शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
5
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
6
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
7
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
8
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
9
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
10
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
11
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
12
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
13
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
14
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
15
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
16
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
17
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
18
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
19
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
20
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'

'मविआ' सरकारने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करावा, हर्षवर्धन पाटलांची राज्यपालांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 1:36 PM

राज्यात मागील १० दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीज पुरवठा पुर्णपणे बंद केला आहे. परिणामी, शेती पिके जळून चालली आहेत. पाण्याअभावी पशुधन अडचणीत आले आहे

बारामती : राज्यात मागील १० दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीज पुरवठा पुर्णपणे बंद केला आहे. परिणामी, शेती पिके जळून चालली आहेत. पाण्याअभावी पशुधन अडचणीत आले आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीज तोडणी प्रश्नी  लक्ष घालावे, अशी विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. मुंबईत राजभवनावरती पाटील यांनी राज्यपाल कोश्यारी यांची गुरुवारी भेट घेतली.            महावितरण वीज बिल थकबाकी वसुलीसाठी वीज पुरवठा पूर्णपणे बंद केल्याने जनावरांना पाणी मिळत नाही, उभी पिके करपून चालली आहेत, रब्बी पिकांच्या पेरण्या बंद पडल्या आहेत, त्यामुळे शेतकरी आक्रमक होऊन ठीक ठिकाणी आंदोलन करीत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. 

वीज पुरवठा तात्काळ पूर्ववतपणे चालू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

शेतकरी वर्ग अद्यापी कोरोना तसेच राज्यात झालेल्या अतिवृष्टीने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. अशाप्रकारे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करणे शासनाचे कर्तव्य आहे. मात्र शेतीपंपांचा वीज पुरवठा खंडित करून शेतकरी वर्गाला वेठीस धरण्याचे काम शासनाकडून चालू आहे. शेतकऱ्यांची सध्याची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने शेतीपंपांचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववतपणे चालू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भेटीत त्यांनी राज्यपालांकडे केली. शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नी राज्यपाल महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यातील विविध समस्यांवरती अभ्यास असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा राज्याला होत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीFarmerशेतकरीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी