराठवाड्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कुणबी- मराठा समाजातील शेतकरीच करीत आहेत. जरांगेंच्या मनात हीच वेदना आहे.

डॉ. बाळासाहेब सराटे म्हणाले की, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि शेतीच्या पडलेल्या तुकड्यांमुळे वाटेला आलेल्या शेतीतून उदरनिर्वाह होणार नाही, याची जाणीव झाल्यानेच मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे आलेला आहे.

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलKumar Saptarshiकुमार सप्तर्षीMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठा