शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

Maharashtra | राज्यात आतापर्यंत १० कोटी टन साखरेचे उत्पादन; अद्याप १२० लाख टन गाळप शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 15:14 IST

येत्या १५ एप्रिलपर्यंत साखर कारखान्यांची धुराडी बंद होतील, अशी अपेक्षा साखर आयुक्तालयाला आहे...

पुणे : राज्यातील सहकारी व खासगी अशा सुमारे २१० साखर कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम सुरू केल्यानंतर आजपर्यंत एक हजार ३३ लाख टन उसापासून १० कोटी दाेन लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून, येत्या १५ एप्रिलपर्यंत साखर कारखान्यांची धुराडी बंद होतील, अशी अपेक्षा साखर आयुक्तालयाला आहे.

राज्यात २० मार्चअखेर १० कोटी ३३ लाख ९८ हजार टन उसाचे गाळप झाले असून, १०२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा साखर उतारा ९.९५ इतका मिळाला असून मागील वर्षी हाच साखर उतारा १०.४० टक्के होता. मागील दोन-तीन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींमुळे ऊस उत्पादनात घट होऊन राज्याचा साखर उतारा घटल्याचा अंदाज साखर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे यंदा एकूण ऊस उत्पादनात २५ टक्के घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सहकारी साखर कारखान्यातील गाळप आणि साखर उत्पादन कारखान्यांची संख्या : १०५

दैनंदिन गाळप (टन) : चार लाख ५८ हजार ५०

मार्चपर्यंत उसाचे गाळप - पाच कोटी ५० लाख ७३ हजार ७८० मे. टन

मार्चपर्यंतचे साखरेचे उत्पादन - पाच कोटी ७१ लाख ६८ हजार २७० क्विंटल

साखर उतारा - १०.३८ टक्के

चाैकट : खासगी साखर कारखान्यातील गाळप आणि साखर उत्पादन

संख्या - १०५

दैनंदिन गाळप टन - चार लाख २४ हजार ५००

मार्चपर्यंत उसाचे गाळप - चार कोटी ७८ लाख ६४ हजार ४१७ मे. टन

मार्चपर्यंतचे साखरेचे उत्पादन - चार कोटी ५४ लाख ९४ हजार ५९५ क्विंटल

साखर उतारा - ९.५० टक्के

अद्याप १२० लाख टन उसाचे गाळप शिल्लक

राज्यात आतापर्यंत ११९ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. तर ९१ कारखाने अद्याप सुरू असून सर्वाधिक कारखाने सोलापूर विभागात सुरू आहेत. त्याखालोखाल कोल्हापूर विभागातील कारखाने सुरू असल्याची माहिती आयुक्तालयाकडून देण्यात आली. राज्यात अद्याप १२० लाख टन उसाचे गाळप शिल्लक आहे.

राज्यातील साखर हंगाम १५ एप्रिलपर्यंत संपेल, अशी अपेक्षा आहे. देशात एकूण उत्पादनाच्या ६० लाख टन साखर निर्यात झाली आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा २१ लाख टन इतका आहे.

- शेखर गायकवाड, आयुक्त, साखर

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेPuneपुणे