शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

Mahrashtra Election 2019 : विश्वंभर चाैधरी यांची माघार ; निवडणूक न लढविण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 20:19 IST

काेथरुडमधून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विराेधात उतरण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चाैधरी यांनी मागे घेतला आहे.

पुणे : काेथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा विचार करणाऱ्या विश्वंभर चाैधरी यांनी अखेर आपला विचार बदलला असून निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. फेसबुक पाेस्ट लिहून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. 

राज्याच्या निवडणूकीत सर्वांचेच लक्ष लागलेल्या काेथरुड मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास विश्वंभर चाैधरी यांनी देखील तयारी दर्शवली हाेती. चंदक्रांत पाटील यांना आव्हान देण्यासाठी ते सज्ज झाले हाेते. त्यांना स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांनी निवडणूक लढविण्याची ऑफर दिली हाेती. काेथरुडमधून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे रिंगणात उतरले आहेत.  आघाडीकडून काेथरुडची जागा मित्र पक्षाला साेडण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. त्याबाबतची घाेषणा अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केली हाेती. त्यानंतर राजू शेट्टी यांनी चाैधरी यांना निवडणूक लढविण्याबाबत विचारले असता त्यांनी देखील तयारी दर्शवली हाेती. त्यासाठी सर्व विराेधी पक्षांचे एक्य झाल्यास निवडणूक लढविण्यास ते तयार हाेते. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काेथरुडमधून किशाेर शिंदे यांना उमेदवारी जाहीर केल्याने तसेच आपने देखील डाॅ. अभिजीत माेरे यांना उभे केल्याने मतांचे विभाजन टाळण्यासाठी चाैधरी यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 

कोथरूड मतदार संघातून विधानसभा लढवावी असा प्रस्ताव मला मित्रवर्य राजू शेट्टी यांनी दिला होता. त्यावर खूप विचार करून मी सुद्धा मनाची तयारी केली आणि विरोधी पक्षांमध्ये सर्वसहमती झाली तर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली. भाजपाच्या धनदांडग्या आणि धर्मवादी राजकारणाविरोधात सर्वसहमतीचे उदारमतवादी राजकारण आणि लोकशाही वाचवण्याचा अजेंडा यासाठी निवडणूक लढावी हा विचार मी चळवळीतील साथींशी, मित्रांशी बोलून पक्का केला होता.सुदैवाने अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला. मतांची विभागणी न होता एकत्र लढण्यातूनच बलाढ्य पक्षाच्या उमेदवारांना चितपट केले जाऊ शकते ही धारणा आपण रूजवू शकलो. मात्र शेवटी सर्वसहमती होऊ शकली नाही. मनसे आणि आप यांचे उमेदवार मैदानात राहणार हे निश्चित झाल्यानंतर मतविभागणी होणे अटळ आहे. त्यामुळे कालपासून पुन्हा अनेक साथींशी, मित्रांशी, तरूण कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर ही मतविभागणी टळावी म्हणून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. असे चाैधरी यांनी आपल्या फेसबुक पाेस्टमध्ये म्हंटले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणElectionनिवडणूक