शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Maharashtra: अवकाळीचा फटका ९ जिल्ह्यांना, तब्बल ७५ हजार हेक्टरला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 09:46 IST

जळगाव जिल्ह्यातील सुमारे १८ हजारांहून अधिक हेक्टरचे नुकसान झाले आहे....

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या उत्तर मध्य महाराष्ट्रात, त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील ९ जिल्ह्यांमध्ये माेठी गारपीट झाली. या गारपिटीने तब्बल ७५ हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सर्वाधिक नुकसान बुलढाणा जिल्ह्यातील २१ हजार ७६८ हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. त्याखालोखाल जळगाव जिल्ह्यातील सुमारे १८ हजारांहून अधिक हेक्टरचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घासही अवकाळीने हिसकावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपिटीने चांगलेच झोडपून काढले असून, हाताशी आलेल्या रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. राज्यातील नाशिक, धुळे, जळगाव, जालना, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अवकाळी व गारपिटीने रबी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. यात गहू, हरभरा, कापूस, तूर, संत्रा, मोसंबी, केळी या पिकांचा समावेश आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील २१ हजार ७६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्याखालोखाल जळगाव जिल्ह्यात १८ हजार ८७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अकोल्यातही १७ हजार ६९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यात ११ हजार ९५ हेक्टरवरील रबी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्हा - तालुके - बाधित क्षेत्र (हेक्टर)

नाशिक-नांदगाव- ५४

धुळे-धुळे- २२०

जळगाव-चोपडा, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, भडगाव, धरणगाव- १८,८७६

जालना- जाफ्राबाद, भोकरदन- ११,०९५

अकोला- मूर्तिजापूर, तेल्हारा- १७,०६९

अमरावती- धारणी, चिखलदरा- २,२७८

बुलढाणा- बुलढाणा, खामगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा- २१,७६८

वाशिम- तीन तालुके- ३,०१४

यवतमाळ- १ तालुका- ४५०

एकूण- ७४,८२४

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊस