पुणे - हवामान विभागाकडून राज्यातील अनेक भागांसाठी इशारा देण्यात आला असून, पुढील दोन दिवस वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागातील अधिकारी एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि आसपासच्या जिल्ह्यांना या बदलत्या हवामानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासोबतच सोसाट्याचा वारा, गारपीट आणि विजेचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मागील २४ तासांत धाराशिव आणि विदर्भातील काही भागांत गारपीट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. या अचानक बदललेल्या हवामानामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ही परिस्थिती २० मार्चपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र वातावरणात सुधारणा होऊन आकाश निरभ्र राहील आणि तापमानातही स्थिरता येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Web Summary : A yellow alert has been issued for parts of Maharashtra. Unstable weather is expected for two days with light to moderate rain, strong winds, hailstorms, and lightning predicted, especially in Vidarbha. Farmers and citizens are advised to be cautious as the situation is expected to improve after March 20th.
Web Summary : महाराष्ट्र के कुछ हिस्सों के लिए येलो अलर्ट जारी किया गया है। अगले दो दिनों तक अस्थिर मौसम की आशंका है, खासकर विदर्भ में हल्की से मध्यम बारिश, तेज हवाएं, ओलावृष्टि और बिजली गिरने की भविष्यवाणी की गई है। किसानों और नागरिकों को सतर्क रहने की सलाह दी जाती है क्योंकि 20 मार्च के बाद स्थिति में सुधार होने की उम्मीद है।