शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

'अयोध्येच्या वादग्रस्त जागेवर मानवता भवन उभारा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 03:28 IST

माजी कुलगुरूंच्या संघटनेची मागणी

पुणे : अयोध्येतील विवादीत भूखंडावर मानवता भवन उभारले जावे. या मानवता भवनामध्ये २५ ते ३० एकर जागेवर एक भव्य श्रीराम मंदिर उभारावे आणि उरलेल्या भूखंडापैकी प्रत्येकी ५ एकर जागेवर भारतातील इतर मुख्य धर्म मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख, झोराष्टÑीयन, ज्यू यांची प्रार्थनास्थळे उभारावीत, असे आवाहन माजी कुलगुरूंच्या संघटनेकडून करण्यात आले आहे.अयोध्येतील रामजन्मीभूमी व बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे. याबाबतच्या निवेदनावर माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, डॉ. सुभाष आवले, डॉ. अरुण जामकर, डॉ. राजू मानकर, डॉ. एस. टी. देशमुख, डॉ. अरुण सावंत, डॉ. शरद निंबाळकर, डॉ. एन. एन. मालदार यांनी सह्या केल्या आहेत. अयोध्याप्रश्नाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने काही आजी-माजी कुलगुरू, शिक्षक यांनी प्रत्यक्ष अयोध्येला भेट देऊन परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आम्हाला असे आढळले की, विवादीत २.७७ एकर भूखंड व त्याच्याशी संलग्न असलेला सुमारे ६७.७ एकर भूखंड केंद्र शासनाने अधिग्रहित केला आहे. या जागेवर सर्वधर्मीयांचे मानवता मंदिर उभारणे उचित ठरेल.केंद्र शासनाने ६७.७ एकर भूखंडाचा ताबा श्रीरामजन्मभूमी न्यासाकडे देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. परंतु, आपल्या देशाचे बहुधार्मिक-बहुपंथक मानवतावादी स्वरूप बघता केवळ एकाच धर्माच्या प्रार्थनास्थळासाठी भूखंड उपलब्ध करून देणे अयोग्य ठरेल, असे आम्हाला वाटते. त्याऐवजी त्या जागेचा वापर श्रीराम मंदिरासहित सर्व प्रमुख धर्मांची प्रार्थनास्थळं उभारण्यासाठी केल्यास ते आपल्या देशासाठी अधिक सयुक्तिक ठरेल. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी कुलगुरूंच्या फोरम आॅफ फॉर्मर चॅन्सलर संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर