शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
3
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
4
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
5
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
6
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
7
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
8
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
9
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
10
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
11
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
12
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
13
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
14
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
15
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
16
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
17
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
18
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
19
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
20
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
Daily Top 2Weekly Top 5

'मविआ' सरकारने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करावा, हर्षवर्धन पाटलांची राज्यपालांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 14:05 IST

राज्यात मागील १० दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीज पुरवठा पुर्णपणे बंद केला आहे. परिणामी, शेती पिके जळून चालली आहेत. पाण्याअभावी पशुधन अडचणीत आले आहे

बारामती : राज्यात मागील १० दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीज पुरवठा पुर्णपणे बंद केला आहे. परिणामी, शेती पिके जळून चालली आहेत. पाण्याअभावी पशुधन अडचणीत आले आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीज तोडणी प्रश्नी  लक्ष घालावे, अशी विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. मुंबईत राजभवनावरती पाटील यांनी राज्यपाल कोश्यारी यांची गुरुवारी भेट घेतली.            महावितरण वीज बिल थकबाकी वसुलीसाठी वीज पुरवठा पूर्णपणे बंद केल्याने जनावरांना पाणी मिळत नाही, उभी पिके करपून चालली आहेत, रब्बी पिकांच्या पेरण्या बंद पडल्या आहेत, त्यामुळे शेतकरी आक्रमक होऊन ठीक ठिकाणी आंदोलन करीत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. 

वीज पुरवठा तात्काळ पूर्ववतपणे चालू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

शेतकरी वर्ग अद्यापी कोरोना तसेच राज्यात झालेल्या अतिवृष्टीने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. अशाप्रकारे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करणे शासनाचे कर्तव्य आहे. मात्र शेतीपंपांचा वीज पुरवठा खंडित करून शेतकरी वर्गाला वेठीस धरण्याचे काम शासनाकडून चालू आहे. शेतकऱ्यांची सध्याची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने शेतीपंपांचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववतपणे चालू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भेटीत त्यांनी राज्यपालांकडे केली. शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नी राज्यपाल महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यातील विविध समस्यांवरती अभ्यास असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा राज्याला होत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीFarmerशेतकरीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी