शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

साडेदहाच्या वेळेवर मानाचे गणपती ठाम : हस्तक्षेप केल्यास मूर्ती विसर्जित न करण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 14:56 IST

वाद चिघळण्याची चिन्हे...

ठळक मुद्देविसर्जन मिरवणूक प्रारंभाचा वेळ बदलणार नाहीमानाच्या मंडळांनी आपली भूमिका स्पष्ट करताना दिले इतिहासातील दाखले

पुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक सकाळी साडेदहा वाजताच सुरू करण्यावर मानाचे पहिली पाच गणपती मंडळे ठाम आहे. परंपरेप्रमाणे सुरू असलेल्या या मिरवणुकीत बदल केल्यास आम्ही आमच्या श्रीं च्या मूर्ती विसर्जित करणार नाही, असा इशारा या मंडळांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे़. श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री गुरूजी तालीम मंडळ, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट व श्री केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांनी लेखी पत्राव्दारे आपले म्हणणे पोलिसांना कळविले आहे़. आपली भूमिका स्पष्ट करताना या मंडळांनी इतिहासातील दाखले देऊ केले आहेत़. गणेशोत्सव व त्याची विसर्जन मिरवणुकीने होणारी सांगता याने शहराची ओळख संपूर्ण जगात झाली आहे़. ही विसर्जन मिरवणूक सुनियोजित व शिस्तबध्द व्हावी़, यासाठी लोकमान्य टिळक यांनी १२६ वर्षांपूर्वी त्यांच्या सहकाऱ्यांशी सल्ला मसलत करून मिरवणुकीत प्रमुख मंडळांनी सहभागी होण्यासाठीची तर्कसंगत क्रमवारी निश्चित केली आहे़. मानाचे पाच गणपती ही मिरवणूक याच तर्कसंगत क्रमवारीनुसार कायदा व सुव्यवस्थेला बाधा न आणता अव्याहतपणे सुरू आहे़. परंतू या सुव्यवस्थेला छेद देण्याविषयीची चर्चा सध्या सुरू असून, यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे़. ही असंदिग्धता उत्सव काळात कायम राहिली अथवा वरील विसर्जन मिरवणुकीच्या सुव्यवस्थेत बदल केल्यास आम्ही आमच्या श्रीं च्या मूर्ती विसर्जित करणार नाही़. तसेच असे झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन पुण्यातील ऐतिहासिक व वैभवशाली मिरवणुकीस गालबोट लागेल़. याबाबतीत प्रशासनाने आमच्यावर अकारण दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या श्रींच्या मुर्तींचे विसर्जन करणार नाही, असेही या मंडळांनी स्पष्ट केले आहे़. दरम्यान पोलिसांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही या मंडळानी या पत्रद्वारे केले आहे़. 

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवPoliceपोलिस