शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Manoj Jarange Patil: "मराठा समाजाला आरक्षण ‘ओबीसी’मधूनच हवंय..." मराठा वादळ मुंबईकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 18:53 IST

पोलिस प्रशासनाने मुंबईतील आझाद व शिवाजी मैदान मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनास नाकारले आहे....

लोणावळा (पुणे) : आम्ही मुंबईत येण्यापूर्वी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढावा. आम्ही चर्चेला तयार आहोत; मात्र चर्चा करण्यासाठी या तिघांनी यावं. इतर कोणाला पाठवू नये, मराठा समाजाचा एकही तरुण तुम्हाला काही बोलणार नाही, त्याचा शब्द मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री देतो, मराठा समाजाला आरक्षण ‘ओबीसी’मधूनच हवंय, अशी ठाम भूमिका मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी वाकसईचाळ येथील सभेत गुरुवारी व्यक्त मांडली.

पोलिस प्रशासनाने मुंबईतील आझाद व शिवाजी मैदान मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनास नाकारले आहे. वाकसईचाळ येथील सभेत जरांगे-पाटील म्हणाले, आम्ही शांततेत उपोषण करायला चाललो आहे. कारण, आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आझाद मैदानात शांततेत आमरण उपोषण करणार आहे. आम्हाला कायदा व संविधानाने तो अधिकार दिला आहे. मी उपोषण हे आझाद मैदानावरच करणार आहे. मराठा समाजाचे आंदोलन हे शांततेच्या मार्गाने होणार आहे. मुंबईत कोणतीही गडबड, गोंधळ होणार नाही, याचा शब्द मी समाजाच्या वतीने देतो; मात्र आमची व मुंबईकरांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी शासनाने घ्यावी. आम्ही मुंबईत येण्यापूर्वी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढावा. आम्ही चर्चेला तयार आहोत; मात्र चर्चा करण्यासाठी या तिघांनी यावं. इतर कोणाला पाठवू नये, मराठा समाजाचा एकही तरुण तुम्हाला काही बोलणार नाही. त्याचा शब्द मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना देतो.

आरक्षण हवं आहे ते तुम्ही कुठेही द्या

मनोज जरांगे-पाटील म्हणाले, आम्हाला आरक्षण हवं आहे. ते तुम्ही कुठेही द्या. लोणावळ्यात द्या, वाशीमध्ये द्या, मुंबईमध्ये द्या किंवा अजून कुठे द्या; पण आम्हाला आरक्षण द्या व तेसुद्धा ‘ओबीसी’मधूनच द्या. इथून तिथून ते देऊ नका. ते आम्हाला मान्य नाही. ज्या ५४ लाख नागरिकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना व त्यांचे सगेसोयरे, गणगोत, सगेसोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. या आमच्या मागण्यांवर आम्ही ठाम असून, शासनाने त्या मागण्या मान्य कराव्यात.

मराठे जेव्हा-जेव्हा लढले तेव्हा इतिहास घडला

जरांगे-पाटील म्हणाले, मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मागील ७० वर्षे निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हता, आता मात्र समाजाच्या शांततेच्या आंदोलनामुळे तो अंतिम टप्प्यात आला आहे. मराठे जेव्हा-जेव्हा लढले तेव्हा इतिहास घडला. आता देखील मराठे शांततेत आले व शांततेमध्ये आरक्षण घेऊन गेले हा दुसरा इतिहास आपल्याला घडवायचा आहे. याकरिता मुंबईत गेल्यावर कोणीही शिस्तीचे उल्लंघन करणार नाही. प्रत्येकाने स्वयंसेवकाची भूमिका पार पाडत एक दुसऱ्याला मदत करायची, गाड्या एकामागे एकच ठेवायच्या.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणPuneपुणे