शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दुखवायचे नसल्याने त्यांच्याशी युती केली; CM फडणवीसांनी सांगितली Inside Story
2
भाजप-काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा; आधी अभद्र युती, नंतर डॅमेज कंट्रोल, अखेर कारवाई
3
“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस
4
अजित पवार ताणताहेत, भाजप सहन करतंय; पण का?; काका-पुतण्याच्या जोडीला मूकसंमती? 
5
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या सभांना उमेदवारांची सर्वाधिक मागणी; सभा, रोड शोंचा कल्ला सुरू
6
काही लोकांचा विकास नव्हे, तर खुर्ची हा एकच अजेंडा आहे; शिंदेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका
7
घडामोडींना वेग, काँग्रेसकडून कारवाईचा बडगा; आता अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक भाजपमध्ये येणार
8
विरोधी पक्षनेतेपद नाहीच, आता प्रतोदांचा मंत्रिपदाचा दर्जाही जाणार; सरकारची सदस्य संख्येची अट
9
डॉन अरुण गवळीच्या दोन्ही मुली करोडपती; प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांच्या मालमत्तेची माहिती उघड
10
अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आयोगाच्या कोर्टात; ६ बिनविरोध उमेदवारांप्रकरणी अहवाल सादर
11
भारत देणार सर्वांना धक्का; वृद्धिदर ७.४ टक्के राहणार, सरकारने जाहीर केली आकडेवारी
12
शिंदेसेना उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला; वांद्रे येथे प्रचार करताना झाला जीवघेणा हल्ला
13
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
14
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
15
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
16
अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
17
उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
18
मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
19
मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक
20
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

'अयोध्येच्या वादग्रस्त जागेवर मानवता भवन उभारा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 03:28 IST

माजी कुलगुरूंच्या संघटनेची मागणी

पुणे : अयोध्येतील विवादीत भूखंडावर मानवता भवन उभारले जावे. या मानवता भवनामध्ये २५ ते ३० एकर जागेवर एक भव्य श्रीराम मंदिर उभारावे आणि उरलेल्या भूखंडापैकी प्रत्येकी ५ एकर जागेवर भारतातील इतर मुख्य धर्म मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख, झोराष्टÑीयन, ज्यू यांची प्रार्थनास्थळे उभारावीत, असे आवाहन माजी कुलगुरूंच्या संघटनेकडून करण्यात आले आहे.अयोध्येतील रामजन्मीभूमी व बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे. याबाबतच्या निवेदनावर माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, डॉ. सुभाष आवले, डॉ. अरुण जामकर, डॉ. राजू मानकर, डॉ. एस. टी. देशमुख, डॉ. अरुण सावंत, डॉ. शरद निंबाळकर, डॉ. एन. एन. मालदार यांनी सह्या केल्या आहेत. अयोध्याप्रश्नाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने काही आजी-माजी कुलगुरू, शिक्षक यांनी प्रत्यक्ष अयोध्येला भेट देऊन परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आम्हाला असे आढळले की, विवादीत २.७७ एकर भूखंड व त्याच्याशी संलग्न असलेला सुमारे ६७.७ एकर भूखंड केंद्र शासनाने अधिग्रहित केला आहे. या जागेवर सर्वधर्मीयांचे मानवता मंदिर उभारणे उचित ठरेल.केंद्र शासनाने ६७.७ एकर भूखंडाचा ताबा श्रीरामजन्मभूमी न्यासाकडे देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. परंतु, आपल्या देशाचे बहुधार्मिक-बहुपंथक मानवतावादी स्वरूप बघता केवळ एकाच धर्माच्या प्रार्थनास्थळासाठी भूखंड उपलब्ध करून देणे अयोग्य ठरेल, असे आम्हाला वाटते. त्याऐवजी त्या जागेचा वापर श्रीराम मंदिरासहित सर्व प्रमुख धर्मांची प्रार्थनास्थळं उभारण्यासाठी केल्यास ते आपल्या देशासाठी अधिक सयुक्तिक ठरेल. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी कुलगुरूंच्या फोरम आॅफ फॉर्मर चॅन्सलर संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर