शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'मविआ' सरकारने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करावा, हर्षवर्धन पाटलांची राज्यपालांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 14:05 IST

राज्यात मागील १० दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीज पुरवठा पुर्णपणे बंद केला आहे. परिणामी, शेती पिके जळून चालली आहेत. पाण्याअभावी पशुधन अडचणीत आले आहे

बारामती : राज्यात मागील १० दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीज पुरवठा पुर्णपणे बंद केला आहे. परिणामी, शेती पिके जळून चालली आहेत. पाण्याअभावी पशुधन अडचणीत आले आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीज तोडणी प्रश्नी  लक्ष घालावे, अशी विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. मुंबईत राजभवनावरती पाटील यांनी राज्यपाल कोश्यारी यांची गुरुवारी भेट घेतली.            महावितरण वीज बिल थकबाकी वसुलीसाठी वीज पुरवठा पूर्णपणे बंद केल्याने जनावरांना पाणी मिळत नाही, उभी पिके करपून चालली आहेत, रब्बी पिकांच्या पेरण्या बंद पडल्या आहेत, त्यामुळे शेतकरी आक्रमक होऊन ठीक ठिकाणी आंदोलन करीत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. 

वीज पुरवठा तात्काळ पूर्ववतपणे चालू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

शेतकरी वर्ग अद्यापी कोरोना तसेच राज्यात झालेल्या अतिवृष्टीने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. अशाप्रकारे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करणे शासनाचे कर्तव्य आहे. मात्र शेतीपंपांचा वीज पुरवठा खंडित करून शेतकरी वर्गाला वेठीस धरण्याचे काम शासनाकडून चालू आहे. शेतकऱ्यांची सध्याची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने शेतीपंपांचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववतपणे चालू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भेटीत त्यांनी राज्यपालांकडे केली. शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नी राज्यपाल महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यातील विविध समस्यांवरती अभ्यास असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा राज्याला होत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीFarmerशेतकरीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी