शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Maharashtra Board: दहावी - बारावीच्या विध्यार्थ्यांना मोठा दिलासा; पेपर सोडवण्यासाठी जास्तीचा अर्धा तास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 10:46 IST

मार्च -एप्रिल २०२२ मध्ये सर्व विषयांचे पेपर सकाळी ११ ऐवजी साडेदहा वाजता सुरू केले जाणार आहेत.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी - बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर झाले असून विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी वेळ वाढून देण्यात आला आहे. मार्च -एप्रिल २०२२ मध्ये सर्व विषयांचे पेपर सकाळी ११ ऐवजी साडेदहा वाजता सुरू केले जाणार आहेत.

राज्य मंडळातर्फे इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत होणार आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे लागत आहे. काही विद्यार्थी सध्या प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिक्षण घेत आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव झालेला नाही. त्यामुळे राज्य मंडळाने लेखी परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला.

ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. वसंत काळपांडे म्हणाले, “मागील वर्षीसुध्दा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वाढीव वेळ देण्यात आला होता. विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव तुटला आहे. त्यामुळे राज्य मंडळाने घेतलेला निर्णय योग्य व विद्यार्थी हिताचा आहे.”

“या पूर्वी फेब्रुवारी-मार्च मध्ये घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा सकाळी अकरा वाजता सुरू केल्या जात होत्या. परंतु, मार्च -एप्रिल २०२२ च्या सर्व विषयांची परीक्षा आता सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर लवकर पोहोचण्याबाबत काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना ७०, ८० व १०० गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तास तर ४०, ६० व ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आला असल्याचे राज्य मंडळ अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.''  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाEducationशिक्षण