शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

'अयोध्येच्या वादग्रस्त जागेवर मानवता भवन उभारा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 03:28 IST

माजी कुलगुरूंच्या संघटनेची मागणी

पुणे : अयोध्येतील विवादीत भूखंडावर मानवता भवन उभारले जावे. या मानवता भवनामध्ये २५ ते ३० एकर जागेवर एक भव्य श्रीराम मंदिर उभारावे आणि उरलेल्या भूखंडापैकी प्रत्येकी ५ एकर जागेवर भारतातील इतर मुख्य धर्म मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख, झोराष्टÑीयन, ज्यू यांची प्रार्थनास्थळे उभारावीत, असे आवाहन माजी कुलगुरूंच्या संघटनेकडून करण्यात आले आहे.अयोध्येतील रामजन्मीभूमी व बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे. याबाबतच्या निवेदनावर माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, डॉ. सुभाष आवले, डॉ. अरुण जामकर, डॉ. राजू मानकर, डॉ. एस. टी. देशमुख, डॉ. अरुण सावंत, डॉ. शरद निंबाळकर, डॉ. एन. एन. मालदार यांनी सह्या केल्या आहेत. अयोध्याप्रश्नाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने काही आजी-माजी कुलगुरू, शिक्षक यांनी प्रत्यक्ष अयोध्येला भेट देऊन परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आम्हाला असे आढळले की, विवादीत २.७७ एकर भूखंड व त्याच्याशी संलग्न असलेला सुमारे ६७.७ एकर भूखंड केंद्र शासनाने अधिग्रहित केला आहे. या जागेवर सर्वधर्मीयांचे मानवता मंदिर उभारणे उचित ठरेल.केंद्र शासनाने ६७.७ एकर भूखंडाचा ताबा श्रीरामजन्मभूमी न्यासाकडे देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. परंतु, आपल्या देशाचे बहुधार्मिक-बहुपंथक मानवतावादी स्वरूप बघता केवळ एकाच धर्माच्या प्रार्थनास्थळासाठी भूखंड उपलब्ध करून देणे अयोग्य ठरेल, असे आम्हाला वाटते. त्याऐवजी त्या जागेचा वापर श्रीराम मंदिरासहित सर्व प्रमुख धर्मांची प्रार्थनास्थळं उभारण्यासाठी केल्यास ते आपल्या देशासाठी अधिक सयुक्तिक ठरेल. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी कुलगुरूंच्या फोरम आॅफ फॉर्मर चॅन्सलर संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर