शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Board: दहावी - बारावीच्या विध्यार्थ्यांना मोठा दिलासा; पेपर सोडवण्यासाठी जास्तीचा अर्धा तास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 10:46 IST

मार्च -एप्रिल २०२२ मध्ये सर्व विषयांचे पेपर सकाळी ११ ऐवजी साडेदहा वाजता सुरू केले जाणार आहेत.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी - बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर झाले असून विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी वेळ वाढून देण्यात आला आहे. मार्च -एप्रिल २०२२ मध्ये सर्व विषयांचे पेपर सकाळी ११ ऐवजी साडेदहा वाजता सुरू केले जाणार आहेत.

राज्य मंडळातर्फे इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत होणार आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे लागत आहे. काही विद्यार्थी सध्या प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिक्षण घेत आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव झालेला नाही. त्यामुळे राज्य मंडळाने लेखी परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला.

ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. वसंत काळपांडे म्हणाले, “मागील वर्षीसुध्दा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वाढीव वेळ देण्यात आला होता. विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव तुटला आहे. त्यामुळे राज्य मंडळाने घेतलेला निर्णय योग्य व विद्यार्थी हिताचा आहे.”

“या पूर्वी फेब्रुवारी-मार्च मध्ये घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा सकाळी अकरा वाजता सुरू केल्या जात होत्या. परंतु, मार्च -एप्रिल २०२२ च्या सर्व विषयांची परीक्षा आता सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर लवकर पोहोचण्याबाबत काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना ७०, ८० व १०० गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तास तर ४०, ६० व ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आला असल्याचे राज्य मंडळ अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.''  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाEducationशिक्षण