शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Manoj Jarange Patil: "मराठा समाजाला आरक्षण ‘ओबीसी’मधूनच हवंय..." मराठा वादळ मुंबईकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 18:53 IST

पोलिस प्रशासनाने मुंबईतील आझाद व शिवाजी मैदान मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनास नाकारले आहे....

लोणावळा (पुणे) : आम्ही मुंबईत येण्यापूर्वी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढावा. आम्ही चर्चेला तयार आहोत; मात्र चर्चा करण्यासाठी या तिघांनी यावं. इतर कोणाला पाठवू नये, मराठा समाजाचा एकही तरुण तुम्हाला काही बोलणार नाही, त्याचा शब्द मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री देतो, मराठा समाजाला आरक्षण ‘ओबीसी’मधूनच हवंय, अशी ठाम भूमिका मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी वाकसईचाळ येथील सभेत गुरुवारी व्यक्त मांडली.

पोलिस प्रशासनाने मुंबईतील आझाद व शिवाजी मैदान मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनास नाकारले आहे. वाकसईचाळ येथील सभेत जरांगे-पाटील म्हणाले, आम्ही शांततेत उपोषण करायला चाललो आहे. कारण, आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आझाद मैदानात शांततेत आमरण उपोषण करणार आहे. आम्हाला कायदा व संविधानाने तो अधिकार दिला आहे. मी उपोषण हे आझाद मैदानावरच करणार आहे. मराठा समाजाचे आंदोलन हे शांततेच्या मार्गाने होणार आहे. मुंबईत कोणतीही गडबड, गोंधळ होणार नाही, याचा शब्द मी समाजाच्या वतीने देतो; मात्र आमची व मुंबईकरांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी शासनाने घ्यावी. आम्ही मुंबईत येण्यापूर्वी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढावा. आम्ही चर्चेला तयार आहोत; मात्र चर्चा करण्यासाठी या तिघांनी यावं. इतर कोणाला पाठवू नये, मराठा समाजाचा एकही तरुण तुम्हाला काही बोलणार नाही. त्याचा शब्द मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना देतो.

आरक्षण हवं आहे ते तुम्ही कुठेही द्या

मनोज जरांगे-पाटील म्हणाले, आम्हाला आरक्षण हवं आहे. ते तुम्ही कुठेही द्या. लोणावळ्यात द्या, वाशीमध्ये द्या, मुंबईमध्ये द्या किंवा अजून कुठे द्या; पण आम्हाला आरक्षण द्या व तेसुद्धा ‘ओबीसी’मधूनच द्या. इथून तिथून ते देऊ नका. ते आम्हाला मान्य नाही. ज्या ५४ लाख नागरिकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना व त्यांचे सगेसोयरे, गणगोत, सगेसोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. या आमच्या मागण्यांवर आम्ही ठाम असून, शासनाने त्या मागण्या मान्य कराव्यात.

मराठे जेव्हा-जेव्हा लढले तेव्हा इतिहास घडला

जरांगे-पाटील म्हणाले, मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मागील ७० वर्षे निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हता, आता मात्र समाजाच्या शांततेच्या आंदोलनामुळे तो अंतिम टप्प्यात आला आहे. मराठे जेव्हा-जेव्हा लढले तेव्हा इतिहास घडला. आता देखील मराठे शांततेत आले व शांततेमध्ये आरक्षण घेऊन गेले हा दुसरा इतिहास आपल्याला घडवायचा आहे. याकरिता मुंबईत गेल्यावर कोणीही शिस्तीचे उल्लंघन करणार नाही. प्रत्येकाने स्वयंसेवकाची भूमिका पार पाडत एक दुसऱ्याला मदत करायची, गाड्या एकामागे एकच ठेवायच्या.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणPuneपुणे