शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Mahrashtra Election 2019 : विश्वंभर चाैधरी यांची माघार ; निवडणूक न लढविण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 20:19 IST

काेथरुडमधून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विराेधात उतरण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चाैधरी यांनी मागे घेतला आहे.

पुणे : काेथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा विचार करणाऱ्या विश्वंभर चाैधरी यांनी अखेर आपला विचार बदलला असून निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. फेसबुक पाेस्ट लिहून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. 

राज्याच्या निवडणूकीत सर्वांचेच लक्ष लागलेल्या काेथरुड मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास विश्वंभर चाैधरी यांनी देखील तयारी दर्शवली हाेती. चंदक्रांत पाटील यांना आव्हान देण्यासाठी ते सज्ज झाले हाेते. त्यांना स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांनी निवडणूक लढविण्याची ऑफर दिली हाेती. काेथरुडमधून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे रिंगणात उतरले आहेत.  आघाडीकडून काेथरुडची जागा मित्र पक्षाला साेडण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. त्याबाबतची घाेषणा अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केली हाेती. त्यानंतर राजू शेट्टी यांनी चाैधरी यांना निवडणूक लढविण्याबाबत विचारले असता त्यांनी देखील तयारी दर्शवली हाेती. त्यासाठी सर्व विराेधी पक्षांचे एक्य झाल्यास निवडणूक लढविण्यास ते तयार हाेते. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काेथरुडमधून किशाेर शिंदे यांना उमेदवारी जाहीर केल्याने तसेच आपने देखील डाॅ. अभिजीत माेरे यांना उभे केल्याने मतांचे विभाजन टाळण्यासाठी चाैधरी यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 

कोथरूड मतदार संघातून विधानसभा लढवावी असा प्रस्ताव मला मित्रवर्य राजू शेट्टी यांनी दिला होता. त्यावर खूप विचार करून मी सुद्धा मनाची तयारी केली आणि विरोधी पक्षांमध्ये सर्वसहमती झाली तर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली. भाजपाच्या धनदांडग्या आणि धर्मवादी राजकारणाविरोधात सर्वसहमतीचे उदारमतवादी राजकारण आणि लोकशाही वाचवण्याचा अजेंडा यासाठी निवडणूक लढावी हा विचार मी चळवळीतील साथींशी, मित्रांशी बोलून पक्का केला होता.सुदैवाने अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला. मतांची विभागणी न होता एकत्र लढण्यातूनच बलाढ्य पक्षाच्या उमेदवारांना चितपट केले जाऊ शकते ही धारणा आपण रूजवू शकलो. मात्र शेवटी सर्वसहमती होऊ शकली नाही. मनसे आणि आप यांचे उमेदवार मैदानात राहणार हे निश्चित झाल्यानंतर मतविभागणी होणे अटळ आहे. त्यामुळे कालपासून पुन्हा अनेक साथींशी, मित्रांशी, तरूण कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर ही मतविभागणी टळावी म्हणून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. असे चाैधरी यांनी आपल्या फेसबुक पाेस्टमध्ये म्हंटले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणElectionनिवडणूक