शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Mahrashtra Election 2019 : विश्वंभर चाैधरी यांची माघार ; निवडणूक न लढविण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 20:19 IST

काेथरुडमधून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विराेधात उतरण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चाैधरी यांनी मागे घेतला आहे.

पुणे : काेथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा विचार करणाऱ्या विश्वंभर चाैधरी यांनी अखेर आपला विचार बदलला असून निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. फेसबुक पाेस्ट लिहून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. 

राज्याच्या निवडणूकीत सर्वांचेच लक्ष लागलेल्या काेथरुड मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास विश्वंभर चाैधरी यांनी देखील तयारी दर्शवली हाेती. चंदक्रांत पाटील यांना आव्हान देण्यासाठी ते सज्ज झाले हाेते. त्यांना स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांनी निवडणूक लढविण्याची ऑफर दिली हाेती. काेथरुडमधून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे रिंगणात उतरले आहेत.  आघाडीकडून काेथरुडची जागा मित्र पक्षाला साेडण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. त्याबाबतची घाेषणा अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केली हाेती. त्यानंतर राजू शेट्टी यांनी चाैधरी यांना निवडणूक लढविण्याबाबत विचारले असता त्यांनी देखील तयारी दर्शवली हाेती. त्यासाठी सर्व विराेधी पक्षांचे एक्य झाल्यास निवडणूक लढविण्यास ते तयार हाेते. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काेथरुडमधून किशाेर शिंदे यांना उमेदवारी जाहीर केल्याने तसेच आपने देखील डाॅ. अभिजीत माेरे यांना उभे केल्याने मतांचे विभाजन टाळण्यासाठी चाैधरी यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 

कोथरूड मतदार संघातून विधानसभा लढवावी असा प्रस्ताव मला मित्रवर्य राजू शेट्टी यांनी दिला होता. त्यावर खूप विचार करून मी सुद्धा मनाची तयारी केली आणि विरोधी पक्षांमध्ये सर्वसहमती झाली तर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली. भाजपाच्या धनदांडग्या आणि धर्मवादी राजकारणाविरोधात सर्वसहमतीचे उदारमतवादी राजकारण आणि लोकशाही वाचवण्याचा अजेंडा यासाठी निवडणूक लढावी हा विचार मी चळवळीतील साथींशी, मित्रांशी बोलून पक्का केला होता.सुदैवाने अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला. मतांची विभागणी न होता एकत्र लढण्यातूनच बलाढ्य पक्षाच्या उमेदवारांना चितपट केले जाऊ शकते ही धारणा आपण रूजवू शकलो. मात्र शेवटी सर्वसहमती होऊ शकली नाही. मनसे आणि आप यांचे उमेदवार मैदानात राहणार हे निश्चित झाल्यानंतर मतविभागणी होणे अटळ आहे. त्यामुळे कालपासून पुन्हा अनेक साथींशी, मित्रांशी, तरूण कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर ही मतविभागणी टळावी म्हणून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. असे चाैधरी यांनी आपल्या फेसबुक पाेस्टमध्ये म्हंटले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणElectionनिवडणूक