शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

Manoj Jarange Patil: "मराठा समाजाला आरक्षण ‘ओबीसी’मधूनच हवंय..." मराठा वादळ मुंबईकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 18:53 IST

पोलिस प्रशासनाने मुंबईतील आझाद व शिवाजी मैदान मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनास नाकारले आहे....

लोणावळा (पुणे) : आम्ही मुंबईत येण्यापूर्वी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढावा. आम्ही चर्चेला तयार आहोत; मात्र चर्चा करण्यासाठी या तिघांनी यावं. इतर कोणाला पाठवू नये, मराठा समाजाचा एकही तरुण तुम्हाला काही बोलणार नाही, त्याचा शब्द मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री देतो, मराठा समाजाला आरक्षण ‘ओबीसी’मधूनच हवंय, अशी ठाम भूमिका मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी वाकसईचाळ येथील सभेत गुरुवारी व्यक्त मांडली.

पोलिस प्रशासनाने मुंबईतील आझाद व शिवाजी मैदान मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनास नाकारले आहे. वाकसईचाळ येथील सभेत जरांगे-पाटील म्हणाले, आम्ही शांततेत उपोषण करायला चाललो आहे. कारण, आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आझाद मैदानात शांततेत आमरण उपोषण करणार आहे. आम्हाला कायदा व संविधानाने तो अधिकार दिला आहे. मी उपोषण हे आझाद मैदानावरच करणार आहे. मराठा समाजाचे आंदोलन हे शांततेच्या मार्गाने होणार आहे. मुंबईत कोणतीही गडबड, गोंधळ होणार नाही, याचा शब्द मी समाजाच्या वतीने देतो; मात्र आमची व मुंबईकरांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी शासनाने घ्यावी. आम्ही मुंबईत येण्यापूर्वी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढावा. आम्ही चर्चेला तयार आहोत; मात्र चर्चा करण्यासाठी या तिघांनी यावं. इतर कोणाला पाठवू नये, मराठा समाजाचा एकही तरुण तुम्हाला काही बोलणार नाही. त्याचा शब्द मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना देतो.

आरक्षण हवं आहे ते तुम्ही कुठेही द्या

मनोज जरांगे-पाटील म्हणाले, आम्हाला आरक्षण हवं आहे. ते तुम्ही कुठेही द्या. लोणावळ्यात द्या, वाशीमध्ये द्या, मुंबईमध्ये द्या किंवा अजून कुठे द्या; पण आम्हाला आरक्षण द्या व तेसुद्धा ‘ओबीसी’मधूनच द्या. इथून तिथून ते देऊ नका. ते आम्हाला मान्य नाही. ज्या ५४ लाख नागरिकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना व त्यांचे सगेसोयरे, गणगोत, सगेसोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. या आमच्या मागण्यांवर आम्ही ठाम असून, शासनाने त्या मागण्या मान्य कराव्यात.

मराठे जेव्हा-जेव्हा लढले तेव्हा इतिहास घडला

जरांगे-पाटील म्हणाले, मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मागील ७० वर्षे निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हता, आता मात्र समाजाच्या शांततेच्या आंदोलनामुळे तो अंतिम टप्प्यात आला आहे. मराठे जेव्हा-जेव्हा लढले तेव्हा इतिहास घडला. आता देखील मराठे शांततेत आले व शांततेमध्ये आरक्षण घेऊन गेले हा दुसरा इतिहास आपल्याला घडवायचा आहे. याकरिता मुंबईत गेल्यावर कोणीही शिस्तीचे उल्लंघन करणार नाही. प्रत्येकाने स्वयंसेवकाची भूमिका पार पाडत एक दुसऱ्याला मदत करायची, गाड्या एकामागे एकच ठेवायच्या.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणPuneपुणे